पैज जिंकण्यासाठी दारू पिणे भोवले, तरुणाचा मृत्यू

बंगळुरू : मित्रांमध्ये जास्तीत जास्त दारू पिण्याची पैज लागली. ही पैज जिंकण्यासाठी पाणी, सोडा किंवा कोल्डड्रिंक न मिसळता थेट बाटली तोंडाला लावून दारू प्यायची होती. जो या पद्धतीने जास्तीत जास्त दारू पिऊ शकेल तो दहा हजार रुपये जिंकेल, असे ठरले. पैजेसाठी सर्व मित्रांनी पैसे लावले. पैज जिंकण्याकरिता एका तरुणाने एकदम पाच बाटल्या दारू खरेदी केली. तरुण एकामागून एक बाटल्या रित्या करत गेला. थोड्या वेळात भरमसाठ दारू प्यायल्यामुळे तब्येत बिघडली आणि तरुणाचा मृत्यू झाला. भरमसाठ दारू प्यायल्यामुळे मृत्यू झालेला तरुण २१ वर्षांचा होता. वर्षभरापूर्वी त्याचे लग्न झाले होते आणि आठच दिवसांपूर्वी तो मुलीचा बाप झाला होता.



दारूच्या नादात जीव गमावणारा तरुण कर्नाटकमधील कोलार जिल्ह्यातील रहिवासी होता. त्याचे नाव कार्तिक असे होते. वेंकट रेड्डी, सुब्रह्मण्यम आणि इतर तीन जणांसोबत दारू पिण्यासाठी पैज लावली होती. पैज जिंकल्यास कार्तिकला दहा हजार रुपये मिळणार होते.



पैशांसाठी कार्तिकने दारुच्या पाच बाटल्या खरेदी केल्या आणि एकामागून एक रित्या करत गेला. एवढी दारू एकदम पोटात गेल्यामुळे कार्तिकची तब्येत बिघडली आणि थोड्याच वेळात त्याचा मृत्यू झाला. मित्रंनी कार्तिकला तब्येत बिघडताच मुलबागल येथील रुग्णालयात नेले. उपचार सुरू असताना कार्तिकचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आतापर्यंत वेंकट रेड्डी आणि सुब्रह्मण्यम यांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दरवर्षी सुमारे २६ लाख नागरिकांचा दारू प्यायल्यामुळे मृत्यू होतो. जगभरात वेगवेगळ्या कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूपैकी ४.७ टक्के मृत्यू हे दारू पिण्यामुळेच होतात.
Comments
Add Comment

अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ दुर्मिळ वस्तू, वस्तूची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

America returns 657 rare items to India : भारतातून अनेक प्राचीन वस्तू, मूर्ती यांची त्यांच्या दुर्मिळतेमुळे परदेशांमध्ये तस्करी (smuggling)

1 may labour day : १ मे रोजी बँका सुरू राहणार की बंद ? नवीन माहिती पहा

मुंबई : उद्या, १ मे रोजी बँकांना सुट्टी असणार का? १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झालेल्या कामगार चळवळीची आठवण

Crime Jharkhand : आधी प्रियकरावर पैसा उडवला नंतर प्रियकराच्या प्रेमात भयानक करून बसली, थेट आईलाच...

Jharkhand Crime : झारखंडची राजधानी रांचीमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका ५० वर्षाच्या महिलेची हत्या

Raja Raghuvanshi Case: 11 महिन्यांनतर सोनम जेलमधून बाहेर, पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित

शिलॉन्ग  Shillong : राजा रघुवंशी हत्या प्रकरणाने संपूर्ण देशभरात खळबळ उडवून दिली होती. याच राजा रघुवंशी हत्या प्रकरणात

भीषण ! एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग , अल्पवयीन मुलीसह 5 जणांचा करून अंत

दिल्ली : दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण दुर्घटना झाली आहे. मुलाची नोकरी मिळवण्याची इच्छा पूर्ण

Wall collapse near Hospital : रुग्णालयाजवळची संरक्षक भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू, मृतांमध्ये ३ मुलांचा समावेश

बंगळुरू : कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूत बोअरिंग आणि लेडी कर्झन रुग्णालयाजवळची संरक्षक भिंत कोसळून सात