सैन्य दलांत तीन महत्त्वाच्या पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती

  57

नवी दिल्ली : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने तातडीने संरक्षणाशी संबंधित अनेक निर्णय घेतले आहेत. भारत आणि फ्रान्सच्या सरकारमध्ये राफेल खरेदीचा करार झाला आहे. भारताच्या नौदल आणि हवाई दलाने युद्धाभ्यास केला आहे. लष्कर हाय अलर्टवर आहे. मागील चार पाच रात्रींपासून पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. आता भारताच्या सैन्यात तीन महत्त्वाच्या पदांवर नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले आहेत. नवे अधिकारी त्यांच्या कामकाजाची औपचारिक सुरुवात १ मे रोजी करतील. याआधी ३० एप्रिल रोजी संध्याकाळी ते आधीच्या अधिकाऱ्याकडून पदभार स्वीकारणार आहेत.



भारतीय हवाई दलातून एअर मार्शल एसपी धारकर ३० एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत. नवे एअर मार्शल म्हणून नर्मदेश्वर तिवारी हे पदभार स्वीकारणार आहेत. सध्या तिवारी गांधीनगर येथे असलेल्या हवाई दलाच्या नैऋत्य विभागाच्या कमांडचे प्रमुख आहेत. तिवारी यांना बढती मिळत असल्यामुळे नैऋत्य विभागाच्या कमांडची जबाबदारी तिथेच कार्यरत असलेल्या मुख्य प्रशिक्षक असलेल्या व्यक्तीला देण्याचा निर्णय झाला आहे.

लेफ्टनंट जनरल जेपी मॅथ्यू यांच्या जागेवर एअर मार्शल आशुतोष दीक्षित हे चीफ्स ऑफ इंटिग्रेटेड डीफेन्स स्टाफ कमिटीमध्ये पदभार स्वीकारणार आहेत. ते सध्या प्रयागराजच्या सेंट्रल एअर कमांडचे प्रमुख आहेत. भारताचे मिराज २००० हे लढाऊ विमान उडवण्याचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे.

लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचेंद्र कुमार निवृत्त होत आहेत. यामुळे भारताच्या नॉर्दन आर्मी कमांडची जबाबदारी लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा हाती घेणार आहेत. नॉर्दन आर्मी कमांड ही जम्मू काश्मीर आणि लडाख तसेच सियाचीन येथील सर्व लष्करी कारवायांवर नियंत्रण ठेवते. पाकिस्तान आणि चीनच्या कारवायांना उत्तर देण्यासाठी याच कमांडकडून निर्देश दिले जातात.
Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे