'या' टीम प्ले ऑफमध्ये पोहोचतील, अनिल कुंबळेची भविष्यवाणी

  76

बंगळुरू : आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत ४४ सामने झाले आहेत. या सामन्यांमध्ये सर्व संघांनी केलेल्या कामगिरीचा आढावा घेऊन समालोचक आणि टीम इंडियाचा माजी खेळाडू अनिल कुंबळे याने प्ले ऑफमध्ये कोण पोहोचेल याबाबतचे भाकीत वर्तविले आहे. अनिल कुंबळेच्या मते गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या पाच पैकी चार टीम प्ले ऑफमध्ये पोहोचतील. प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या बाबतीत गुजरात, दिल्ली, मुंबई आणि पंजाब यांची शक्यता सर्वाधिक आहे.



सध्या आयपीएल २०२५ गुणतक्त्यात गुजरात टायटन्स हा संघ पहिल्या स्थानावर, दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तिसऱ्या, पंजाब किंग्स चौथ्या आणि मुंबई इंडियन्स पाचव्या स्थानी आहेत. गुजरात आणि दिल्ली या दोन संघांनी यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत प्रत्येकी आठ सामने खेळून आणि सहा सामने जिंकून गुणतक्त्यात आघाडी घेतली आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांनी प्रत्येकी नऊ सामने खेळले आहेत. बंगळुरू नऊ पैकी सहा तर पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स नऊ पैकी पाच सामने जिंकू शकले आहेत. पंजाबचा एक सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित राहिला. समसमान गुण असल्यास धावगतीच्याआधारे गुणतक्त्यातील स्थान निश्चित करण्यात आले आहे.



मुंबई इंडियन्स रविवारी लखनऊ सुपर जायंटन्स विरोधात मैदानात उतरणार आहे. हा सामना मुंबईत वानखेडेवर होणार आहे. यामुळे घरचा सामना जिंकून स्पर्धेतील स्वतःची स्थिती भक्कम करण्याची संधी मुंबईकडे आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये सुरुवातीचे सामने हरलेल्या मुंबईने नंतर कामगिरी सुधारत उसळी मारली आहे. हे बघता मुंबईला प्ले ऑफमध्ये धडक मारण्याची संधी आहे, असा विश्वास अनिल कुंबळेने व्यक्त केला आहे.

संध्याकाळी दिल्लीच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने असतील. हा सामना दिल्ली जिंकण्याची शक्यता जास्त आहे. कारण दिल्लीचा संघ फॉर्मात आहे, शिवाय आजचा सामना दिल्लीच्या मैदानात आहे. याआधी जेव्हा दिल्ली आणि बंगळुरू आमनेसामने होते त्यावेळी दिल्लीने बंगळुरू विरुद्धचा सामना सहा गडी राखून जिंकला होता. यामुळे कुंबळेने आयपीएल २०२५ च्या प्ले ऑफमध्ये गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स हे संघ जाण्याची शक्यता जास्त असल्याचे मत व्यक्त केले आहे.
Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र