आयपीएलमध्ये मुंबई नंबर वन

मुंबई : आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत ५० साखळी सामने झाले आहेत. आणखी २० साखळी सामने होणार आहेत. आतापर्यंत झालेल्या सामन्यांच्या निकालाआधारे गुणतक्त्यात मुंबई इंडियन्स हा संघ पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. यंदा स्पर्धेच्या सुरुवातीला सलग चार सामन्यांत पराभूत झालेल्या मुंबई इंडियन्स नंतर सलग सात सामने जिंकत १४ गुण मिळवले आणि गुणतक्त्यात पहिले स्थान पटकाविले. आता मुंबईचे साखळी फेरीतले फक्त तीन सामने बाकी आहेत. यातील दोन सामने मुंबईतच होणार आहेत. यामुळे आयपीएलमध्ये पुन्हा एकदा मुंबईची स्थिती भक्कम दिसत आहे.

साखळी सामन्यांच्या फेरीतले रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे १० साखळी सामने झाले आहेत. त्यांनी सात सामने जिंकून आणि तीन सामने गमावून गुणतक्त्यात दुसरे स्थान पटकाविले आहे. पंजाब किंग्स संघ आतापर्यंत १० साखळी सामने खेळला आहे. यापैकी ६ सामन्यांत त्यांचा विजय झाला आणि तीन सामन्यांत त्यांचा पराभव झाला आहे. पावसामुळे त्यांचा एक सामना अनिर्णित आहे. यामुळे १३ गुणांसह पंजाब किंग्स गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानी आहे. गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन संघ गुणतक्त्यात अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत. पण दोन्ही संघांचे गुण १२ आहेत. या संघांचे स्थान त्यांच्या धावगतीच्या आधारे निश्चित झाले आहे. गुजरात टायटन्सची धावगती .७४८ आणि दिल्ली कॅपिटल्सची धावगती .३६२ आहे.

लखनऊ सुपर जायंट्स दहा गुणांसह सहाव्या स्थानी आहे. कोलकाता नाईट रायडर्स नऊ गुणंसह सातव्या स्थानी आहे. राजस्थान रॉयल्स सहा गुणांसह आठव्या तर सनरायझर्स हैदराबाद सहा गुणांसह नवव्या स्थानावर आहे. चेन्नई सुपरकिंग्स फक्त चार गुण मिळवल्यामुळे गुणतक्त्यात सर्वात शेवटच्या दहाव्या क्रमांकावर आहे. चेन्नईचे यंदाच्या आयपीएलमधील आव्हान संपलयात जमा आहे. उर्वरित सामने जिंकले तरी चेन्नईचा संघ पुढल्या फेरीसाठी पात्र ठरण्याची शक्यता नाही.

मुंबई इंडियन्स संघाचे पुढील सामने

६ मे - मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स, वानखेडे स्टेडियम मुंबई
११ मे - मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स, एचपीसीए स्टेडियम धरमशाला
१५ मे - मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, वानखेडे स्टेडियम मुंबई
Comments
Add Comment

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सेमी फायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास फायनलचं तिकीट कोणाला मिळणार ? जाणून घ्या नियम

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ ची दुसरी सेमी फायनल आज नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये

भारत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या T- २० मॅच च्या आधी वाईट बातमी, युवा खेळाडूचा बॉल लागून मृत्यू

मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघ कांगारूं विरुद्ध पाच टी - २० सामन्यांची मालिका खेळत आहे. या

Shreyas Iyer Health Update : 'स्टार बॅट्समन' श्रेयस अय्यरकडून मोठी अपडेट! गंभीर दुखापतीनंतर ICU मधून भावनिक पोस्ट, चाहत्यांना दिलासा!

मुंबई : टीम इंडियाचा स्टार फलंदाज (Star Batsman) श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या एका गंभीर दुखापतीमुळे रुग्णालयात उपचार घेत आहे.

हरमनप्रीत कौर आणि तो ऐतिहासिक विक्रम: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी 'त्या' १७१ धावांची चर्चा!

नवी दिल्ली : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या

WC Semi-Final: पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचली दक्षिण आफ्रिका, इंग्लंडला १२५ धावांनी हरवले

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ मध्ये मोठा उलटफेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द : दुसरा सामना ३१ ऑक्टोबरला!

ऑस्ट्रेलिया : मनुका ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा पहिला टी२० सामना अखेर सततच्या