बेशरम पाकिस्तान : पाकिस्तानला आपल्या लोकांचीही पर्वा नाही!

स्वदेशी परतण्यासाठी पाकड्यांची तळमळ; अटारी बॉर्डर सकाळपासून बंद


नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताने कठोर पावले उचलत, देशातील पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले. मात्र या निर्णयानंतर पाकिस्तानचा असंवेदनशील आणि बेशरम चेहरा पुन्हा समोर आला आहे.


आज सकाळपासून शेकडो पाकिस्तानी नागरिक अटारी बॉर्डरवर अडकले असून, पाकिस्तानने अद्याप गेट उघडलेले नाहीत. यावरून पाकिस्तान आपल्या नागरिकांनाही परत घेण्यास तयार नाही, ही अत्यंत धक्कादायक बाब आहे.


पाकिस्तान सरकारची ही भूमिका माणुसकीला काळिमा फासणारी आहे. आपल्या देशातील नागरिक अडचणीत असतानाही त्यांना मदत करणे सोडून, पाकिस्तान शांत राहून त्यांची हेळसांड करत आहे. हेच पाकिस्तानचे खरे स्वरूप दर्शवते. देश चालवण्याची जबाबदारी असलेल्या सरकारला ना मानवतेची जाणीव आहे ना आंतरराष्ट्रीय नीतीचे भान.


पहलगाममध्ये जे काही घडले, ते अपघात नव्हता. तो पाकिस्तान पुरस्कृत हल्ला होता. अशा भ्याड कारवायांमुळे पाकिस्तानने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो दहशतवाद्यांचा सुरक्षित आसरा आहे. आता तर हे स्पष्ट झाले आहे की पाकिस्तान केवळ भारताच्या विरोधातच नाही, तर आपल्या नागरिकांच्याही विरोधात आहे.


पाकिस्तानकडून अटारी बॉर्डरवर सकाळपासून गेट उघडण्यात आलेले नाहीत. पाकिस्तान सरकार त्यांच्या नागरिकांना देखील परत घेण्यास तयार नाही आणि भारतीय नागरिकांना देखील भारतात परत येण्याची अनुमती दिली जात नाही, त्यामुळे परिस्थिती चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


भारतीय इमिग्रेशन काउंटरवर अधिकारी पाकिस्तानकडून गेट उघडण्याची वाट पाहत आहेत. अटारी सीमेवर सकाळपासून आलेले पाकिस्तानी नागरिक वाहनांमध्ये पाकिस्तानच्या आदेशाची वाट पाहात आहेत. पाकिस्तानकडून गेट उघडल्यानंतर बीएसएफकडून दस्तऐवजांची तपासणी होईल आणि त्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना सीमा ओलांडण्याची परवानगी दिली जाईल. त्यानंतर इमिग्रेशन तपासणी होऊन ते त्यांच्या देशात परत जाऊ शकतील. सकाळपासून एकाही पाकिस्तानी नागरिकाने अद्याप सीमारेषा ओलांडलेली नाही.


दरम्यान, मोदी सरकार पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी कठोर पावले उचलत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानी लोकांना भारत देश सोडण्याचे आदेश दिले. भारत सरकारने पाकिस्तानला चोख उत्तर देत राष्ट्रीय सुरक्षेचा निर्णय घेतला आहे. परंतु, या संपूर्ण प्रकरणात पाकिस्तानने आपली लाचारी आणि अमानवी वृत्ती पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

Comments
Add Comment

MSP : खरीप पिकांच्या हमीभावात मोठी वाढ

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी,

Shani Shingnapur : शनी शिंगणापुरात 24 तास दर्शन सुरू, पण कधीपर्यंत ? जाणून घ्या

शनीभक्तांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. शनी शिंगणापूर येथील शनि मंदिर आता 19 मे पर्यंत तब्बल 24 तास दर्शनासाठी खुले

Tamil Nadu : विजय यांचा पहिला ‘यू-टर्न’, विरोधकांच्या टीकेनंतर 'त्या' व्यक्तीची नियुक्ती रद्द

Tamil Nadu : तमिळनाडूच्या राजकारणात मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी घेतलेला एक मोठा निर्णय कालपासून चर्चेत राहिला. त्या

Supreme Court : ....तो अॅट्रॉसिटीचा गुन्हा ठरणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय

Supreme Court : जातीय शिवीगाळ प्रकरणांमध्ये अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची नेमकी मर्यादा काय आहे,

Prateek Yadav Death : अखिलेश यादव यांचे बंधू प्रतीक यादव यांचे संशयास्पद निधन; लखनौमध्ये खळबळ

लखनौ : उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मुलायम सिंह यादव यांचे धाकटे चिरंजीव आणि भाजप नेत्या अपर्णा यादव

Gold Silver Price Hike : एका झटक्यात बदलले सोन्या-चांदीचे भाव; केंद्र सरकारचा रात्रीत मोठा निर्णय; ग्राहकांच्या खिशाला कात्री

नवी दिल्ली : जर तुम्ही येत्या काही दिवसांत लग्नसराईसाठी दागिने खरेदी करण्याचा किंवा गुंतवणुकीसाठी सोने-चांदी