Weather: मे महिन्यात वाढणार जबरदस्त उकाडा, हवामान विभागाने जारी केला अलर्ट

नवी दिल्ली: आधीच एप्रिलमध्ये उकाड्याने हैराण झालेल्या देशभरातली लोकांना मे महिन्यातही काही दिलासा मिळणार नाही आहे. मे महिन्यात देशभरात उकाड्याचे प्रमाण आणखी वाढणार आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या पूर्वानुमानानुसार यावेळेस उष्णतेची लाट सामान्यपणे १ ते ३ दिवसांऐवजी २ ते ७ दिवसांपर्यंत राहू शकते. याशिवाय, या दरम्यान दिवस आणि रात्री दोन्हीचे तापमान सामान्यपेक्षा अधिक असणार आहे.


देशातील अधिकांश भागात यावेळेस कमाल आणि किमान तापमान हे सामान्य तापमानापेक्षा अधिक असेल. दरम्यान, दक्षिण आणि पूर्व भारतातील काही भागांमध्ये तापमान सामान्यपेक्षा कमी राहील असा अंदाज आहे. विशेषकरून उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतात उकाड्याचे प्रमाण प्रचंड असेल.


त्यातच दिलासादायक बाब म्हणजे मे महिन्यात देशभरात सामान्यपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. यावेळेस सामान्यपेक्षा १० टक्के अधिक पाऊस होईल असा अंदाज आहे. उत्तर, मध्य, पश्चिम आणि दक्षिण भारतातील काही भागांमध्ये सामान्यपेक्षा अधिक पाऊस होऊ शकतो. येथे साधारणपणे या महिन्यात देशभरातली ६४ मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस होतो.


हवामान विभागाच्या माहितीनुसार, मे महिन्याच्या शेवटची मान्सून केरळमध्ये दाखल होईल. तसेच यावेळेस संपूर्ण देशात मान्सून सामान्यपेक्षा १०५ टक्के राहील. एल निनो आणि इंडियन ओनल डायपोलची स्थिती न्यूट्रल राहील.

Comments
Add Comment

देशभरात ऑनलाईन गेमिंग आणि बेटिंगवर बंदी येणार ?

नवी दिल्ली: देशात वाढत्या ऑनलाईन गेमिंग आणि जुगाराच्या प्रकरणांची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.

दुचाकीच्या धडकेत बसला भीषण आग! २० जणांचा मृत्यू, चंद्राबाबू नायडूंनी व्यक्त केले दु:ख

आंध्र प्रदेशः हैदराबाद-बंगळूर महामार्गावर कर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकुर गावाजवळ आज पहाटे आगीबाबत एक मोठी

भयंकर धक्कादायक! दिवाळीत 'कार्बाइड गन'मुळे १४ मुलांना कायमचे अंधत्व; १२५ हून अधिक जखमी!

भोपाळ : दरवर्षी दिवाळीला फटाक्यांचे वेगवेगळे ट्रेंड समोर येत असातात, यामध्ये चकरीपासून ते रॉकेटपर्यंत वेगवेगळे

सैन्यासाठी ७९,००० कोटींचे मोठे निर्णय!

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने आज भारतीय

देशभरात मतदार यादी बनवण्याचे मोठे काम सुरू!

पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुडुचेरी, तामिळनाडूत सर्वप्रथम एसआयआर प्रक्रिया नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने देशभरातील

महिला आणि ट्रान्सजेंडरसाठी मोफत प्रवास; काय आहे 'सहेली स्मार्ट कार्ड' योजना?

नवी दिल्ली : भाऊबीजच्या निमित्ताने दिल्ली सरकार महिला आणि ट्रान्सजेंडर लोकांना एक मोठी भेट देणार आहे. आजपासून