हवाई दलापोठापाठ भारतीय नौदलातही दाखल होणार राफेल विमानांचा ताफा

नवी दिल्ली : भारत सरकारने काही वर्षांपूर्वी हवाई दलाकरिता ३६ राफेल विमानं खरेदी करण्याचा करार फ्रान्स सरकारसोबत केला. आता केंद्र सरकारने नौदलासाठी २६ राफेल विमानं खरेदी करण्याचा करार फ्रान्स सरकारसोबत केला आहे. दिल्लीत भारताचे संरक्षण सचिव राजेश कुमार आणि फ्रान्सचे राजदूत यांनी करारावर स्वाक्षरी केली. याप्रसंगी दोन्ही देशांचे संरक्षणमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.







राफेल विमानांच्या खरेदीसाठी भारत सरकारने फ्रान्स सरकारशी सलग दुसऱ्यांदा थेट करार केला आहे. यावेळी मरीन कॉम्बॅक्ट राफेल विमानांची खरेदी भारत करणार आहे. यासाठी दोन्ही देशांच्या सरकारांमध्ये ६३ हजार कोटी रुपयांचा करार झाला आहे. फ्रान्सकडून येणार असलेल्या २६ राफेल विमानांचा ताफा आयएनएस विक्रांत या विमानवाहक नौकेवर तैनात केला जाणार आहे.

फ्रान्सचे हवाई दल आणि नौदल राफेल विमानांचा वापर करते. भारतातही हवाई दल राफेल विमानांचा वापर करत आहे. आता भारतीय नौदलासाठीही राफेल विमानांचा ताफा येणार आहे. भारतीय नौकांच्या रचनेचा विचार करुन नौदलासाठीच्या राफेलमध्ये थोडे बदल केले जाणार आहेत. या बदलांमुळे नौकेवरील मर्यादीत जागेचा वापर करुन उड्डाण करणे किंवा उतरणे हे दोन्ही राफेल विमानांना शक्य होणार आहे. भारतीय नौकांमध्ये धावपट्टी एका बाजूस किंचित चढण असलेली अशी तिरपी असते. या रचनेस अनुकूल असे बदल राफेलमध्ये केले जाणार आहेत.

हवाई दलाची ३६ आणि नौदलाची २६ अशी एकूण ६२ राफेल लढाऊ विमानं लवकरच भारतीय सैन्याच्या ताफ्यात असतील.
Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही