भारत खरेदी करणार २६ मरीन राफेल फायटर्स

फ्रांन्सशी झाला ६४ हजार कोटी रुपयांचा करार


नवी दिल्ली: भारत सरकार नौदलासाठी 26 राफेल मरीन लढाऊ विमान खरेदी करणार आहे. यासंदर्भात आज, सोमवारी फ्रान्सशी 64 हजार कोटी रुपयांच्या खरेदी करारावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या कराराच्या स्वाक्षरी कार्यक्रमावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि नौदलाचे व्हाइस चीफ व्हाइस ऍडमिरल के. स्वामीनाथन उपस्थित होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील या महिन्याच्या सुरुवातीला सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने भारतीय नौदलासाठी 26 अत्याधुनिक राफेल-मरिन लढाऊ विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली होती. या स्पर्धात्मक प्रक्रियेत अमेरिकन बोईंग एफ/ए 18 सुपर हॉर्नेटचाही समावेश होता. पण भारतीय नौदलाने राफेल लढाऊ विमानांची निवड केली. राफेल हे भारतीय आवश्यकतेनुसार अधिक योग्य असल्याचे आढळून आले. त्यामुळे राफेलची निवड करण्यात आली आहे.


ही राफेल विमाने अत्याधुनिक शस्त्र प्रणालींनी सुसज्ज असतील. यात लांब पल्ल्याची हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध यांचा समावेश असेल. या करारानुसार भारतात विमाने निर्मिती करणे अनिवार्य नसले तरी, राफेलमध्ये सहभागी असलेल्या डसॉल्ट, थेल्स आणि एमबीडीए सारख्या फ्रेंच कंपन्या त्यांच्या भारतीय भागीदारांना स्थानिक पातळीवर उपकरणे आणि उपप्रणाली निर्मितीसाठी ऑर्डर देण्याची शक्यता आहे.


या करारातर्गंत 22 सिंगल सीट राफेल-एम आणि 4 डबल ट्रेनर सीट राफेल-एम विमाने भारताकडून खरेदी करण्यात येणार आहेत. हिंदी महासागरातच ही विमाने तैनात केली जाणार आहेत. युद्धनौका तसेच अणुप्रकल्पांवर हल्ला करण्यात ही विमाने तरबेज मानली जातात. आयएनएस विक्रांत या युद्धनौकेवर या विमानांचा तळ असेल. याआधीही भारताने सप्टेंबर 2019 मध्ये फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमानांची खरेदी केली होती. त्यासाठी 59 हजार कोटी रुपये मोजले होते.

Comments
Add Comment

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा