वेळ आणि टार्गेट तुम्ही ठरवा! – पंतप्रधान मोदींनी सैन्याला दिला फ्री हँड

नवी दिल्ली: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशातून दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानवर कारवाईची मागणी केली जात आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही दलांच्या अध्यक्षांसह उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत सीडीएस अनिल चौहान आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही सहभागी होते.



पंतप्रधान मोदींनी लष्कराला दिली सूट


सूत्रांच्या माहितीनुसार ही बैठक सुमारे अडीच तास सुरू होती. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पंतप्रधान मोदींनी लष्कराला पूर्णपणे सूट दिली आहे. ते म्हणाले, दहशतवादाला उत्तर देणे आमचा दृढ राष्ट्रीय संकल्प आहे. त्यांनी यावेळेस भारतीय सैन्य दलाच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास व्यक्त केला.


पंतप्रधान मोदी म्हणाले, आमची प्रत्युत्तर कारवाईची पद्धत काय आहे, टार्गेट्स काय असतील आणि याची योग्य वेळ काय असेल या प्रकारचे ऑपरेशन निर्णय घेण्यासाठी सैन्य दलाला संपूर्ण सूट देण्यात आली आहे.


पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला नाहक जीव गमवावा लागला होता. यावेळेस पंतप्रधानांनी या हल्ल्याचा कट रचणारे तसेच दहशतवाद्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे म्हटले होते.

Comments
Add Comment

भारतासाठी आनंदाची बातमी ! चीन, पाकिस्तानची झोपच उडणार ; भारत आणि रशियामध्ये मोठा करार

Big deal between India and Russia : भारत आणि रशिया या दोन देशांतील मैत्रीपूर्ण संबंध संपूर्ण जगाला माहित आहे. जगाचा विरोध धुडकावत कधी

Heat Wave: पुढील तीन दिवस जरा जपूनच ! राज्यातील 'हे' शहर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत; नाशिकची स्थिती काय ?

Maharashtra Weather Update : राज्यभरात तपमानानं कहर केल्याचे चित्र आहे. अशातच प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या

West Bengal Election 2026 : विक्रमी मतदानामुळे ममता बॅनर्जींचे सरकार संपुष्टात येईल - अमित शाह

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्ह्यातील राणाघाट येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Karnataka : पादचारी पूल कोसळला, आठ जखमी

मंगळुरू : कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री तालुक्यात एक अरुंद पादचारी पूल कोसळला. या

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये ठिकठिकाणी ईडीच्या धाडी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वीच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राजधानी कोलकात्यात

Indian History : सापडले दोन हजार वर्षे जुने तीन किलो वजनाचे प्राचीन ताम्रपत्र

बिलासपूर : छत्तीसगडच्या बिलासपूर येथील मल्हार परिसरातील रहिवासी संजीव पांडेय यांच्या ताब्यातून सुमारे २०००