Summer Tips : उन्हाळ्याने थकवा वाटतोय.. मग करा गुळाचं सरबत

  13

मुंबई : उन्हाळ्याची काहिली आता भलतीच ताप देतेय. त्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. पूर्वी एखादा माणूस उन्हातून आला की त्याला गुळाचा खडा आणि पाणी द्यायची पद्धत होती. कारण, गुळामुळे शरीरातलं ग्लुकोजचं प्रमाण नियंत्रित राहायचं. अशा या गुणकारी गुळाचं सरबत कसं करायचं हे जाणून घेऊया :-


या गुळाच्या सरबतासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा कप गूळ, १ टेबलस्पून जिरं, १ टेबलस्पून बडिशेप, अर्धा टेबलस्पून मिरपूड, १ ते २ टेबलस्पून लिंबाचा रस, पाच ते सहा पुदिन्याची पानं, १ ते २ टेबलस्पून भिजवलेला सब्जा, चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार पाणी.



सगळ्यांत आधी गूळ चिरुन किंवा किसून बारीक करून घ्यायचा. आता एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यात किसलेला गूळ, जिरे, बडीशेप, चवीनुसार मीठ, काळीमिरी पावडर, लिंबाचा रस व पुदिन्याची पानं हे सगळे जिन्नस टाकायचे आणि त्या थोडं पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यायची. तयार पेस्ट मिक्सरच्या भांड्यातून काढून एका काचेच्या बाटलीत भरुन स्टोअर करून ठेवा आणि ही बाटली फ्रिजमध्ये ठेवा. जेव्हा गरज वाटेल तेव्हा चमचाभर पेस्ट, सब्जा घालून त्यात गरजेनुसार पाणी ओतून घ्या आणि गार्निशिंगसाठी बारीक चिरलेला पुदिना भुरभुरा... झालं गुळाचं सरबत तयार.

Comments
Add Comment

Shubhanshu Shukla : भारताची अंतराळाला गवसणी, शुभांशु शुक्लांनी अंतराळात फडकवला तिरंगा

भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि स्वप्नवत आहे.

हिंदी सक्ती विरोधात चढाओढ! ठाकरेंचे मोर्चे मराठीसाठी की राजकीय शक्ती दाखवण्यासाठी?

मुंबई : एक मुद्दा… पण दोन मोर्चे! आणि दोघंही 'ठाकरे'. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येतील, असं काही

Pandharpur Wari 2025 : वारकऱ्यांची आरोग्यसेवा कोण करतं?

महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा विठोबा. याच लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या

आदित्य ठाकरेची अटक टाळण्यासाठी हैद्राबादवरुन आणला मांत्रिक!

शिवसेना नेते रामदास कदम यांचा आरोप मुंबई : शिवसेनेतील अंतर्गत वाद आता काळी विद्या, जादूटोणा आणि तांत्रिक

बुलंद नेतृत्व

ज्ञानेश सावंत नितेश नारायणराव राणे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक बुलंद नेतृत्व. खासदार नारायणराव राणे आणि

​​PMRDA : ​​शिवाजीनगर ते हिंजवडी ​मेट्रो -३ला आणखी विलंब​!

गारेगार प्रवाससाठी वर्षभर थांबाच! ​आयटी अभियंत्यांना थंडगार व आरामदायी प्रवासासाठी आणखी वर्षभर प्रतिक्षाच