India Census : केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय ठरणार मास्टर स्ट्रोक

नवी दिल्ली : एकीकडे चिघळलेल्या पहलगाम हल्ल्यातील पाकड्यांना प्रतिउत्तर देण्यासाठी भारत सज्ज आहे. तर दुसरीकडे आज (दि ३०) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय रेल्वे तथा देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या विविध निर्णयांची माहिती दिली. भारतात करण्यात येणारी जनगणना जातीनिहाय होणार असल्याची माहिती दिली आहे.


भारत १९४७ साली स्वतंत्र झाल्यानंतर देशात १९५१ साली पहिली जनगणना पार पडली. २०११ साली देशात शेवटची जनगणना पार पडली. ही देशातील १५वी गणना होती. घरांची यादी आणि लोकसंख्या या दोन टप्प्यांवर ही गणना पार पडली होती. मात्र आज (दि ३०) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले. याची माहिती केंद्रीय रेल्वे तथा देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेत दिली.



अश्विनी वैष्णव काय म्हणाले?


सामाजिक रचनेचा विचार करून आणि संविधानातील स्पष्ट तरतुदी लक्षात घेऊन मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. आज, दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी केंद्र सरकारने पुढील जनगणनेत जातीनिहाय जनगणना समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सरकार आपल्या समाजाच्या व देशाच्या मूल्यांप्रती व हितसंबंधांप्रती कटीबद्ध आहे. यापूर्वी देखील सरकारने कोणत्याही समाजघटकावर अन्याय न करता, त्यांच्यावर ताण न आणता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षण लागू केलं आहे. त्याचप्रमाणे हा निर्णय देखील सर्व समाजघटकांच्या कल्याणासाठी घेण्यात आला आहे.




शिलाँग ते सिल्चर कॉरिडोअर मंजुरी


केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये शिलाँग ते सिल्चर कॉरिडोअर मंजुरी देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. मेघालय आणि आसामला जोडणाऱ्या हायस्पीड हायवे असा शिलाँग ते सिल्चर कॉरिडोअरला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे. २२,८६४ कोटी रुपये इतका या प्रोजेक्टचा नियोजित खर्च आहे. उत्तर-पूर्व भारताच्या कनेक्टिविटीसाठी हा महत्त्वाचा प्रकल्प आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही ऐतिहासिक तिसरी टर्म आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी देखील आज मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा निर्णय घेण्यात आला आहे. ऊसाचे दर केंद्र सरकारकडून ठरवण्यात आले आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

Comments
Add Comment

Char Dham Yatra : चार धाम यात्रा तात्पुरत्या स्थगितीनंतर पुन्हा सुरू

नवी दिल्ली : यात्रेच्या मार्गांचा सखोल आढावा घेतल्यानंतर, २० जुलै रोजी सुरक्षेचा उपाय म्हणून तात्पुरती स्थगित

NEW DELHI : आमच्यावर विटा आणि कुंडी फेकून मारल्या , जखमी दिल्ली पोलिसांनी दिली माहिती

नवी दिल्ली : संसदेजवळ झालेल्या हिंसाचारादरम्यान आंदोलकांनी जवळच असलेल्या एका संरचनेचा काही भाग तोडून विटा गोळा

Urea Production : युरिया उत्पादनात देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल, खासदार अशोक चव्हाणांच्या प्रश्नाला केंद्राचे उत्तर

नवी दिल्ली : शेती आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या युरिया उत्पादनाबाबत एक महत्त्वाची बातमी आहे.

Russian Missile Attack : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ४ भारतीय खलाशांचा मृत्यू; भारताचा संताप, रशियन राजदूतांना समन्स

नवी दिल्ली : युक्रेनच्या किनारपट्टीजवळील व्यापारी मालवाहू जहाजावर झालेल्या रशियन हल्ल्यात चार भारतीय खलाशांचा

Kangana Ranaut On CJP : 'आम्ही संसदेत कैदेत असल्यासारखे अडकलो होतो'; दिल्लीतील हिंसक आंदोलनावर खासदार कंगना रनौत यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : सोमवारी सकाळी दिल्लीच्या मध्यभागी हजारो आंदोलकांनी संसदेच्या दिशेने मोर्चा वळवला. हा मोर्चा

IIT Roorkee : 'राजकीय आंदोलनांना सोशल मीडियावर पाठिंबा देऊ नका'; IIT च्यामोठ्या निर्णयाची देशभरात चर्चा

रुडकी : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) रुडकीने विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी जारी केलेल्या एका अंतर्गत