Pahalgam Attack : राष्ट्रीय सुरक्षा मंडळात महत्त्वाचा बदल; माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची अध्यक्षपदी नियुक्ती

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत भारताचे तणावपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत. या तणावपूर्ण वातावरणानंतर केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळात बदल केला आहे. माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवास्थानी आज (दि ३०) बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्‍ते, परिवहन मंत्री नितीन गडकरी, आरोग्‍य मंत्री जेपी नड्डा, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह अन्य काही सदस्‍यही सहभागी झाले होते.


पंतप्रधान यांच्या निवासस्थानी झालेल्या सुरक्षाविषयक कॅबिनेट समिती (CCS) बैठकीनंतर मोठा निर्णय घेण्यात आला. सीसीएस बैठकीसह, पंतप्रधानांच्या निवासस्थानी कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्स आणि कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स (CCEA) यांच्या बैठका बोलावण्यात आल्या. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा मंडळात बदल करण्यात आले. माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी भारत तयारी करत आहे.


राष्ट्रीय सुरक्षा मंडळात आणखी ७ सदस्यांचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये माजी पश्चिम हवाई कमांडर एअर मार्शल पी. एम. सिन्हा, माजी दक्षिण लष्कर कमांडर लेफ्टनंट जनरल ए. के. सिंह आणि रिअर अ‍ॅडमिरल माँटी खन्ना या लष्करी सेवांमधून निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राजीव रंजन वर्मा आणि मनमोहन सिंग हे भारतीय पोलीस सेवेतून (IPS) निवृत्त झालेले दोन सदस्य आहेत. सात सदस्यीय मंडळात बी. व्यंकटेश वर्मा हे निवृत्त आयएफएस (IFS) अधिकारी आहेत.

Comments
Add Comment

Emergency Flight Landing : दुबईहून येणाऱ्या फ्लाइटचे लखनौमध्ये इमर्जन्सी लँडिंग; १५४ प्रवासी सुरक्षित

लखनौ येथे आज म्हणजेच शनिवार ११ एप्रिल सकाळी दुबईहून काठमांडूकडे जाणाऱ्या फ्लाय दुबईच्या फ्लाइटचे (एफजेड-1133)

Voters : एसआयआरमध्ये देशभरात 6.08 कोटी मतदारांची नावे वगळली

नवी दिल्ली : विशेष गहन पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेनंतर देशातील 9 राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांच्या

Mathura Accident : मथुरेतील वृंदावनमध्ये यमुना नदीत बोट उलटून १० पर्यटकांचा मृत्यू

मथुरेतील वृंदावन येथे यमुना नदीत पर्यटकांनी भरलेली नौका उलटल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या भीषण अपघातात

Whatsapp Privacy : व्हॉट्सॲपच्या प्रायव्हसीवर मोठा वाद; एलोन मस्क आणि टेलिग्रामचे सीईओकडून प्रश्न उपस्थित

मुंबई : सध्या व्हॉट्सॲप (WhatsApp) च्या प्रायव्हसी आणि सिक्युरिटीबाबत मोठा वाद समोर आला आहे. टेलिग्राम (Telegram) चे सीईओ

Justice Yashwant Verma : जस्टिस यशवंत वर्मांनी दिला राजीनामा, घरात सापडलेल्या जळालेल्या नोटा

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. न्यायमूर्ती वर्मा

West Bengal : पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी भाजपचे ‘भरोसा पत्र’ जाहीर

भाजपकडून “सोनार बांग्ला” घडवण्याचा व्यक्त केला निर्धार कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला अवघे 13 दिवस