भारत खरेदी करणार २६ मरीन राफेल फायटर्स

फ्रांन्सशी झाला ६४ हजार कोटी रुपयांचा करार


नवी दिल्ली: भारत सरकार नौदलासाठी 26 राफेल मरीन लढाऊ विमान खरेदी करणार आहे. यासंदर्भात आज, सोमवारी फ्रान्सशी 64 हजार कोटी रुपयांच्या खरेदी करारावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या कराराच्या स्वाक्षरी कार्यक्रमावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि नौदलाचे व्हाइस चीफ व्हाइस ऍडमिरल के. स्वामीनाथन उपस्थित होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील या महिन्याच्या सुरुवातीला सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने भारतीय नौदलासाठी 26 अत्याधुनिक राफेल-मरिन लढाऊ विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली होती. या स्पर्धात्मक प्रक्रियेत अमेरिकन बोईंग एफ/ए 18 सुपर हॉर्नेटचाही समावेश होता. पण भारतीय नौदलाने राफेल लढाऊ विमानांची निवड केली. राफेल हे भारतीय आवश्यकतेनुसार अधिक योग्य असल्याचे आढळून आले. त्यामुळे राफेलची निवड करण्यात आली आहे.


ही राफेल विमाने अत्याधुनिक शस्त्र प्रणालींनी सुसज्ज असतील. यात लांब पल्ल्याची हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध यांचा समावेश असेल. या करारानुसार भारतात विमाने निर्मिती करणे अनिवार्य नसले तरी, राफेलमध्ये सहभागी असलेल्या डसॉल्ट, थेल्स आणि एमबीडीए सारख्या फ्रेंच कंपन्या त्यांच्या भारतीय भागीदारांना स्थानिक पातळीवर उपकरणे आणि उपप्रणाली निर्मितीसाठी ऑर्डर देण्याची शक्यता आहे.


या करारातर्गंत 22 सिंगल सीट राफेल-एम आणि 4 डबल ट्रेनर सीट राफेल-एम विमाने भारताकडून खरेदी करण्यात येणार आहेत. हिंदी महासागरातच ही विमाने तैनात केली जाणार आहेत. युद्धनौका तसेच अणुप्रकल्पांवर हल्ला करण्यात ही विमाने तरबेज मानली जातात. आयएनएस विक्रांत या युद्धनौकेवर या विमानांचा तळ असेल. याआधीही भारताने सप्टेंबर 2019 मध्ये फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमानांची खरेदी केली होती. त्यासाठी 59 हजार कोटी रुपये मोजले होते.

Comments
Add Comment

नोबेल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प यांची वर्णी लागणार का ? आज होणार घोषणा

नॉर्वे : नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे आज नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे. यावर्षी नोबेल शांतता

भारतातील कोणत्या राज्यात आणि जिल्ह्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके कुठे आहेत? जाणून घ्या इंटरेस्टिंग माहिती.

भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? आणि कोणत्या जिल्ह्यात ४०

ब्रिटनची ९ मोठी विद्यापीठे भारतात कॅम्पस सुरू करणार; पंतप्रधान मोदी आणि कीर स्टार्मर यांची मोठी घोषणा

मुंबई: भारत-ब्रिटन संबंधांमध्ये शिक्षण आणि युवाशक्तीला बळ देणारा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. ब्रिटनचे

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार

दहशतवाद्यांनी बर्फवृष्टीचा फायदा घेऊन घुसखोरी करू नये , सुरक्षा दलांनी सज्ज रहावे - अमित शाह

नवी दिल्ली : “केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधातील “शून्य सहनशीलता” धोरण पुढेही कायम राहणार आहे”, असे केंद्रीय

मोठा अपघात टळला; फर्रुखाबादमध्ये खाजगी विमानाचा अपघात

फर्रुखाबा : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथील विमान तळावर आज सकाळी एका खासगी विमानाचा