६५ वर्षांनंतर महाराष्ट्र कुठे उभा आहे?

  32

महाराष्ट्र दिन: इतिहास, वास्तव आणि उद्याची दिशा


आज १ मे – महाराष्ट्र दिन! ६५ वर्षांपूर्वी, १९६० साली, असंख्य आंदोलनं, बलिदान आणि लोकशक्तीच्या जोरावर संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. महाराष्ट्राच्या भूमीला स्वतंत्र अस्तित्व मिळालं. पण… आज ६५ वर्षांनंतर प्रश्न पडतोय – आपण कुठे आहोत?


ही तीच भूमी जिथे ज्ञानेश्वरांनी अध्यात्माचा दीप लावला… तुकारामांनी भक्तीची वाट दाखवली… शिवरायांनी स्वराज्याचं स्वप्न उभं केलं… आणि फुले, शाहू, आंबेडकर, कर्वे यांनी सामाजिक समतेचा पाया रचला.



संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी १९६० मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी एक स्पष्ट दिशा दिली – कृषी-औद्योगिक समन्वय, आणि शेतकरी-कामगार-सरकारी नोकर वर्गाचा विकास. परंतु नंतर काय झालं? साठ, सत्तरीच्या दशकानंतर शेती कोलमडली… औद्योगिक वाढ थांबली… सेवा क्षेत्राने उचल घेतली, पण समाजात एक नवी तफावत निर्माण झाली – शहरं श्रीमंत, ग्रामीण भाग उपेक्षित!


मुंबई-पुणे-नाशिकचा विकासाचा त्रिकोण तयार झाला… पण मराठवाडा, विदर्भ, खान्देश, कोकण हे त्रासदायक वास्तवात अडकले.


समाजरचना बदलली.. पूर्वी शेतकरी, कामगार, मध्यमवर्ग होता. आता नव-सरंजामदार, नव-भांडवलदार आणि उच्चभ्रू वर्ग पुढे आलाय.


मोबाईल, इंटरनेट आणि AI – या तीन गोष्टींवर आज महाराष्ट्राचं नियंत्रण आहे. पण कायदा-सुव्यवस्था ढासळलीय, शिक्षणाची गुणवत्ता घसरलीय, पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय… विद्यापीठांचा दर्जा घसरलाय… जिथून देशाला नाटक, चित्रपट, साहित्य मिळालं, त्याच महाराष्ट्रात आज कलावंत उपेक्षित आहेत. समाजातील विचारशीलता मावळत चाललीय…


आजच्या महाराष्ट्राला गरज आहे नवीन सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनाची. समतेवर, न्यायावर आधारित तंत्रज्ञानयुक्त, सर्वसमावेशक विकासाची. महाराष्ट्राला गरज आहे एका दूरदर्शी कार्यक्रमाची. भविष्यामध्ये कोणत्या दिशेने जायचे, कसे जायचे याचा पक्का कृती कार्यक्रम आखून, त्या दिशेने वाटचाल करण्याची. वेळ अजूनही गेलेली नाही. सगळ्यांना विश्वासात घेऊन हे करणं शक्य आहे. तितका समंजसपणा अजूनही महाराष्ट्रात नक्की आहे. मराठी मनगटांमध्ये तितकी ताकद अजूनही आहे. गरज आहे दिशा देण्याची. इतिहासाच्या केवळ गप्पा मारुन उपयोग नाही… त्यातून शिकून, उभं राहायचं असतं! इतिहासातून प्रेरणा घ्यायची असते, त्यातील चुकांमधून काही तरी शिकायचं असतं... हे ओळखलं नाही, तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत.


आज राज्य स्थापना दिवस... तर "आता तरी जागं व्हायचं का?" असा आत्मपरीक्षणाचा हा क्षण आहे.

Comments
Add Comment

Lavani Gaurav Awards 2025: पडद्यामागील कलाकारांचा होणार सन्मान, यंदाचे लावणी कलावंत महासंघाचे पुरस्कार जाहीर

मुंबई: लावणी कलावंत महासंघ, मुंबई यांचा ११ वा वर्धापनदिन आणि पुरस्कार सोहळा २०२५ मंगळवार, दिनांक २४ जून, २०२५ रोजी

"जय जय स्वामी समर्थ" च्या १५०० भागांच्या निमित्ताने, पुण्यातील धनकवडी मठात दीड हजार लाडूंचे वाटप!

अक्षय मुडावदकर आणि नचिकेत बर्वे यांच्या हस्ते स्वामी भक्तांना १५०० बेसन लाडूचे प्रसादरूप वाटप  पुणे: कलर्स

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Marathi Movie: 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' महेश मांजरेकर दिग्दर्शित सिनेमाचं पोस्टर रिलीज

Marathi Movie: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त, महेश मांजरेकर दिग्दर्शित बहुप्रतिक्षित ‘पुन्हा

Tata Motors: टाटा मोटर्सकडून देशभरात मान्‍सून चेक-अप कॅम्‍पचे आयोजन

विद्यमान ग्राहकांसाठी मोफत वेईकल तपासणी आणि आकर्षक फायदे मुंबई: टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या

Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांची आयसीटीला १५१ कोटींची देणगी म्हणाले....

प्रतिनिधी: रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) ला तब्बल