Delhi Weather Thunderstorm: 'मे' च्या उकाड्यात, दिल्लीत वादळी पाऊस ! द्वारका येथे मोठी दुर्घटना

नवी दिल्ली: एका बाजूला मे चा कडक उन्हाळा सुरु झाला असताना, दिल्लीत अचानक आलेल्या पाऊसाने कहर केला आहे. (Delhi Weather Thunderstorm)  ज्यामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे


शुक्रवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसाने दिल्ली-एनसीआरमध्ये आपत्तीचे रूप धारण केले. दिल्लीतील द्वारका येथे पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे एका घरावर झाड कोसळले. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे.


दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, खारखरी कालवा गावात एका शेतात बांधलेल्या ट्यूबवेलच्या खोलीवर एक झाड पडले. या खोलीत एकूण पाच लोक झोपले होते. ज्यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आणि एक जण जखमी झाला. मृतांची ओळख २६ वर्षीय ज्योती आणि तिची तीन मुले अशी झाली आहे. तर ज्योतीचा पती अजय किरकोळ जखमी झाला आहे.



वादळाच्या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट जारी


आज जोरदार वाऱ्यामुळे दिल्ली, नोएडा आणि गाझियाबादमधील अनेक भागात झाडे आणि विजेचे खांब कोसळल्याचे वृत्त आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. हवामान खात्याने नागरिकांना घरात सुरक्षित राहण्याचा आणि आवश्यक नसल्यास बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.



खराब हवामानामुळे विमान उड्डाणांना विलंब


राजधानीतील बदलत्या हवामानामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमान वाहतूक प्रभावित झाली. विमानतळ चालवणारी कंपनी दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (डायल) ने सांगितले की, खराब हवामानामुळे काही उड्डाणांवर परिणाम झाला. प्रतिकूल हवामानामुळे उत्तर भारतातील काही भागात विमान वाहतूक प्रभावित झाल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे.

Comments
Add Comment

Bank Holiday Today : आज देशातील 'या' राज्यांमध्ये बँका बंद; RBI Holiday List तपासा

नवी दिल्ली : बँकेच्या शाखेत जाऊन महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी आज बँका सुरू आहेत की बंद हे तपासून

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू