Pakistan Flood : पाकिस्तानचा धोका वाढला! काश्मीरमधील मुसळधार पावसामुळे येणार पुराच्या लाटा

श्रीनगर : पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे (Pahalgam Terror Attack) संपूर्ण देश हादरुन गेलं आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पाऊल उचलले आहे. भारताने सिंधू पाणी करार स्थगित करण्यासह अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. यामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकिकडे भारताच्या कठोर भूमिकेनंतर पाकिस्तानला धडकी भरली असताना दुसरीकडे पाकिस्तानला नैसर्गिक आपत्तीचा देखील सामना करावा लागणार आहे.



सध्या जम्मू काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे चिनाब नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून यामुळे पाकिस्तानमध्ये पुराचा धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे (४०-६० किमी/ताशी) वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.



काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात आला होता पूर 


गेल्या महिन्यात २६ एप्रिल २०२५ रोजी भारताने पाकिस्तानातील मुझफ्फराबाद येथील हट्टिन बाला भागात झेलम नदीत पाणी सोडले होते. यामुळे मुझफ्फराबादमध्ये अचानक मोठा पूर आला होता. यानंतर, मुझफ्फराबाद प्रशासनावर वॉटर इमर्जन्सी जाहीर करण्याची वेळ आली होती.



दिल्लीत पावसाचा कहर


सकाळी झालेल्या मुसळधार पावसाने दिल्ली-एनसीआरमध्ये आपत्तीचे रूप धारण केले. दिल्लीतील द्वारका येथे पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे एका घरावर झाड कोसळले. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, खारखरी कालवा गावात एका शेतात बांधलेल्या ट्यूबवेलच्या खोलीवर एक झाड पडले. या खोलीत एकूण पाच लोक झोपले होते. ज्यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आणि एक जण जखमी झाला. मृतांची ओळख २६ वर्षीय ज्योती आणि तिची तीन मुले अशी झाली आहे. तर ज्योतीचा पती अजय किरकोळ जखमी झाला आहे.

Comments
Add Comment

Supreme Court : व्यभिचार सिद्ध झाल्यास पत्नी पोटगीस अपात्र, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

नवी दिल्ली : पत्नी व्यभिचारात राहत असल्याचे पतीकडून स्पष्टपणे सिद्ध झाल्यास, फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १२५

India Envoy Warns Pakistan : "आधी दहशतवाद संपवा, आणि नंतरच..."!पाकिस्तानला भारताचा कडक इशारा; राजदूत विनय क्वात्रा यांचे स्पष्ट शब्द

नवी दिल्ली : पाकिस्तानने द्विपक्षीय संबंध सुधारायचे असतील, तर सर्वप्रथम आपल्या भूमीवरील दहशतवादाचा संपूर्ण

Justice Anu Grover Baliga : न्यायमूर्ती अनु ग्रोवर बलीगा यांची बदली, नीट पेपरफुटीची सोमवारी ३ ऑगस्ट रोजी सुनावणी

नवी दिल्ली : देशभरात प्रश्नपत्रिका फुटीच्या वाढत्या प्रकरणांवरून आंदोलने झाल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी

Delhi High Court : 'लंच ब्रेक'मध्ये झालेला अपघातही कामाचाच भाग, कर्मचारी भरपाईस पात्र

नवी दिल्ली : कर्मचारी भरपाई कायद्याची व्याख्या करताना उच्च न्यायालयाने एक अत

US Visa Bond Rule : ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय! आता US Visa साठी भरावा लागू शकतो १७ लाखांचा बॉण्ड

नवी दिल्ली : अमेरिकेत प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

Private Detectives : खासगी गुप्तहेरांवर येणार कायद्याचा वॉच! सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला मोठे निर्देश

नवी दिल्ली : देशभरात कार्यरत असलेल्या खासगी गुप्तहेर (Private Detectives) संस्थांवर कायदेशीर नियंत्रण आणण्याची गरज व्यक्त