१००, २०० रूपयांच्या नोटांबाबत RBIचा मोठा निर्णय

नवी दिल्ली: तुम्ही जेव्हा एटीएममधून पैसे काढायला जाता तेव्हा बऱ्याचदा एटीएममधून ५००च्याच नोटा येतात. मात्र आता या समस्येवर भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला आहे आणि एटीएममधून १०० तसेच २००च्या नोटाही असाव्यात असे बँकांना आदेश दिले आहेत.



१००-२००च्या नोटांची उपलब्धता वाढवणे गरजेचे


केंद्रीय बँकेने सोमवारी बँकांना आदेश देताना म्हटले की, सामान्य जनतेला नोटांची उपलब्धता करून देण्यासाठी एटीएममध्ये पुरेशा नोटा असणे गरजेचे आहे. आरबीआयने यासंबंधी सर्कुलर जारी केले आहे. यात म्हटले आहे की बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्सना हे आदेश टप्प्याटप्प्याने लागू करावे लागतील.



काय लिहिलेय आरबीआयच्या सर्कुलरमध्ये?


यात म्हटले आहे की सर्रास वापरल्या जाणाऱ्या या मूल्यवर्गाच्या बँक नोटा जनतेपर्यंत अधिकाधिक पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे एटीएममधून नियमितपणे १०० आणि २०० रूपयांच्या नोटाही बाहेर पडतील याची पडताळणी देशातील सर्व बँकांनी तसेच व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्सनी करणे गरजेचे आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत सर्व एटीएममधील ७५ टक्के एटीएममधून कमीत कमी एका क२सेटमधून १०० रूपये अथवा २०० रूपयांच्या नोटा निघाल्या पाहिजेत. यानंतर दुसऱ्या टप्प्यात ३१ मार्च २०२६ पर्यंत ९० टक्के एटीएममधून कमीत कमी एका कॅसेटमधून १०० आणि २०० रूपयांच्या नोटा निघाल्या पाहिजेत.



१ मेपासून एटीएम असणार महाग


१ मे २०२५ पासून देशात बदलणाऱ्या नियमानुसार एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमातही बदल होणार आहे. होम बँक नेटवर्कच्या बाहेरील कोणत्याही एटीएम मशीनमधून ट्रान्झॅक्शन केले जात असेल अथवा बॅलन्स चेक केल्यास युजरला अधिक पैसे द्यावे लागतील.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला