'या' पाक कलाकारांवर बंदी, पण 'हे' अजून का मोकळे? भारत सरकारच्या निर्णयावर प्रश्न!

नवी दिल्ली : दहशतवादाचा डाव मांडणाऱ्या पाकिस्तानवर भारताने आता डिजिटल मारा सुरू केला आहे. पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सोशल मीडियावरून पाक कलाकारांना थेट तोंडावर दरवाजा बंद केला आहे.


इन्स्टाग्रामवर कायदेशीर आदेशाच्या आधारे भारतातील युजर्ससाठी अनेक पाकिस्तानी कलाकारांची खाती बंद करण्यात आली आहेत. आता या कलाकारांना भारतात प्रसिद्धी, फॉलोअर्स आणि मार्केटिंगचा फायदा घेता येणार नाही.



जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव अधिक तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या कायदेशीर विनंतीनुसार इन्स्टाग्रामवर काही नामवंत पाकिस्तानी कलाकारांची खाती भारतात ब्लॉक करण्यात आली आहेत.


भारतीय युजर्सना या खात्यांवर क्लिक करताच "हे खाते भारतात उपलब्ध नाही. आम्ही कायदेशीर विनंतीनुसार हे मर्यादित केले आहे," असा संदेश दिसत आहे.



जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांविरोधात संताप उफाळून आला आहे. या पार्श्वभूमीवर, भारत सरकारच्या कायदेशीर सूचनेनुसार ‘इन्स्टाग्राम’ने महिरा खान, हानिया आमिर, सनाम सईद, अली झफर, बिलाल अब्बास, इम्रान अब्बास, आयझा खान आणि इक़रा अज़ीज यांचे अकाऊंट्स भारतात ब्लॉक केले आहेत.


भारतीय युजर्सना या कलाकारांचे प्रोफाइल ओपन करताना आता स्पष्टपणे असा मेसेज दिसतो – “This account is not available in India. This is because we complied with a legal request to restrict this content.”


परंतु येथेच खरी विसंगती दिसून येते. फवाद खान, अतिफ असलम, सबा कमर, अदनान सिद्दीकी, हामजा अली अब्बासी, वीना मलिक, सरवत गिलानी यांच्यासारख्या अनेक पाकिस्तानी कलाकारांची अकाऊंट्स अजूनही भारतात पूर्णपणे दिसत आहेत आणि सक्रिय आहेत.


हे नेमकं कशामुळे? दहशतवादी देशाच्या कलाकारांवर अर्धवट कारवाई का? काहींवर बंदी, काहींना मोकळीक? असा दुहेरी निकष का?


या कारवाईमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत –
📌 भारत सरकारचे निकष नेमके काय आहेत?
📌 सगळ्या पाकिस्तानी कलाकारांवर एकसारखी बंदी का नाही?
📌 दहशतवादी हल्ल्यानंतरही सोशल मीडिया अकाऊंट्स का सुरू आहेत?


'अबीर गुलाल' या आगामी चित्रपटात फवाद खान झळकणार असल्याने त्याचे इन्स्टाग्राम अकाऊंट उघडे ठेवले गेले का? की काहींना ‘चाल’ द्यायची, तर काहींना ‘कारवाई’ करायची, असा खेळ सुरू आहे?


दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशाच्या कलाकारांचा भारतात सन्मान, प्रसिद्धी आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा रस्ता बंद व्हायला हवा, अशी मागणी आता सोशल मीडियावर जोर धरत आहे.

Comments
Add Comment

Vande Mataram : वंदे मातरमच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त पहिल्यांदाच लाल किल्ल्यावरून राष्ट्रगीत गायले जाणार

जेन-झींचं प्रतिनिधीत्व अधिक पाहायला मिळणार नवी दिल्ली : सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण मानला जाणाऱ्या

Agni-5 Mk2 : अग्नी-5 Mk2 मध्ये मोठे अपग्रेड; वजन 20 टक्क्यांनी घटल्याचा दावा, वाढणार मारक क्षमता

नवी दिल्ली : भारत आपल्या संरक्षण क्षमतेत सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करत आहे. ब्रह्मोस आणि अग्नी

Justice Yashwant Varma : न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावरील आरोप सिद्ध; संसदेत चौकशी समितीचा अहवाल सादर

नवी दिल्ली: न्यायाधीशांच्या अधिकृत निवासस्थानी जळित नोटांची बंडले सापडल्याप्रकरणी वादात सापडलेले माजी

Karnataka Bandh : कावेरी पाणीवाटपाच्या विरोधात कर्नाटक बंद; जाणून घ्या काय सुरू, काय राहणार बंद?

बंगळुरू : कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाने (CWMA) १२ ऑगस्टपासून पुढील १५ दिवस तमिळनाडूला दररोज १२ हजार क्युसेक

Ladakh Earthquake : लडाखमध्ये पहाटेच भूकंपाचा जोरदार धक्का! लेहमध्ये ५.५ रिश्टर स्केलचे हादरे, नागरिकांमध्ये घबराट

लेह : लडाखमधील लेह शहराला गुरुवारी पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का बसला. सकाळी सुमारे ६ वाजून ५ मिनिटांनी भूकंपाचे

'ATAGS' artillery gun is ready : १५ सेकंदात ३ हल्ले आणि ४८ किमीचा अचूक पल्ला; चीन-अमेरिकाही चकित

नवी दिल्ली: रणांगणावर भारताच्या सं