Summer Tips : उन्हाळ्याने थकवा वाटतोय.. मग करा गुळाचं सरबत

मुंबई : उन्हाळ्याची काहिली आता भलतीच ताप देतेय. त्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. पूर्वी एखादा माणूस उन्हातून आला की त्याला गुळाचा खडा आणि पाणी द्यायची पद्धत होती. कारण, गुळामुळे शरीरातलं ग्लुकोजचं प्रमाण नियंत्रित राहायचं. अशा या गुणकारी गुळाचं सरबत कसं करायचं हे जाणून घेऊया :-


या गुळाच्या सरबतासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा कप गूळ, १ टेबलस्पून जिरं, १ टेबलस्पून बडिशेप, अर्धा टेबलस्पून मिरपूड, १ ते २ टेबलस्पून लिंबाचा रस, पाच ते सहा पुदिन्याची पानं, १ ते २ टेबलस्पून भिजवलेला सब्जा, चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार पाणी.



सगळ्यांत आधी गूळ चिरुन किंवा किसून बारीक करून घ्यायचा. आता एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यात किसलेला गूळ, जिरे, बडीशेप, चवीनुसार मीठ, काळीमिरी पावडर, लिंबाचा रस व पुदिन्याची पानं हे सगळे जिन्नस टाकायचे आणि त्या थोडं पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यायची. तयार पेस्ट मिक्सरच्या भांड्यातून काढून एका काचेच्या बाटलीत भरुन स्टोअर करून ठेवा आणि ही बाटली फ्रिजमध्ये ठेवा. जेव्हा गरज वाटेल तेव्हा चमचाभर पेस्ट, सब्जा घालून त्यात गरजेनुसार पाणी ओतून घ्या आणि गार्निशिंगसाठी बारीक चिरलेला पुदिना भुरभुरा... झालं गुळाचं सरबत तयार.

Comments
Add Comment

दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ कारमध्ये भीषण स्फोट! दहशतवादी कटाचा संशय; सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली (Delhi) सोमवारी सायंकाळी एका मोठ्या स्फोटाने हादरली. येथील ऐतिहासिक लाल किल्ला

पार्थ पवार जमीन घोटाळा: अजितदादा काय म्हणतात, प्रत्यक्ष 'ऐका'!

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप झाल्याने राजकीय

जे निर्माण करू शकत नाहीत, तेच तोडफोडीवर बोलणार; नमो केंद्रावरून राजकीय वादंग!

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक नवं वादळ उठलंय. प्रश्न हा आहे की, फक्त तोडण्याची भाषा करणाऱ्यांना

मुंबईत घर घेण्याचं स्वप्न स्वप्नच रहाणार, ४२६ फ्लॅट्सची सोडत, पण किंमती आवाक्याबाहेर? वाचा A टू Z

मुंबईत ‘घर’ का परवडेना? किंमत ५४ लाखांपासून १ कोटीपर्यंत! मग 'अत्यल्प व अल्प उत्पन्न' गटाचा नेमका अर्थ काय? मुंबई :

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी