Akshay Tritiya 2025 : अक्षय्य तृतीया म्हणजे नेमके काय?

  110

वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीया. हिंदू दिनदर्शिकेनुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून अक्षय्य तृतीयेकडे पाहिले जाते. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ अ-क्षय्य (ज्याचा कधीही क्षय किंवा ऱ्हास होत नाही) असे मिळते, असा समज आहे.


वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीया. हिंदू दिनदर्शिकेनुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून अक्षय्य तृतीयेकडे पाहिले जाते. भारतीय संस्कृतीच्या पौराणिक अधिष्ठानामुळे या दिवशी आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. हिंदू संस्कृतीचे सगळे सण हे निसर्गाच्या चक्रानुसार ठरलेले असतात. म्हणूनच गुढीपाडव्याला सुरू केलेली शेतीची नांगरणी या दिवशी संपवून शेतकरी जमिनीच्या मशागतीला लागतात. मशागत केलेल्या जमिनीत बियाणे पेरतात. भारतात काही ठिकाणी या दिवशी मृत्तिका पूजन करण्याची प्रथाही आहे.



मृत्तिकेच्या रुपात असणारी लक्ष्मी आपल्यावर सदैव प्रसन्न राहो, ही भावना या पूजनामागे असते. अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात अशी समजूत आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीच्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही. त्यामुळे या मुहूर्तावर वस्त्र, शस्त्र, दागिने किंवा मोठी खरेदी करण्यात येते.

Comments
Add Comment

वादग्रस्त विधाने करू नयेत, सर्वांनी समन्वयाने काम करावे - आमदार दीपक केसरकर

सिंधुदुर्ग - महायुतीची सध्याची राजकीय परिस्थिती चांगली असून, कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची वादग्रस्त

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

"बाळाच्या रंगावरून बोलाल तर खबरदार..." टीव्ही अभिनेत्रीने ट्रोलर्सना खडसावले, केली थेट कायदेशीर कारवाई

हिंदी टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीच्या ७ महिन्यांच्या बाळाला सावळ्या रंगामुळे ट्रोल करण्यात

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

समृद्धीवर वेगमर्यादेचे उल्लंघन, आता असणार सीसीटीव्हीची नजर

अमरावती : नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण