'या' टीम प्ले ऑफमध्ये पोहोचतील, अनिल कुंबळेची भविष्यवाणी

बंगळुरू : आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत ४४ सामने झाले आहेत. या सामन्यांमध्ये सर्व संघांनी केलेल्या कामगिरीचा आढावा घेऊन समालोचक आणि टीम इंडियाचा माजी खेळाडू अनिल कुंबळे याने प्ले ऑफमध्ये कोण पोहोचेल याबाबतचे भाकीत वर्तविले आहे. अनिल कुंबळेच्या मते गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या पाच पैकी चार टीम प्ले ऑफमध्ये पोहोचतील. प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या बाबतीत गुजरात, दिल्ली, मुंबई आणि पंजाब यांची शक्यता सर्वाधिक आहे.



सध्या आयपीएल २०२५ गुणतक्त्यात गुजरात टायटन्स हा संघ पहिल्या स्थानावर, दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तिसऱ्या, पंजाब किंग्स चौथ्या आणि मुंबई इंडियन्स पाचव्या स्थानी आहेत. गुजरात आणि दिल्ली या दोन संघांनी यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत प्रत्येकी आठ सामने खेळून आणि सहा सामने जिंकून गुणतक्त्यात आघाडी घेतली आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांनी प्रत्येकी नऊ सामने खेळले आहेत. बंगळुरू नऊ पैकी सहा तर पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स नऊ पैकी पाच सामने जिंकू शकले आहेत. पंजाबचा एक सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित राहिला. समसमान गुण असल्यास धावगतीच्याआधारे गुणतक्त्यातील स्थान निश्चित करण्यात आले आहे.



मुंबई इंडियन्स रविवारी लखनऊ सुपर जायंटन्स विरोधात मैदानात उतरणार आहे. हा सामना मुंबईत वानखेडेवर होणार आहे. यामुळे घरचा सामना जिंकून स्पर्धेतील स्वतःची स्थिती भक्कम करण्याची संधी मुंबईकडे आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये सुरुवातीचे सामने हरलेल्या मुंबईने नंतर कामगिरी सुधारत उसळी मारली आहे. हे बघता मुंबईला प्ले ऑफमध्ये धडक मारण्याची संधी आहे, असा विश्वास अनिल कुंबळेने व्यक्त केला आहे.

संध्याकाळी दिल्लीच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने असतील. हा सामना दिल्ली जिंकण्याची शक्यता जास्त आहे. कारण दिल्लीचा संघ फॉर्मात आहे, शिवाय आजचा सामना दिल्लीच्या मैदानात आहे. याआधी जेव्हा दिल्ली आणि बंगळुरू आमनेसामने होते त्यावेळी दिल्लीने बंगळुरू विरुद्धचा सामना सहा गडी राखून जिंकला होता. यामुळे कुंबळेने आयपीएल २०२५ च्या प्ले ऑफमध्ये गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स हे संघ जाण्याची शक्यता जास्त असल्याचे मत व्यक्त केले आहे.
Comments
Add Comment

IPL 2026 : सामना न खेळणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने जाहीर केली नवीन नियमावली; नियमांचे पालन न केल्यास होणार कारवाई

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने आयपीएलसाठी अनेक कठोर नियम लागू केले आहेत. या नवीन

Bangladesh Cricket Board : अखेर बांगलादेश नरमला; बांग्लादेश क्रिकेट बोर्डाकडून भारताला आमंत्रण

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) (Bangladesh Cricket Board) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसी) पत्र लिहून कळवले आहे की,

IPL 2026 Sunil Gavaskar : सुनील गावस्करांची अनफिट क्रिकेटपटूंवर टीका

मुंबई : भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी पुन्

IPL 2026 : गुवाहाटीवर पावसाचे सावट! MI vs RR थरार रंगणार की सामना होणार रद्द?

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या