पैज जिंकण्यासाठी दारू पिणे भोवले, तरुणाचा मृत्यू

बंगळुरू : मित्रांमध्ये जास्तीत जास्त दारू पिण्याची पैज लागली. ही पैज जिंकण्यासाठी पाणी, सोडा किंवा कोल्डड्रिंक न मिसळता थेट बाटली तोंडाला लावून दारू प्यायची होती. जो या पद्धतीने जास्तीत जास्त दारू पिऊ शकेल तो दहा हजार रुपये जिंकेल, असे ठरले. पैजेसाठी सर्व मित्रांनी पैसे लावले. पैज जिंकण्याकरिता एका तरुणाने एकदम पाच बाटल्या दारू खरेदी केली. तरुण एकामागून एक बाटल्या रित्या करत गेला. थोड्या वेळात भरमसाठ दारू प्यायल्यामुळे तब्येत बिघडली आणि तरुणाचा मृत्यू झाला. भरमसाठ दारू प्यायल्यामुळे मृत्यू झालेला तरुण २१ वर्षांचा होता. वर्षभरापूर्वी त्याचे लग्न झाले होते आणि आठच दिवसांपूर्वी तो मुलीचा बाप झाला होता.



दारूच्या नादात जीव गमावणारा तरुण कर्नाटकमधील कोलार जिल्ह्यातील रहिवासी होता. त्याचे नाव कार्तिक असे होते. वेंकट रेड्डी, सुब्रह्मण्यम आणि इतर तीन जणांसोबत दारू पिण्यासाठी पैज लावली होती. पैज जिंकल्यास कार्तिकला दहा हजार रुपये मिळणार होते.



पैशांसाठी कार्तिकने दारुच्या पाच बाटल्या खरेदी केल्या आणि एकामागून एक रित्या करत गेला. एवढी दारू एकदम पोटात गेल्यामुळे कार्तिकची तब्येत बिघडली आणि थोड्याच वेळात त्याचा मृत्यू झाला. मित्रंनी कार्तिकला तब्येत बिघडताच मुलबागल येथील रुग्णालयात नेले. उपचार सुरू असताना कार्तिकचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आतापर्यंत वेंकट रेड्डी आणि सुब्रह्मण्यम यांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दरवर्षी सुमारे २६ लाख नागरिकांचा दारू प्यायल्यामुळे मृत्यू होतो. जगभरात वेगवेगळ्या कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूपैकी ४.७ टक्के मृत्यू हे दारू पिण्यामुळेच होतात.
Comments
Add Comment

Indian Warships in Thailand : थायलंडमध्ये भारतीय युद्धनौकांचा संयुक्त सराव; सागरी सुरक्षेसाठी वाढला समन्वय

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती या युद्धनौकांनी

Hindu religion : धर्मांतरित हिंदूंच्या मनात जर खरी श्रद्धा असेल, तर त्यांना मंदिरात प्रवेश करण्याचा आणि पूजा करण्याचा अधिकार

नवी दिल्ली : जर एखादी व्यक्ती जन्माने हिंदू (Hindu) नसतानाही तिला मंदिरात प्रवेश नाकारला जाऊ शकतो का? याबाबत ती

थायलंडमध्ये भारतीय युद्धनौकांचा संयुक्त सराव; सागरी सुरक्षेसाठी वाढला समन्वय

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती या युद्धनौकांनी

अरुणाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलन; १४ गावांतील ३१०० हून अधिक नागरिक बाधित

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील लोअर सियांग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या ढगफुटी आणि भूस्खलनामुळे

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला