Weather: मे महिन्यात वाढणार जबरदस्त उकाडा, हवामान विभागाने जारी केला अलर्ट

नवी दिल्ली: आधीच एप्रिलमध्ये उकाड्याने हैराण झालेल्या देशभरातली लोकांना मे महिन्यातही काही दिलासा मिळणार नाही आहे. मे महिन्यात देशभरात उकाड्याचे प्रमाण आणखी वाढणार आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या पूर्वानुमानानुसार यावेळेस उष्णतेची लाट सामान्यपणे १ ते ३ दिवसांऐवजी २ ते ७ दिवसांपर्यंत राहू शकते. याशिवाय, या दरम्यान दिवस आणि रात्री दोन्हीचे तापमान सामान्यपेक्षा अधिक असणार आहे.


देशातील अधिकांश भागात यावेळेस कमाल आणि किमान तापमान हे सामान्य तापमानापेक्षा अधिक असेल. दरम्यान, दक्षिण आणि पूर्व भारतातील काही भागांमध्ये तापमान सामान्यपेक्षा कमी राहील असा अंदाज आहे. विशेषकरून उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतात उकाड्याचे प्रमाण प्रचंड असेल.


त्यातच दिलासादायक बाब म्हणजे मे महिन्यात देशभरात सामान्यपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. यावेळेस सामान्यपेक्षा १० टक्के अधिक पाऊस होईल असा अंदाज आहे. उत्तर, मध्य, पश्चिम आणि दक्षिण भारतातील काही भागांमध्ये सामान्यपेक्षा अधिक पाऊस होऊ शकतो. येथे साधारणपणे या महिन्यात देशभरातली ६४ मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस होतो.


हवामान विभागाच्या माहितीनुसार, मे महिन्याच्या शेवटची मान्सून केरळमध्ये दाखल होईल. तसेच यावेळेस संपूर्ण देशात मान्सून सामान्यपेक्षा १०५ टक्के राहील. एल निनो आणि इंडियन ओनल डायपोलची स्थिती न्यूट्रल राहील.

Comments
Add Comment

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या

आग्र्यात दुर्गा मातेच्या विसर्जनावेळी ६ जण बुडाले

दोन तरुणांचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश आगरामध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना ६ जण नदीमध्ये

आंध्र प्रदेशला चक्रीवादळाचा धोका

बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला

जगाला हादरवणारी चीनची 'ती' धोकादायक मशीन... पण भारताने आकाशातच विणले सुरक्षा-जाल!

चीनने बनवले आकाशात तरंगणारे 'पवन टर्बाइन', तर भारताने 'स्ट्रेटोस्फीयर एअरशिप'ने सीमांवर ठेवलीय पाळत नवी दिल्ली: