Udaykumar Shiroorkar : प्रॉब्लेम असतातच, सोल्यूशन शोधा

‘आता थांबायचं नाय’चे ‘रियल हिरो’ दै. प्रहार कार्यालयात


मुंबई : आय अ‍ॅम ऑलवेज विनर, मी कधीही पराभूत झालो नाही. याचं कारण प्रत्येक प्रॉब्लेमचे सोल्यूशन असते, ते शोधा असे स्पष्ट मत मुंबई महानगरपालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांनी व्यक्त केले. 'आता थांबायचं नाय'चे (Ata Thambaycha Nay) 'रियल हिरो' उदय शिरुरकर (Udaykumar Shiroorkar) यांनी दै. प्रहार कार्यालयाला (Prahaar NewsLine) भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.



१ मे रोजी राज्यभरात महाराष्ट्र दिनासोबत (Maharashtra Day) 'कामगार दिन' (Labour Day) साजरा केला जातो. या कामगार दिनाचे औचित्य साधत मुंबई महानगरपालिकेचे सिंघम म्हणून ओळख असलेले 'उदयकुमार शिरुरकर' (Udaykumar Shiroorkar) यांच्या जीवनचरित्रावर आधारित 'आता थांबायचं नाय!' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. याच अानुषंगाने दै. प्रहारच्या कार्यालयात उदयकुमार शिरुरकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी दै. प्रहारचे संपादक डॉ. सुकृत खांडेकर, लेखा आणि प्रशासन विभाग प्रमुख ज्ञानेश सावंत उपस्थित होते. त्यांच्या हस्ते उदयकुमार शिरुरकर यांना शाल आणि तुळशीचे रोप देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्याशी एकूणच चित्रपट आणि त्यांच्या कार्याशी संबंधित विषयांवर गप्पांच्या ओघात चित्रपटाविषयीची मूळ कथा जाणून घेण्यात आली. यावेळी संपादकीय आणि वेब विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.



या संवादादरम्यान मूळचे बेळगावातील एक तरुण मुंबईच्या प्रेमापोटी कसा मुंबई शहरात नोकरीनिमित्त स्थायिक झाला, हे सांगताना, शिरुरकर यांनी त्यांच्या जीवनातील मुंबई महानगरपालिकेत अधिकारी म्हणून काम करताना आलेले अनेक प्रसंग ऐकविले. त्यातून आणखी एखादा चित्रपट तयार होईल, असा खजाना त्यांच्यापाशी असल्याचे दिसले. 'आता थांबायचं नाय' (Ata Thambaycha Nay) या चित्रपटापर्यंतचा प्रवास त्यांनी सांगितला. या चित्रपटाची कथा एका सत्यकथेवर आधारित असून, एक प्रेरणादायक आणि सकारात्मक ऊर्जा देणारी आहे. ''जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करून थांबण्याऐवजी अधिक मेहनत आणि ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे'' असा संदेश या चित्रपटातून दिला गेला आहे. मुंबई महानगर पालिकेमध्ये २०१६ मध्ये घडलेल्या एका घटनेपासून प्रेरित होऊन ही कथा रचली आहे. तसेच मराठी शाळा वाचवण्यासाठी काही कारणास्तव दहावी उत्तीर्ण होऊ न शकलेल्या कर्मचाऱ्यांनी दहावीच्या परीक्षेला बसावे, असा फतवा काढून कर्मचाऱ्यांनी रात्रशाळेत शिकून दहावीची परीक्षा द्यावी असा उदयकुमार शिरुरकर (Udaykumar Shiroorkar) यांनी आग्रह केला. दिवसभर राबणाऱ्या, घाणीने माखलेल्या कर्मचाऱ्यांच्या हातात अभ्यासाची पुस्तकं देण्याच्या सामाजिक 'धाडसा'ची गोष्ट जगासमोर आणण्यासाठी झी स्टुडिओने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या सिनेमात उत्कृष्ट मराठी कलाकारांची मोठी फौज आहे. अभिनेते भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हनमगर, किरण खोजे, प्रवीण डाळिंबकर, ओम भूतकर, पर्ण पेठे, रुपा बोरगांवकर आणि आशुतोष गोवारीकर तसेच आणखी काही बालकलाकार आहेत. शिवराज वायचळ दिग्दर्शित, उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर, निधी हिरानंदानी, धरम वालिया निर्मित मराठी चित्रपट ‘आता थांबायचं नाय!’ १ मे २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे.


या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकप्रिय अभिनेते शिवराज वायचळ यांनी केले असून शिवराज वायचळ, ओमकार गोखले आणि अरविंद जगताप यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी या चित्रपटात उदयकुमार शिरूरकर यांची भूमिका साकारली आहे.

Comments
Add Comment

CANNES फेस्टिव्हलमध्ये भयंकर घडलं, मॉडेलला बेदम मारहाण

Cannes Film Festival : सध्या सोशल मीडियावर बहुप्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हलची जोरदार चर्चा सुरु आहे. कान्स फेस्टिव्हल हा

'Deool Band-2' Movie : ‘देऊळ बंद २’चा महाराष्ट्रभर धुमाकूळ! पहिल्याच दिवशी शो हाऊसफुल

मुंबई : महाराष्ट्रभर ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा गजर घुमवत बहुचर्चित मराठी चित्रपट ‘देऊळ बंद २ : आता परीक्षा

Tumbadchi Manjula Trailer : रहस्य आणि कॉमेडीचा भन्नाट तडका असलेल्या ‘तुंबाडची मंजुळा’चा ट्रेलर प्रदर्शित

सध्या सर्वत्र चर्चेचा विषय असलेला ,आपल्या पोस्टर, टिझर आणि गाण्यांमधून प्रचंड उत्सुकता निर्माण केलेल्या झी

Cyprus and India : सायप्रस आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक संबंध दृढ

सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस 'इश्का' बॉलिवूड चित्रपटाचा थाटात मुहूर्त मुंबई :

Punjabi Singer Inder Kaur Death : ६ दिवस बेपत्ता असलेल्या इंदर कौरचा दुर्दैवी मृत्यू; कालव्यात सापडला मृतदेह

पंजाब : पंजाबी मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध

'Raja Shivaji' Movie : ‘राजा शिवाजी’चा तिसऱ्या आठवड्यातही दबदबा; ७५ कोटींचे बजेट वसूल, आता १०० कोटींकडे वाटचाल!

मुंबई : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर