Jammu Kashmir Tourism : पर्यटकांनो 'इथे' फिरण्याचे नियोजन असेल तर आजच रद्द करा!

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार हाय अलर्ट मोडवर आहे. सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्यांची घरे उद्ध्वस्त केली असून सुमारे दोन हजार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. दुसरीकडे, दक्षिण काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सरकार पर्यटकांच्या सुरक्षेबाबत सतर्क झाले आहे. त्यामुळे काश्मीरमधील ४८ पर्यटन स्थळे तात्पुरती बंद करण्यात आली आहे.


जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण राज्यात दहशतवादाविरुद्ध सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरूच आहे. या लष्करी कारवाईदरम्यान, सरकारने काश्मीर खोऱ्यातील ४८ पर्यटन स्थळे तात्पुरती बंद केली आहेत. काश्मीरमधील ८७ पैकी ४८ पर्यटन स्थळे तात्पुरती बंद करण्यात आली आहेत. जम्मू-काश्मीर सरकारने दहशतवादाविरुद्धची शोध मोहीम आणि सुरक्षा आढावा लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. पर्यटकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ही पर्यटन स्थळे तात्पुरती बंद आहेत आणि सुरक्षेच्या परिस्थितीनुसार त्यांचा आढावा घेतला जाईल.



पहलगाम हल्ल्यानंतर खोऱ्यात काही स्लीपर सेल सक्रिय झाल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली आहे. या स्लीपर सेल्सना कारवाई सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर खोऱ्यात सक्रिय दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केल्याचा बदला घेण्यासाठी दहशतवादी मोठ्या आणि अधिक प्रभावी हल्ल्याची योजना आखत आहेत, असे गुप्तचर अहवालांवरून दिसून आलं आहे. त्यामुळे सुरक्षा दलांनी गुलमर्ग, सोनमर्ग आणि दाल लेक परिसरांसह संवेदनशील पर्यटन स्थळांवर सुरक्षा तैनात केली आहे. यामध्ये जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन्स ग्रुपमधील अँटी फिदायीन पथके तैनात केली आहेत.


दरम्यान, काश्मीर खोऱ्याला भेट देण्याची योजना आखणाऱ्या पर्यटकांनी सूचनांबद्दल माहिती घ्यावी आणि सावधगिरी बाळगावी असा सल्ला देण्यात आला आहे. पर्यटकांनी सुरक्षा कारवाया असलेल्या भागात जाणे टाळावे आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे. रिअल-टाइम अपडेट्ससाठी, प्रवासी अधिकृत सरकारी चॅनेल आणि स्थानिक वृत्तसंस्थांचा संदर्भ घेऊ शकतात, असेही सुरक्षा दलांकडून कडून सांगण्यात आले आहे

Comments
Add Comment

बिहारमध्ये भाजपचा दणका: मुख्यमंत्री कोण होणार? आता एनडीएचा 'हा' मोठा निर्णय!

तावडे म्हणाले, 'वॅकन्सी' नव्हती, हा जातीच्या पलीकडचा विजय! पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या

रायसिन विष बनवणाऱ्या सैयदचा पाकिस्तानशी संबंध उघड

ड्रोनद्वारे आणले शस्त्र, आयएसकेपीशी फोनवर संपर्क अहमदाबाद : प्रसादात विष कालवून लक्षावधी लोकांचा बळी घेण्याचे

Bihar Election Result 2025 : बिहारचे 'किंगमेकर' नितीश कुमार! महिला मतदारांच्या पाठिंब्याने '१० व्यांदा' मुख्यमंत्री होणार ?

पटणा : बिहार निवडणुकीच्या निकालांवरून स्पष्ट झाले आहे की एनडीएने राज्यात प्रचंड बहुमत मिळवून सत्ता पुन्हा

Bihar Election Result 2025 : 'टांगा पलटी, घोडं फरार!' प्रशांत किशोर यांचा पहिल्याच निवडणुकीत सपशेल पराभव; आता राजकारण सोडून 'कलटी' मारणार?

पटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांचे राजकीय प्रयोग जन सुराज पार्टीसाठी (Jan Suraj Party) पहिल्या

ज्येष्ठ नेते मुकुल रॉय यांचे पश्चिम बंगाल विधानसभेचे सदस्यत्व रद्द! पक्षांतरविरोधी कायद्याचा पहिल्यांदाच देशात वापर

कोलकाता: कोलकाता उच्च न्यायालयाने ज्येष्ठ नेते मुकुल रॉय यांचे पश्चिम बंगाल विधानसभेचे सदस्यत्व रद्द केले आहे.

सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग हॉस्पिटलमध्ये ; प्रकृतीत सुधार

सिक्कीम : सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांना गुरुवारी अचानक प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल