एटीएमपासून ते रेल्वे तिकीटापर्यंत....आजपासून देशात लागू होतायत हे नवे बदल

  67

नवी दिल्ली: आजपासून मे महिन्याची सुरूवात झाली आहे. महिन्याच्या पहिल्याच तारखेला देशात काही बदल लागू झाले आहेत ज्याचा परिणाम प्रत्येकाच्या खिशावर पाहायला मिळू शकतो. १ मे पासून देशात लागू झालेल्या नव्या नियमांवर नजर टाकल्यास आता १ मे पासून एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे. तसेच रेल्वेने तिकीट बुकिंगच्या नियमांमध्येही बदल केला आहे.



एटीएममधून पैसे काढणे होणार महाग


आज १ मे २०२५ पासून तुम्ही पैसे काढण्यासाठी एटीएम मशीनचा वापर करत असाल तर तुम्हाला अधिक चार्ज द्यावा लागेल. काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एनपीसीआयच्या प्रस्तावावर फीस वाढवण्यास परवानगी दिली होती. अशातच पहिल्या तारखेपासून जर ग्राहक आपल्या होम बँकेव्यतिरिक्त इतर एटीएममधून पैसे काढत असतील तर त्यांना प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर १७ रूपयांच्या ऐवजी १९ रूपये द्यावे लागतील. याशिवाय दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून बॅलन्स तपासल्यास ६ रूपयांच्या ऐवजी ७ रूपये द्यावे लागतील.



रेल्वेने बदलला हा नियम


१ मे २०२५ पासून होणारा दुसरा बदल हा रेल्वेशी संबंधित आहे. रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल होत आहे. आता वेटिंग तिकीट केवळ सामान्य डब्यामध्ये मान्य असेल. म्हणजेच जर तुमच्याकडे वेटिंग तिकीट असेल तर तुम्ही स्लीपर कोचमधून प्रवास करू शकत नाही. तसेच अॅडव्हान्स रिझर्वेशन पीरियड १२० दिवसांनी कमी होऊन ६० दिवस करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.

Kolkata Rape Case : लॉ विद्यार्थिनीवर बलात्कारप्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी, ममता सरकार निशाण्यावर

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकार संचालित दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजशी संबंधित सामूहिक बलात्काराचा एक

MP News : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील १९ इनोव्हामध्ये भरले २० लीटर डिझेल, मात्र निघालं १० लीटर पाणीच पाणी

डिझेल भरायला गेल्या अन् पाणी भरून आल्या... मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

JeM Terrorist Killed: उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या ३ दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू, एक ठार

उधमपूर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील एका दुर्गम जंगली भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथ रथयात्रेची आजपासून सुरुवात, रथ ओढणाऱ्या दोऱ्यांची आहेत 'खास' नावे

पुरी : ओडिशामधील पुरी येथे दरवर्षी होणाऱ्या जगन्नाथ रथयात्रेला आजपासून म्हणजेच शुक्रवार, २७ जूनपासून झालेली