Shikhar Dhawan Slams Shahid Afridi: शिखर धवनने शाहिद आफ्रिदीला फटकारले, म्हणाला "आधीच पातळी सोडली आहे आता अजून..."

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्याविरुद्ध भारतीय जनतेचा राग शिगेला पोहोचला आहे. जगभरातून या हल्ल्याचा निषेध व्यक्त होत असताना, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) केलेले भारतीय सैन्यावरील वादग्रस्त विधानामुळे अनेकांचे रक्त खवळलं आहे. ज्याला, शिखर धवनकडून (Shikhar Dhawan) चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.


पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ लोकांनी आपले प्राण गमावले, ज्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने दहशतवाद आणि दहशतवादी संघटनांना समर्थन देणाऱ्या पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. दरम्यान, पाकिस्ताननेदेखील भारतविरुद्ध गरळ ओकायला सुरूवात केली आहे. यात भर म्हणून की काय, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने देखील भारतीय सैन्याविरुद्ध वादग्रस्त विधान केले होते. ज्याचा शिखर धवनने चांगलाचा समाचार घेतला आहे.



काय म्हणाला शिखर धवन?


धवनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर)वर शाहिद आफ्रिदील टॅग करत म्हंटले की, "आम्ही तुम्हाला कारगिलमध्येही हरवलं होतं. आधीच पातळी सोडली आहे आता अजून किती पातळी सोडणार, उगाचच कमेंट्स करण्यापेक्षा तुमच्या देशाच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा." पुढे धवनने "आम्हाला आमच्या भारतीय सैन्याचा खूप अभिमान आहे. भारत माता की जय! जय हिंद!" असे देखील लिहिले.



काय म्हणालेला शाहिद आफ्रिदी?


शाहीद आफ्रिदीने सामा टीव्हीवर मुलाखत देताना भारतीय सैन्याविरुद्ध संतापजनक वक्त्यव्य केलं होतं. तो म्हणाला की, "जर जम्मू काश्मीरमध्ये फटाके जरी फुटले तरी ते पाकिस्तानने केले आहे, असे बोलले जाते. काश्मीरमध्ये तुमचे ८० हजार सैनिक आहेत आणि तरीही हा हल्ला घडला. याचा अर्थ तुम्हीकाहीच कामाचे नाही आहात, कारण तुम्ही लोकांना सुरक्षा देऊ शकत नाही."


केंद्र सरकारने शोएब अख्तरचं (Shoaib Akhtar) युट्यूब चॅनेल ब्लॉक केल असून, त्यासोबत इतर १५ युट्युब चॅनलचे भारतातील प्रसारण देखील रोखले आहेत.


ज्यामध्ये डॉन न्यूज, समा टीव्ही, एआरवाय न्यूज, बोल न्यूज, रफ्तार, जिओ न्यूज आणि सुनो न्यूज सारख्या प्रमुख पाकिस्तानी न्यूज चॅनेलचा समावेश आहे. या सर्व चॅनेलवर भारताबद्दल चुकीची माहिती प्रसारित करणे आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आरोप आहे.

Comments
Add Comment

Navnath Ban : संजय राऊतांनी आधी स्वत: गाढव नाक्यावर आंदोलन करावे; नवनाथ बन यांचा संजय राऊतांना टोला !

भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा टोला Mumbai : आजवर संजय राऊत एकाही आंदोलनात सहभागी झाले नाहीत.

BCCI SELECTION : BCCI कडून दोन मोठ्या स्पर्धांसाठी भारतीय संघांची घोषणा; श्रेयस अय्यरकडे नेतृत्व, तिलक वर्मा उपकर्णधार

MUMBAI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी इंग्लंड दौरा 2026 आणि आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (जपान) यासाठी भारतीय पुरुष

French Open 2026 : अलेक्झांडर झ्वेरेव्ह दुसऱ्यांदा अंतिम फेरीत, विजेतेपदासाठी कोबोलीशी लढत

जर्मन टेनिसपटू अलेक्झांडर झ्वेरेव्ह आता त्याच्या पहिल्या ग्रँडस्लॅम विजेतेपदापासून केवश एक विजय दूर आहे.

BCCI SQUAD SELECTION : भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीसाठी बीसीसीआयची बैठक सुरू; श्रेयस अय्यरकडे सोपवली जाणार धुरा?

BCCI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) वरिष्ठ निवड समिती आज मुंबईतील मुख्यालयात महत्त्वाची बैठक घेत आहे. या बैठकीत

Shreyas Iyer : श्रेयस अय्यरची टीम इंडियाच्या टी२० कर्णधारपदी निवड निश्चित? कर्णधार म्हणून समोर असतील ही ३ मोठी आव्हाने

SHREYAS IYER : भारतीय क्रिकेट संघाच्या टी२० टीमचे नेतृत्व लवकरच श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात येणार असल्याच्या चर्चांना

INDvsAFG TEST : भारत विरुद्ध अफगाणिस्तान; एकमेव कसोटी सामना

PANJAB : मुल्लांपूर (नवी चंदीगड) येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि