देशाची आरोग्य व्यवस्था जगात सर्वात सक्षम आणि मोठी - जे.पी.नड्डा

छत्रपती संभाजीनगर : जगात आपल्या देशाची आरोग्य व्यवस्था सर्वात मोठी असून या आरोग्यव्यवस्थेने प्रगती केली आहे. लसीकरण, महिलांचे आरोग्य, बाल आरोग्य तसेच इतर वैद्यकीय सेवा सुविधांमध्ये आपला देश आघाडीवर असून आपल्या देशात वैद्यकीय पर्यटनाच्या माध्यमातून नवे क्षेत्र खुले झाले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी आज येथे केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान,अंतर्गत आर. के. दमानी मेडिकल कॉलेज, श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या महाविद्यालयाच्या कौशलम् - द स्किल लॅबचे उद्घाटन जे.पी. नड्डा यांच्या हस्ते करण्यात आले.

राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड, उद्योजक कृषी कुमार बागला, उमेश दाशरथी, डॉ.विदेश केसरी,डॉ. सतीश कुलकर्णी, महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. स्वाती शिरेडकर यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध विभाग प्रमुख तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

नड्डा म्हणाले की, डॉ. हेडगेवार यांच्या सेवेचा वारसा या रुग्णालयाच्या माध्यमातून पुढे चालवला जात आहे. आणि ही संस्था आरोग्य सेवेसाठी समर्पित आहे. आरोग्य सेवेचे शाश्वत उद्दिष्ट समोर ठेवून मिशन मोडवर या रुग्णालयाने समाजाची गोरगरीब रुग्णांची सेवा केली आहे. या सेवेचे विस्तारित स्वरूप आर के दमानिया रुग्णालय आणि महाविद्यालयाच्या माध्यमातून केले जाईल. बदलत्या आरोग्य सेवेतील तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी व्हावा. यासाठी रुग्णालय आणि महाविद्यालयातील प्रत्येक डॉक्टर आणि सेवा च्या माध्यमातून ही संधी उपलब्ध करून दिली आहे. आरोग्य क्षेत्रामधील भारताची प्रगती ही इतर देशांना मार्गदर्शक आहे. लोकसंख्या व भौगोलिक विविधता असूनही आरोग्य व्यवस्था सक्षम आणि अग्रेसर असल्याचे, प्रतिपादन मंत्री नड्डा यांनी केले. जागतिक पातळीवर जास्तीत जास्त डॉक्टर विविध विषयातील तज्ज्ञ निर्माण करण्याची संधी भारताने निर्माण केली असून या देशातील वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर परदेशातही आपले विशेष स्थान निर्माण करून आहेत. नवीन विद्यार्थ्यांनी वैद्यकीय सेवा ही एक संधी समजून समाजसेवा करण्याचे ध्येय ठरवावे, असे आवाहन नड्डा यांनी विद्यार्थ्यांना केले.

Comments
Add Comment

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर

'एआय' तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार; मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू