पाकिस्तानच्या जिहादची नवी पद्धत, भाजपाच्या निशिकांत दुबेंचा आरोप

Share

नवी दिल्ली : पाकिस्तानने जिहादची एक नवी पद्धत वापरण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी महिला भारतात येतात आणि भारतीय व्यक्तीशी निकाह करतात. निकाह केला तरी त्या भारताची नागरिकता स्वीकारत नाहीत. पण इथे मुलांना जन्म देतात आणि अधूनमधून माहेरपणाला जाण्याच्या निमित्ताने पाकिस्तानचा दौरा करुन येतात.

पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले. पाकिस्तानच्या नागरिकांना देश सोडण्याचा आदेश दिला. या निमित्ताने पाकिस्तानी महिलांचा जिहाद उघड झाला.

भारतात किमान पाच लाख पाकिस्तानी महिला निकाह करुन राहत आहेत, असे भाजपाचे लोकसभेतील खासदार निशिकांत दुबे म्हणाले. पाकिस्तानमधून आलेल्या महिलांचा मुद्दाम भारतीयांशी निकाह करण्याचा उद्देश काय आहे, याचा तपास व्हायलाच हवा; अशीही मागणी निशिकांत दुबेंनी केली आहे.

खासदाराने थेट एक्स पोस्ट करुन आरोप केल्यामुळे अनेकांचं लक्ष वेधलं गेलंय. आता या प्रकरणात केंद्र सरकार काय कारवाई करतंय याकडे अनेकांच लक्ष आहे.

Recent Posts

पुणे विमानतळावर १० रुपयांत चहा, २० रुपयांत कॉफी

पुणे : हवाई प्रवास करताना योग्य दरात आणि गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने पुणे…

4 minutes ago

भारत खरेदी करणार २६ मरीन राफेल फायटर्स

फ्रांन्सशी झाला ६४ हजार कोटी रुपयांचा करार नवी दिल्ली: भारत सरकार नौदलासाठी 26 राफेल मरीन…

18 minutes ago

Breaking News : पाकिस्तानी युट्यूब चॅनल बंदी नंतर सरकारचा ‘बीबीसीला’ इशारा

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तानात तणावपूर्ण वातावरण आहे. हे संबंध आणिखी ताणले जाऊ…

34 minutes ago

Raigad: रायगड जिल्ह्यात वणव्यांमुळे तीन हजार हेक्टर वनक्षेत्राची हानी

मागील पाच वर्षांत लागले एक हजार वणवे; ९० टक्के मानवनिर्मित; वनसंपदेला वाढता धोका अलिबाग :…

60 minutes ago

पहलगाम अतिरेकी हल्ल्याचे दोन धक्कादायक व्हिडीओ

पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २५ हिंदू पर्यटक आणि एक स्थानिक…

1 hour ago