६ दिवसात भारतावर तब्बल १० लाख सायबर हल्ले! पाकिस्तानसह ५ देशांचा डिजिटल युध्द प्लॅन उघड!

महाराष्ट्र सायबर सेलच्या अहवालात मोठा खुलासा


मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतावर तब्बल १० लाख सायबर हल्ले झाल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. महाराष्ट्र सायबर सेलच्या ‘इकोज ऑफ पहलगाम’ या अहवालातून ही माहिती उघड झाली असून, यामागे पाकिस्तानसह मध्यपूर्व, मोरोक्को, बांगलादेश आणि इंडोनेशियातील इस्लामिक सायबर गटांचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे.


महाराष्ट्र सायबरचे एडीजी यशस्वी यादव यांनी सांगितले की, "हल्ल्यानंतर सायबर हल्ल्यांची लाट उसळली आहे. संरक्षण संस्थांना लक्ष्य करत अ‍ॅडव्हान्स पर्सिस्टंट थ्रेट ग्रुप 'टीम इन्सेन पीके' सर्वात सक्रिय आहे." या गटाने आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंग, सैनिक वेल्फेअर पोर्टल्स, आर्मी पब्लिक स्कूल यांना टार्गेट केलंय.



याशिवाय बांगलादेशी MTBD (मिस्ट्रियस टीम बांगलादेश) ने शैक्षणिक पोर्टल्स, ई-गव्हर्नन्स साइट्स आणि बँकिंग संस्थांवर मोठे DDoS व DNS हल्ले केले आहेत. इंडोनेशियन ‘इंडो हॅक्स सेक’ ने टेलिकॉम डेटाबेस उघड केला असून, डार्क वेबवर हजारो पासवर्ड लीक झालेत.


गोल्डन फाल्कन (मध्यपूर्व) आणि मोरोक्कन ड्रॅगन्स (उत्तर आफ्रिका) यांनी मालवेअरच्या माध्यमातून भारतीय आयटी इन्फ्रास्ट्रक्चरला लक्ष्य केलंय. हे हल्ले स्वयंपूर्ण न राहता संघटित पद्धतीने, एकत्रित रणनीतीने होत असल्याचेही अहवालात नमूद आहे.


२६ एप्रिलपासून सुरू झालेले हे हल्ले अजूनही सुरूच आहेत. रेल्वे, बँकिंग, इन्फ्रास्ट्रक्चर हे प्रमुख टार्गेट असून जिथे सायबर सुरक्षेची त्रुटी आहे, तिथे हल्लेखोर यशस्वी ठरले आहेत. डार्क वेबवर भारतीय डेटाचे 'टेराबाइट्स' प्रमाणात लीक झाल्याचं या अहवालात स्पष्टपणे नमूद आहे.

Comments
Add Comment

गांधीनगर रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास आधुनिक सुविधांनी होणार सज्ज

सीमा पवार गांधीनगर : जयपूरमधील गांधीनगर रेल्वेस्थानक लवकरच आधुनिक सुविधांनी सज्ज होणार आहे.‘अमृत भारत स्टेशन

पती संभाळ करत असला तरी आई मुलाकडून पालनपोषण खर्च मागू शकते

केरळ उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय तिरुवनंतपुरम  : पती जिवंत असेल आणि पत्नीचा सांभाळ करत असला तरीही आई

डेस्क, मीटिंग रूम आणि चॅट… ऑफिस अफेअर्समध्ये भारत आघाडीवर

नवी दिल्ली  : भारत ऑफिस रोमॅन्समध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. एशली मॅडिसन आणि युगोव्हच्या सर्व्हेनुसार ४०

राजस्थानच्या गौरवशाली इतिहासाची गाथा सांगणार जयपूर विधानसभेतील डिजिटल संग्रहालय

जयपूर : संपूर्ण विधानसभेचे कामकाज पेपरलेस करण्यासाठी आता डिजीटल पद्धतीचा वापर जयपूर विधानसभेत होणार आहे.

प्रयागराजमध्ये यमुना नदीच्या किनाऱ्यावर बनवणार पब्लिक प्लाझा पार्क

प्रयागराज : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने महाकुंभ २०२५च्या पार्श्वभूमीवर प्रयागराज येथे यमुना

‘अल फलाह’वर गुन्हे शाखेची कारवाई

नवी दिल्ली : दिल्ली स्फोट प्रकरणात फरिदाबादमधील अल फलाह युनिव्हर्सिटीही आरोपांच्या घेऱ्यात आहे. आहे. विद्यापीठ