ठाणेकरांनो, आजच पुरेसे पाणी भरून ठेवा!

ठाणे शहरात काही भागात उद्या-परवा पाणीपुरवठा बंद


ठाणे (प्रतिनिधी): ठाणे महापालिकेला प्राधिकरणाकडून स्टेम होणारा पाणीपुरवठा शुक्रवार, दि. ०२ मे, २०२५ रोजी स. ९ ते शनिवार, ०३ मे, २०२५ रोजी रात्री. ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या काळात, ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचे नियोजन करून पूर्ण २४ तास पाणीपुरवठा बंद न ठेवता टप्प्याटप्प्याने एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.


परिणामी, शुक्रवार, दि. ०२ मे, २०२५ रोजी स. ९ ते रा. ९ पर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, बाळकूम, ब्रम्हांड, पवार नगर, कोठारी कम्पाऊंड, डोंगरीपाडा, वाघबीळ या भागात पाणीपुरवठा बंद राहील. तर शुक्रवार, दि. ०२ मे, २०२५ रोजी रा. ९ पासून शनिवार, ०३ मे, २०२५ रोजी स. ९ वाजेपर्यंत समता नगर, ऋतू पार्क, सिद्धेश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळवा आणि मुंब्रा येथील काही भाग येथे पाणीपुरवठा बंद राहील.


शटडाऊनच्या काळात स्टेम प्राधिकरणाकडून योजनेमधील दैनंदिन देखभाल व दुरुस्तीची कामे आणि चेने येथे जलमापक बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी. या पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Zero SPAD : EMU Local च्या सिग्नल प्रणालीत सुधारणा, मध्य रेल्वेचा सुरक्षिततेवर भर

मुंबई : मध्य रेल्वेने मुंबई उपनगरीय रेल्वेतील प्रवासी आणि रेल्वे संचालनाची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी

Smartphone : कमी बजेटमध्ये प्रीमियम अनुभव देणारा स्मार्टफोन

फक्त १० हजारांच्या आत नवा झेनो २००' स्मार्टफोन लाँच मुंबई : स्टायलिश आणि इनोव्हेटिव्ह स्मार्टफोनसाठी ओळखली

महिला व बाल विकास विभागातील बदल्या आता केंद्रित ऑनलाइन पद्धतीने

मुंबई: महिला व बाल विकास विभागातील सर्व पदांच्या बदल्या आता केंद्रित ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असल्याची

RR VS DC : कर्णधार रियान परागलाच हटवले, वाचा कोण झाला नवा कर्णधार ?

IPL 2026 : आयपीएल २०२६ चा ५२ वा सामना आज जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सुरू आहे. दुखापतीमुळे या सामन्यातून

महाराष्ट्राच्या विकासाच्या आलेखाची राष्ट्रीय स्तरावर दखल

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५ 'बालस्नेही' आणि 'जलसमृद्धी'मध्ये राज्यातील ग्रामपंचायती देशात प्रथम नवी दिल्ली :

Nashik TCS Case : नाशिक ‘कॉर्पोरेट जिहाद’प्रकरणी ५० पानांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर

मुंबई : नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीतील ‘कॉर्पोरेट जिहाद’प्रकरणी सखोल चौकशी करून राष्ट्रीय महिला आयोगाने