Breaking News : आंधळं प्रेम की जाळं? अहिल्यानगरमधून १३६ मुली अचानक बेपत्ता का?

अहिल्यानगर : प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. याचं आंधळ्या प्रेमाला सोशल मीडियामुळे आणखी बळ मिळते. तरुणाई या आंधळ्या प्रेमामुळे अनेकदा चुकीचे निर्णय घेताना दिसते. फेब्रुवारी ते मार्च असा महाविद्यालयीन, शाळांचा परीक्षेचा काळ असतो. याच काळात अहिल्यानगर येथील १३६ मुली बेपत्ता झाल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.



अहिल्यानगर मध्ये मुली बेपत्ता असल्याचं प्रकरण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याची कारणे वेगवेगळी असली तरी प्रेमसंबंध हे प्रमुख कारण आहे. मात्र, अशाच काही घटनांमधून अघटित घटना घडल्याची उदाहरणे समोर आहेत. गेल्या दोन ते तीन महिन्यांचा आढावा घेतला तर तीन महिन्यांत सर्वाधिक मुली पळून गेल्या आहेत. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्यात दहावी, बारावीच्या परीक्षेचा काळ असतो. याच काळात नेमक्या मुली पळून गेल्या आहेत.


एका सर्वेक्षणामध्ये शाळकरी वयामध्ये एखाद्या मुलाबरोबर प्रेम जडणे आणि त्यातून मुलांच्या आमिषाला बळी पडून मुली पळून जाणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून परराज्यातील एखाद्या मुलाबरोबर प्रेम जडणे, प्रेमाच्या आणाभाका घेणे, नंतर घरातून निघून जाणे असे साधारणपणे घडताना दिसते. कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थिती ही कारणेदेखील त्यात समोर आली आहेत. गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यातून १३६ मुली पळून गेल्या आहेत. त्यापैकी अवघ्या ७१ मुली सापडल्या आहेत. अन्य बेपत्ता मुलींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. दरम्यान या घटनेने नगर हादरले आहे.

Comments
Add Comment

सव्वा महिन्याच्या संसाराचा हृदयद्रावक शेवट, पोटाला दगड बांधला अन्…

Yavatmal News : यवतमाळमध्ये प्रेमविवाह केलेल्या नवविवाहित जोडप्याचा हृदयद्रावक शेवट झाला आहे. पोटाला दगड बांधून दोघांनी

Agriculture Minister Dattatreya Bharne : वादळी वाऱ्यामुळे बाधित फळपिकांचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करा; शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

मुंबई : राज्यातील मे व जून २०२६ या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या

Maharashtra Kesari Sikandar Shaikh : ‘महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखच्या थारचा भीषण अपघात!’ गाडीचा चक्काचूर; मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचाव

सांगली : महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी किताब पटकावून कुस्तीविश्वात स्वतःचा दबदबा निर्माण करणारा स्टार पैलवान

PM YOJANA : पंतप्रधान इंटर्नशिप योजना (PMIS); एनसीसी छात्रांसाठी सुवर्णसंधी

PUNE : राष्ट्रीय छात्र सेना (NCC) महाराष्ट्र संचालनालयाने 'पंतप्रधान इंटर्नशिप योजना' (PMIS) अंतर्गत राज्यातील एनसीसी

Sikandar Shaikh car accident : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखच्या गाडीचा भीषण अपघात; थारचा चक्काचूर, पैलवान थोडक्यात बचावला

सोलापूर : सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर सांगोला-मिरज (Miraj) मार्गावर महाराष्ट्रातील नामांकित कुस्तीपटू

Jalgoan : जळगावात एफडीएची मोठी कारवाई ! २१ लाखांचा गुटखा जप्त

Jalgoan : जळगाव जिल्ह्यात अवैध गुटखा तस्करीविरोधात ( Illegal gutka smuggling) अन्न व औषध प्रशासनाने मोठी धाडसी कारवाई केले आहे. या