Weather: मे महिन्यात वाढणार जबरदस्त उकाडा, हवामान विभागाने जारी केला अलर्ट

नवी दिल्ली: आधीच एप्रिलमध्ये उकाड्याने हैराण झालेल्या देशभरातली लोकांना मे महिन्यातही काही दिलासा मिळणार नाही आहे. मे महिन्यात देशभरात उकाड्याचे प्रमाण आणखी वाढणार आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या पूर्वानुमानानुसार यावेळेस उष्णतेची लाट सामान्यपणे १ ते ३ दिवसांऐवजी २ ते ७ दिवसांपर्यंत राहू शकते. याशिवाय, या दरम्यान दिवस आणि रात्री दोन्हीचे तापमान सामान्यपेक्षा अधिक असणार आहे.


देशातील अधिकांश भागात यावेळेस कमाल आणि किमान तापमान हे सामान्य तापमानापेक्षा अधिक असेल. दरम्यान, दक्षिण आणि पूर्व भारतातील काही भागांमध्ये तापमान सामान्यपेक्षा कमी राहील असा अंदाज आहे. विशेषकरून उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतात उकाड्याचे प्रमाण प्रचंड असेल.


त्यातच दिलासादायक बाब म्हणजे मे महिन्यात देशभरात सामान्यपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. यावेळेस सामान्यपेक्षा १० टक्के अधिक पाऊस होईल असा अंदाज आहे. उत्तर, मध्य, पश्चिम आणि दक्षिण भारतातील काही भागांमध्ये सामान्यपेक्षा अधिक पाऊस होऊ शकतो. येथे साधारणपणे या महिन्यात देशभरातली ६४ मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस होतो.


हवामान विभागाच्या माहितीनुसार, मे महिन्याच्या शेवटची मान्सून केरळमध्ये दाखल होईल. तसेच यावेळेस संपूर्ण देशात मान्सून सामान्यपेक्षा १०५ टक्के राहील. एल निनो आणि इंडियन ओनल डायपोलची स्थिती न्यूट्रल राहील.

Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च