Pahalgam Attack : राष्ट्रीय सुरक्षा मंडळात महत्त्वाचा बदल; माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची अध्यक्षपदी नियुक्ती

  66

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत भारताचे तणावपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत. या तणावपूर्ण वातावरणानंतर केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळात बदल केला आहे. माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवास्थानी आज (दि ३०) बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्‍ते, परिवहन मंत्री नितीन गडकरी, आरोग्‍य मंत्री जेपी नड्डा, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह अन्य काही सदस्‍यही सहभागी झाले होते.


पंतप्रधान यांच्या निवासस्थानी झालेल्या सुरक्षाविषयक कॅबिनेट समिती (CCS) बैठकीनंतर मोठा निर्णय घेण्यात आला. सीसीएस बैठकीसह, पंतप्रधानांच्या निवासस्थानी कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्स आणि कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स (CCEA) यांच्या बैठका बोलावण्यात आल्या. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा मंडळात बदल करण्यात आले. माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी भारत तयारी करत आहे.


राष्ट्रीय सुरक्षा मंडळात आणखी ७ सदस्यांचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये माजी पश्चिम हवाई कमांडर एअर मार्शल पी. एम. सिन्हा, माजी दक्षिण लष्कर कमांडर लेफ्टनंट जनरल ए. के. सिंह आणि रिअर अ‍ॅडमिरल माँटी खन्ना या लष्करी सेवांमधून निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राजीव रंजन वर्मा आणि मनमोहन सिंग हे भारतीय पोलीस सेवेतून (IPS) निवृत्त झालेले दोन सदस्य आहेत. सात सदस्यीय मंडळात बी. व्यंकटेश वर्मा हे निवृत्त आयएफएस (IFS) अधिकारी आहेत.

Comments
Add Comment

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.

Kolkata Rape Case : लॉ विद्यार्थिनीवर बलात्कारप्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी, ममता सरकार निशाण्यावर

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकार संचालित दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजशी संबंधित सामूहिक बलात्काराचा एक

MP News : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील १९ इनोव्हामध्ये भरले २० लीटर डिझेल, मात्र निघालं १० लीटर पाणीच पाणी

डिझेल भरायला गेल्या अन् पाणी भरून आल्या... मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

JeM Terrorist Killed: उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या ३ दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू, एक ठार

उधमपूर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील एका दुर्गम जंगली भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथ रथयात्रेची आजपासून सुरुवात, रथ ओढणाऱ्या दोऱ्यांची आहेत 'खास' नावे

पुरी : ओडिशामधील पुरी येथे दरवर्षी होणाऱ्या जगन्नाथ रथयात्रेला आजपासून म्हणजेच शुक्रवार, २७ जूनपासून झालेली