उष्णतेचा कहर होणार! तापमान ४५°C ते ५५°C पर्यंत जाण्याचा इशारा!

मुंबई : देशातल्या विविध भागात उष्णतेचा कहर होणार असून तापमान ४५°C ते ५५°C पर्यंत जाण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तसेच १ मे ते २ जून २०२५ दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत घराबाहेर जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


या काळात सूर्यप्रकाशात फिरल्याने गुदमरल्यासारखे वाटणे, घाम न येणे, उलट्या, चक्कर येणे, उष्माघात (हीट स्ट्रोक) होऊ शकतो. अशा वेळी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.







घरी घ्या ही खबरदारी:




  • खोलीचा दरवाजा आणि खिडक्या थोड्या उघड्या ठेवा – हवा खेळती राहील.




  • मोबाईल फोन अत्यंत गरजेपुरता वापरा – उष्णतेने बॅटरीचा स्फोट होण्याची शक्यता!




  • शक्य असल्यास दर दोन तासांनी ३० मिनिटे विश्रांती घ्या.




  • घरातील AC २४-२५°C वर ठेवा – जास्त थंडपणा शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो.








शरीर थंड ठेवण्यासाठी हे प्या:




  • दही, ताक, उसाचा रस, लिंबूपाणी, नारळपाणी




  • थंड पाणी – दिवसात कमीत कमी ३ ते ४ लिटर पाणी प्या




  • गरम व तेलकट पदार्थ, चहा-कॉफी टाळा








गाडी चालवताना या गोष्टी लक्षात ठेवा:




  • सकाळी गाडीने प्रवास टाळा




  • गाडीतील गॅस सिलिंडर, लाइटर, परफ्यूम, कोल्ड्रिंक्स, बॅटर्‍या काढून टाका




  • कारच्या खिडक्या थोड्या उघड्या ठेवा (व्हेंटिलेशनसाठी)




  • कारचे टायर जास्त फुगवू नका – उष्णतेने फुटण्याचा धोका




  • इंधन टाकी पूर्ण भरू नका, संध्याकाळी इंधन भरा








सर्पदंश आणि विंचवांपासून सावधगिरी:




  • साप, विंचू उष्णतेमुळे थंड जागांचा शोध घेतात




  • बागेत, अंगणात आणि घरात तपासणी करा




  • शक्य असल्यास रात्री उघड्या पायाने फिरणे टाळा








वीज आणि इंधन सुरक्षेबाबत खबरदारी:




  • गॅस सिलिंडर उन्हात ठेवू नका




  • AC फक्त गरज असेल तेव्हाच वापरा




  • घरातील वीज मीटर आणि वायरिंग ओव्हरलोड होणार नाही याची खात्री करा



Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,