एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरातील १९ इमारतींमधील सर्व रहिवाशांना त्याच ठिकाणी घरे मिळणार!

पुनर्विकास एमएमआरडीए करणार; फडणवीस-शिंदेंचा थेट दिलासा!


मुंबई : एल्फिन्स्टन पुलाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या १९ इमारतींबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेत येथील सर्व रहिवाशांना दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.


या बैठकीत मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी स्थानिक रहिवाशांचा आवाज बुलंद करत मुद्दा लावून धरला. कालिदास कोळबंकर यांच्या सूचनेवर आधारित शिफारशीही समोर आल्या. मुळात, एल्फिन्स्टन पुलाच्या कामामुळे आधी १९ इमारतींना धोका होता; आता नव्या नियोजनामुळे केवळ २ इमारतींवर परिणाम होणार आहे. पण स्थानिक नागरिकांची भीती होती की "पुलाचे काम सुरू झाल्यावर अन्य १७ इमारतींनाही धोका निर्माण होईल!"



म्हणून भाजपा आमदार कालिदास कोळबंकर आणि अॅड. आशिष शेलार यांनी ठाम भूमिका घेत आक्रमकपणे मागणी केली की, "गिरणगावातील मराठी माणसाला उखडून फेकायला आम्ही देणार नाही. सगळ्या १९ इमारतींचा पुनर्विकास एमएमआरडीएनेच ताबडतोब करावा! कोणत्याही विकासकाची वाट पाहायची गरज नाही!"


मुख्यमंत्र्यांनीही हा आग्रह मान्य केला. त्यानुसार, संपूर्ण पुनर्विकासाच्या योजनेत, बाधित २ इमारतींतील रहिवाशांना कुर्ला येथे तात्पुरती घरे देण्यात येणार आहेत. आणि मग त्यांनाही आपल्या मूळ जागीच नव्या घरात वसवलं जाणार आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या निर्णयामुळे गिरणगावातील नागरिकांना आज मोठा दिलासा मिळाला आहे.

Comments
Add Comment

TET Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तिघांना अटक, परीक्षा पुढे ढकलल्याने लाखो उमेदवारांमध्ये संताप

मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२६ च्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या संशयावरून राज्यभरात खळबळ उडाली असून या

Ketan Agrawal Murder Case : क्रिकेटचं मैदान ते हत्येचा कट; २००० कॉल्स, २३८ तास संवाद अन् सिया-चेतनच्या अफेअरची 'इनसाईड स्टोरी' उघड!

पुणे : पुण्याजवळील लोहगड किल्ल्याच्या भयावह दरीत केतन अग्रवाल (Ketan Agrawal) या तरुणाला ढकलून दिलेल्या प्रकरणाचा तपास

BMC Schools : जेम पोर्टलमुळे शालेय वस्तू खरेदीला विलंब नाही, महापालिका प्रशासनाने केली भूमिका स्पष्ट

वह्या, पुस्तकांच्या वजनानुसार मुलांना दप्तरे द्या तब्बल दोन वर्षांतील ४३ कोटी रुपयांची झाली बचत मुंबई : मुंबई

BMC : इतर प्राधिकरणांच्याा जमिनीवर विकासकामे करताना अडचणींचा डोंगर

अतिरिक्त आयुक्तांनी दिला समन्वय राखण्याचा सूचना मुंबई : मुंबईतील (Mumbai) विविध प्राधिकरणांच्या हद्दीत आरोग्य

Mahim Crime : धक्कादायक! मोबाईलच्या किरकोळ वादावरून थेट चाकूचे सपासप वार; माहिम स्टेशनबाहेर तरुणावर हल्ला

मुंबई : मुंबईत किरकोळ कारणावरून होणाऱ्या हिंसक घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

BMC News : महापालिका सभागृह आता भरणार दर सोमवारी आणि गुरुवारी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सभा या महिन्याला चार किंवा पाच घेण्याची प्रथा असली तरी या महापालिकेत अभ्यासू