१००, २०० रूपयांच्या नोटांबाबत RBIचा मोठा निर्णय

  65

नवी दिल्ली: तुम्ही जेव्हा एटीएममधून पैसे काढायला जाता तेव्हा बऱ्याचदा एटीएममधून ५००च्याच नोटा येतात. मात्र आता या समस्येवर भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला आहे आणि एटीएममधून १०० तसेच २००च्या नोटाही असाव्यात असे बँकांना आदेश दिले आहेत.



१००-२००च्या नोटांची उपलब्धता वाढवणे गरजेचे


केंद्रीय बँकेने सोमवारी बँकांना आदेश देताना म्हटले की, सामान्य जनतेला नोटांची उपलब्धता करून देण्यासाठी एटीएममध्ये पुरेशा नोटा असणे गरजेचे आहे. आरबीआयने यासंबंधी सर्कुलर जारी केले आहे. यात म्हटले आहे की बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्सना हे आदेश टप्प्याटप्प्याने लागू करावे लागतील.



काय लिहिलेय आरबीआयच्या सर्कुलरमध्ये?


यात म्हटले आहे की सर्रास वापरल्या जाणाऱ्या या मूल्यवर्गाच्या बँक नोटा जनतेपर्यंत अधिकाधिक पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे एटीएममधून नियमितपणे १०० आणि २०० रूपयांच्या नोटाही बाहेर पडतील याची पडताळणी देशातील सर्व बँकांनी तसेच व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्सनी करणे गरजेचे आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत सर्व एटीएममधील ७५ टक्के एटीएममधून कमीत कमी एका क२सेटमधून १०० रूपये अथवा २०० रूपयांच्या नोटा निघाल्या पाहिजेत. यानंतर दुसऱ्या टप्प्यात ३१ मार्च २०२६ पर्यंत ९० टक्के एटीएममधून कमीत कमी एका कॅसेटमधून १०० आणि २०० रूपयांच्या नोटा निघाल्या पाहिजेत.



१ मेपासून एटीएम असणार महाग


१ मे २०२५ पासून देशात बदलणाऱ्या नियमानुसार एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमातही बदल होणार आहे. होम बँक नेटवर्कच्या बाहेरील कोणत्याही एटीएम मशीनमधून ट्रान्झॅक्शन केले जात असेल अथवा बॅलन्स चेक केल्यास युजरला अधिक पैसे द्यावे लागतील.

Comments
Add Comment

चिनाब रेल्वे पूल आयफेल टॉवरपेक्षा उंच!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन काश्मिर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

नीट पीजी परीक्षा ३ ऑगस्टला

नवी दिल्ली : पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेशपूर्व परीक्षा अर्थात नीट पीजी परीक्षेची

Elon Musk च्या स्टारलिंकला भारत सरकारची मंजुरी

नवी दिल्ली : Elon Musk च्या स्टारलिंक कंपनीला सॅटेलाइटच्या मदतीने इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारने मंजुरी दिली

ICICI Bank : अविश्वसनीय! ICICI बँकेत ४.५८ कोटींची फसवणूक, महिला मॅनेजरला अटक

जयपूर : बँकेत आपले पैसे सुरक्षित आहेत असं प्रत्येक ग्राहकाला वाटत असतं. पण, एका धक्कादायक प्रकरणात, राजस्थानच्या

जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावर तिरंगा

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केले. चिनाब रेल्वे पूल हा जगातील

पर्वत आणि बोगद्यांमधील अभियांत्रिकीचा चमत्कार, चिनाब पुलामध्ये काय आहे खास पाहा

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच चिनाब पूल देशाला समर्पित केला. यासोबतच दोन वंदे भारत