IPL 2025 CSK vs PBKS : पंजाब व चेन्नई आमने सामने

मुंबई (ज्ञानेश सावंत) : आज चेन्नईच्या चिंदंबरम मैदानावर पंजाब विरुद्ध चेन्नई हा सामना खेळला जाणार आहे. मागील दोन सामन्यात पंजाबला विजय मिळवता आला नाही त्यामुळे आजचा सामना ते विजयाच्या हेतूनेच खेळतील. बेंगळुरूकडून पराभव पत्करल्यावर पंजाबने कोलकत्ता विरुद्ध चांगली फलंदाजी केली, पण तो ही सामना पावसामुळे गमवावा लागला. आज पंजाब पुन्हा एकदा चांगली धावसंख्या उभारेल अशी आशा आहे. पंजाबचे सर्वच फलंदाज फॉर्म मध्ये असल्यामुळे ते त्यांना सहज शक्य आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना चेन्नईला कमी लेखून चालणार नाही. चेन्नईचे फलंदाज अपयशी ठरत असतील तरीही कोणत्या फलंदाजाला कधी सुर गवसेल हे सांगता येणार नाही.


आयपीएल २०२५ मध्ये आता चुरस पाहायला मिळते आहे, प्रत्येक संघ जिंकण्यासाठी झगडताना दिसतो आहे. गुण तकत्यातील तळाचे संघ समोरच्या संघाला सोपा विजय मिळवू देत नाही. पर्वच्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सने मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करून विजय मिळवला. चेन्नई जरी गुणतक्त्यात शेवटच्या स्थानावर असेल तरी त्यांना कमी लेखून चालणार नाही कारण २०-२० मध्ये कधीही काहीही होऊ शकते. पंजाबने आजचा सामना गमावला तर त्यांच्यासाठी पात्रता फेरी गाठणे कठीण होईल. चला तर जाणून घेऊयात पंजाब चेन्नई विरुद्ध होणाऱ्या सामन्यात जिंकण्यासाठी कोणती व्यूहरचना करते.

Comments
Add Comment

ऑक्टोबरमध्ये फिरायला जायचंय तर राजस्थान आहे एकदम बेस्ट

मुंबई : वाळवंटाची सुवर्ण वाळू, राजवाड्यांचे भव्य ऐश्वर्य, लोककलेचा रंग, आणि संस्कृतीचा सुगंध म्हणजे आपलं

नोबेल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प यांची वर्णी लागणार का ? आज होणार घोषणा

नॉर्वे : नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे आज नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे. यावर्षी नोबेल शांतता

भारतातील कोणत्या राज्यात आणि जिल्ह्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके कुठे आहेत? जाणून घ्या इंटरेस्टिंग माहिती.

भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? आणि कोणत्या जिल्ह्यात ४०

ब्रिटनची ९ मोठी विद्यापीठे भारतात कॅम्पस सुरू करणार; पंतप्रधान मोदी आणि कीर स्टार्मर यांची मोठी घोषणा

मुंबई: भारत-ब्रिटन संबंधांमध्ये शिक्षण आणि युवाशक्तीला बळ देणारा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. ब्रिटनचे

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार

दहशतवाद्यांनी बर्फवृष्टीचा फायदा घेऊन घुसखोरी करू नये , सुरक्षा दलांनी सज्ज रहावे - अमित शाह

नवी दिल्ली : “केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधातील “शून्य सहनशीलता” धोरण पुढेही कायम राहणार आहे”, असे केंद्रीय