बेशरम पाकिस्तान : पाकिस्तानला आपल्या लोकांचीही पर्वा नाही!

स्वदेशी परतण्यासाठी पाकड्यांची तळमळ; अटारी बॉर्डर सकाळपासून बंद


नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताने कठोर पावले उचलत, देशातील पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले. मात्र या निर्णयानंतर पाकिस्तानचा असंवेदनशील आणि बेशरम चेहरा पुन्हा समोर आला आहे.


आज सकाळपासून शेकडो पाकिस्तानी नागरिक अटारी बॉर्डरवर अडकले असून, पाकिस्तानने अद्याप गेट उघडलेले नाहीत. यावरून पाकिस्तान आपल्या नागरिकांनाही परत घेण्यास तयार नाही, ही अत्यंत धक्कादायक बाब आहे.


पाकिस्तान सरकारची ही भूमिका माणुसकीला काळिमा फासणारी आहे. आपल्या देशातील नागरिक अडचणीत असतानाही त्यांना मदत करणे सोडून, पाकिस्तान शांत राहून त्यांची हेळसांड करत आहे. हेच पाकिस्तानचे खरे स्वरूप दर्शवते. देश चालवण्याची जबाबदारी असलेल्या सरकारला ना मानवतेची जाणीव आहे ना आंतरराष्ट्रीय नीतीचे भान.


पहलगाममध्ये जे काही घडले, ते अपघात नव्हता. तो पाकिस्तान पुरस्कृत हल्ला होता. अशा भ्याड कारवायांमुळे पाकिस्तानने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो दहशतवाद्यांचा सुरक्षित आसरा आहे. आता तर हे स्पष्ट झाले आहे की पाकिस्तान केवळ भारताच्या विरोधातच नाही, तर आपल्या नागरिकांच्याही विरोधात आहे.


पाकिस्तानकडून अटारी बॉर्डरवर सकाळपासून गेट उघडण्यात आलेले नाहीत. पाकिस्तान सरकार त्यांच्या नागरिकांना देखील परत घेण्यास तयार नाही आणि भारतीय नागरिकांना देखील भारतात परत येण्याची अनुमती दिली जात नाही, त्यामुळे परिस्थिती चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


भारतीय इमिग्रेशन काउंटरवर अधिकारी पाकिस्तानकडून गेट उघडण्याची वाट पाहत आहेत. अटारी सीमेवर सकाळपासून आलेले पाकिस्तानी नागरिक वाहनांमध्ये पाकिस्तानच्या आदेशाची वाट पाहात आहेत. पाकिस्तानकडून गेट उघडल्यानंतर बीएसएफकडून दस्तऐवजांची तपासणी होईल आणि त्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना सीमा ओलांडण्याची परवानगी दिली जाईल. त्यानंतर इमिग्रेशन तपासणी होऊन ते त्यांच्या देशात परत जाऊ शकतील. सकाळपासून एकाही पाकिस्तानी नागरिकाने अद्याप सीमारेषा ओलांडलेली नाही.


दरम्यान, मोदी सरकार पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी कठोर पावले उचलत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानी लोकांना भारत देश सोडण्याचे आदेश दिले. भारत सरकारने पाकिस्तानला चोख उत्तर देत राष्ट्रीय सुरक्षेचा निर्णय घेतला आहे. परंतु, या संपूर्ण प्रकरणात पाकिस्तानने आपली लाचारी आणि अमानवी वृत्ती पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

Comments
Add Comment

Khan Sir Coaching Classes Fire : खान सरांच्या कोचिंग सेंटरवर हल्ला; 'माझ्या यशामुळेच काही जणांना त्रास', प्रतिस्पर्धी संस्थांवर खान सरांचे गंभीर आरोप

पाटणा : बिहारमधील प्रसिद्ध शिक्षक आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून ओळखले जाणारे खान सर यांच्या कोचिंग

Surat ST Bus Accident : गुजरातमध्ये भीषण एसटी अपघातात ७ जणांचा होरपळून मृत्यू तर ४१ प्रवासी जखमी; जाणून घ्या नेमका कसा घडला अपघात

सुरत : गुजरातमधील सुरत जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) दोन बसमध्ये झालेल्या भीषण

Surat Bus Accident : सुरतमध्ये महाराष्ट्राच्या दोन 'एसटी' बसचा अपघात

सुरत : गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील बारडोली जवळून जाणाऱ्या धुळे हायवेवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या

Bomb Threat : अहमदाबादमध्ये खळबळ! स्पोर्ट्स क्लब उडवण्याची धमकी; पत्रात दाऊद आणि लष्कर-ए-तोयबाचा उल्लेख

अहमदाबाद: गुजरातची राजधानी अहमदाबादमधून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. अहमदाबादच्या प्रसिद्ध स्पोर्टस क्लबला

EPFO : युपीआयद्वारे पीएफ धारकांचे पैसे काही सेकंदांत खात्यात मिळणार

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या ८ कोटींहून अधिक सदस्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा

परदेशी नागरिकांसाठी व्हिसा नियमात बदल

केंद्र सरकारकडून नोंदणी प्रक्रिया अधिक कडक; लहान मुलांना दिलासा नवी दिल्ली : भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांचे