'गजवा अल हिंद'शी काँग्रेसचा संबंध काय ?

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देश पाकिस्तान विरोधात एकवटला आहे. जो - तो पाकिस्तानची कोंडी करा, पाकिस्तानला धडा शिकवा असे बोलू लागला आहे. पण काँग्रेस पक्ष आणि त्यांचे नेते वेगळा विचार करत आहेत की काय, असे चित्र आहे.







पंतप्रधान मोदी वापरतात तसेच कपडे असलेला एक फोटो काँग्रेसने एक्सवरुन पोस्ट केला आहे. या फोटोत कपडे आहेत. पण कपडे घातलेला माणूस गायब आहे. विशेष म्हणजे मुसलमानांशी संबंधित संघटनेने केलेल्या एका एक्स पोस्टमध्ये गजवा अल हिंद असा भारत विरोधी उल्लेख आहे. एकाचवेळी दोन संघटना भारताविरोधात अशी गरळ ओकतात आणि त्यातील एक संघटना भारतातील प्रमुख राष्ट्रीय पक्षांपेकी एक आहे.

काँग्रेस सर तन से जुदा अर्थात शिर धडापासून वेगळे करण्याच्या विचाराला प्रोत्साहन देणारी एक्स पोस्ट करते. दुसरीकडे मुसलमानांशी संबंधित संघटना भगवान शंकराचा सर तन से जुदा स्वरुपातला फोटो तयार करुन प्रसिद्ध करते. हा काय प्रकार आहे ? दोन्हीचा एकमेकांशी नेमका काय संबंध आहे ? असे सवाल भाजपा खासदार डॉ. निशकांत दुबे यांनी उपस्थित केले आहेत.

राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसने अनेकदा पंतप्रधान मोदींच्या विरोधात हिंसेला चिथावणी दिली आहे. आता भारत - पाकिस्तान तणाव वाढला असताना काँग्रेस तसेच काहीतरी करू इच्छित आहे का ? जर याचे उत्तर हो असेल तर काँग्रेस नेमकी कोणाचे हित साधण्यासाठी धडपडत आहे ?
Comments
Add Comment

Barabanki Road Accident : वेगमर्यादेचा बळी! बाराबंकीत ट्रक-अर्टिगाच्या धडकेत ६ ठार, ८ गंभीर जखमी; कारचा अक्षरशः चक्काचूर!

बाराबंकी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बाराबंकी (Barabanki) जिल्ह्यात सोमवारी रात्री भीषण रस्ते अपघात झाल्याची घटना समोर

Bengaluru News : क्रूरतेचा कळस! मोलकरणीनं लिफ्टमध्ये कुत्र्याच्या पिल्लाला आपटून संपवलं; मोलकरणीचं खोटं नाटक CCTV फूटेजमुळे उघड

बंगळुरु : कर्नाटकची राजधानी बंगळुरु (Bengaluru) येथील बागलूर (Bagaluru) मधील एका अपार्टमेंटमध्ये मुक्या जनावरासोबत अतिशय

Naxalite Surrender : 'सुनीता'चा माओवादी संघटनेला रामराम! १४ लाखांचे इनाम असलेली महिला नक्षलवादी अखेर शरण

बालाघाट : नक्षलग्रस्त भागातून एक मोठी आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बालाघाट

राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला, तर कंत्राटदाराला दंड; केंद्र सरकारचा निर्णय

निर्धारित कालावधीत एकापेक्षा जास्त अपघात झाल्यास होणार कारवाई नवी दिल्ली  : रस्ते अपघात आणि मृत्यू रोखण्यासाठी,

'पप्पू, टप्पू आणि अप्पू' - महाआघाडी म्हणजे गांधीजींची तीन माकडं!

योगी आदित्यनाथ यांचा बिहारमधून राहुल, तेजस्वी, अखिलेशवर हल्लाबोल दरभंगा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या

राहुल गांधींनी केला छठी मैय्याचा अपमान; बिहारमध्ये प्रचंड बहुमताने एनडीए सरकार स्थापन होईल - अमित शाह

पाटणा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी शेओहर आणि सीतामढी जिल्ह्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)