पुणे विमानतळावर १० रुपयांत चहा, २० रुपयांत कॉफी

पुणे : हवाई प्रवास करताना योग्य दरात आणि गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘उडान कॅफे’ हे उपहारगृह आजपासून सुरू करण्यात आले आहे. या कॅफेमधून विमान प्रवाशांना विमानतळावर स्वस्तात आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध होणार आहेत.


‘उड़े देश का आम नागरिक’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पानुसार आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री राम मोहन नायडू यांच्या नेतृत्वात ‘उडान कॅफे’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. या कॅफेच्या माध्यमातून प्रवाशांना 10 रुपयांत पाणी आणि चहा, 20 रुपयांत कॉफी, 20 रुपयांत समोसा आणि 20 रुपयांत मिठाई उपलब्ध होत आहे.

कोलकाता, अहमदाबाद आणि चेन्नई या विमानतळांवर ही सेवा सुरू केली असून, या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आता ही सेवा आजपासून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरू झाले आहे. त्याचे उद्घाटन केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले . या सेवेमुळे विमान प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Comments
Add Comment

पुण्याच्या आरुषची गगनभरारी, १० व्या वर्षी अवकाशाला गवसणी

पुणे : हल्लीची मुलं ही मुळातच हुशार असतात. लहानग्या वयातच त्यांचा पंखात असणारं बळ हे प्रचंड असतं. थोडक्यात काय तर

Kolhapur Accident : ब्रेकिंग! कोल्हापूरच्या शाहू मिल चौकात भरधाव क्रेटाने दुचाकीला चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि गजबजलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहू मिल चौकात (Kolhapur Accident)

जुन्नरमधील शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या लहानग्यांच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला मदतीचा हात

इनामदार कुटुंबाला शिवसेनेकडून पाच लाखांची मदत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉल करून केले मृत

Ladki Bahin Yojana e-KYC: बहिणींसाठी आनंदवार्ता! 'या' दिवसापर्यंत आता करता येणार ई-केवायसी

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. त्यानुसार आता ज्या लाडक्या

Mumbai Mayor : मुंबईच्या महापौरपदाचा उमेदवार आज ठरणार!

महापौर आणि उपमहापौरपदासाठी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईचा महापौर कोण याबाबत

ZP and Panchayat Samiti Elections 2026 : राज्यातील १२ जिल्हा परिषदांसह पंचायत समितीसाठी ७,४३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात…

मुंबई : गेल्या काही काळापासून राज्यात सुरू असलेला निवडणुकांचा धडाका आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. लोकसभा,