एटीएमपासून ते रेल्वे तिकीटापर्यंत....आजपासून देशात लागू होतायत हे नवे बदल

नवी दिल्ली: आजपासून मे महिन्याची सुरूवात झाली आहे. महिन्याच्या पहिल्याच तारखेला देशात काही बदल लागू झाले आहेत ज्याचा परिणाम प्रत्येकाच्या खिशावर पाहायला मिळू शकतो. १ मे पासून देशात लागू झालेल्या नव्या नियमांवर नजर टाकल्यास आता १ मे पासून एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे. तसेच रेल्वेने तिकीट बुकिंगच्या नियमांमध्येही बदल केला आहे.



एटीएममधून पैसे काढणे होणार महाग


आज १ मे २०२५ पासून तुम्ही पैसे काढण्यासाठी एटीएम मशीनचा वापर करत असाल तर तुम्हाला अधिक चार्ज द्यावा लागेल. काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एनपीसीआयच्या प्रस्तावावर फीस वाढवण्यास परवानगी दिली होती. अशातच पहिल्या तारखेपासून जर ग्राहक आपल्या होम बँकेव्यतिरिक्त इतर एटीएममधून पैसे काढत असतील तर त्यांना प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर १७ रूपयांच्या ऐवजी १९ रूपये द्यावे लागतील. याशिवाय दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून बॅलन्स तपासल्यास ६ रूपयांच्या ऐवजी ७ रूपये द्यावे लागतील.



रेल्वेने बदलला हा नियम


१ मे २०२५ पासून होणारा दुसरा बदल हा रेल्वेशी संबंधित आहे. रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल होत आहे. आता वेटिंग तिकीट केवळ सामान्य डब्यामध्ये मान्य असेल. म्हणजेच जर तुमच्याकडे वेटिंग तिकीट असेल तर तुम्ही स्लीपर कोचमधून प्रवास करू शकत नाही. तसेच अॅडव्हान्स रिझर्वेशन पीरियड १२० दिवसांनी कमी होऊन ६० दिवस करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व