पैज जिंकण्यासाठी दारू पिणे भोवले, तरुणाचा मृत्यू

  49

बंगळुरू : मित्रांमध्ये जास्तीत जास्त दारू पिण्याची पैज लागली. ही पैज जिंकण्यासाठी पाणी, सोडा किंवा कोल्डड्रिंक न मिसळता थेट बाटली तोंडाला लावून दारू प्यायची होती. जो या पद्धतीने जास्तीत जास्त दारू पिऊ शकेल तो दहा हजार रुपये जिंकेल, असे ठरले. पैजेसाठी सर्व मित्रांनी पैसे लावले. पैज जिंकण्याकरिता एका तरुणाने एकदम पाच बाटल्या दारू खरेदी केली. तरुण एकामागून एक बाटल्या रित्या करत गेला. थोड्या वेळात भरमसाठ दारू प्यायल्यामुळे तब्येत बिघडली आणि तरुणाचा मृत्यू झाला. भरमसाठ दारू प्यायल्यामुळे मृत्यू झालेला तरुण २१ वर्षांचा होता. वर्षभरापूर्वी त्याचे लग्न झाले होते आणि आठच दिवसांपूर्वी तो मुलीचा बाप झाला होता.



दारूच्या नादात जीव गमावणारा तरुण कर्नाटकमधील कोलार जिल्ह्यातील रहिवासी होता. त्याचे नाव कार्तिक असे होते. वेंकट रेड्डी, सुब्रह्मण्यम आणि इतर तीन जणांसोबत दारू पिण्यासाठी पैज लावली होती. पैज जिंकल्यास कार्तिकला दहा हजार रुपये मिळणार होते.



पैशांसाठी कार्तिकने दारुच्या पाच बाटल्या खरेदी केल्या आणि एकामागून एक रित्या करत गेला. एवढी दारू एकदम पोटात गेल्यामुळे कार्तिकची तब्येत बिघडली आणि थोड्याच वेळात त्याचा मृत्यू झाला. मित्रंनी कार्तिकला तब्येत बिघडताच मुलबागल येथील रुग्णालयात नेले. उपचार सुरू असताना कार्तिकचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आतापर्यंत वेंकट रेड्डी आणि सुब्रह्मण्यम यांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दरवर्षी सुमारे २६ लाख नागरिकांचा दारू प्यायल्यामुळे मृत्यू होतो. जगभरात वेगवेगळ्या कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूपैकी ४.७ टक्के मृत्यू हे दारू पिण्यामुळेच होतात.
Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे