पाकिस्तानने भारताला दिली अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी

इस्लामाबाद : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढण्यास सुरवात झाली आहे. पाकिस्तानचे मंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी दिली आहे.



व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये पाकिस्तानचे मंत्री हनीफ अब्बासी भारताला सिंधू नदीचे पाणी थांबवल्यास युद्धासाठी तयार राहण्याचा इशारा देताना दिसत आहेत. पाकिस्तानचे पाणी थांबवले तर भारताने युद्धासाठी तयार व्हावे. घौरी, शाहीन, गझनवी ही क्षेपणास्त्र फक्त प्रदर्शनासाठी नाहीत. भारताला उत्तर देण्यासाठीच ठेवली आहेत. आम्ही १३० अण्वस्त्रे प्रदर्शनात मांडण्यासाठी ठेवलेली नाहीत. ती पाकिस्तानात कुठे आहेत हे तुम्ही पाहू शकत नाही. पण हवी तेव्ही आम्ही ती वापरू; या शब्दात पाकिस्तानचे मंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी दिली आहे.



भारताने सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित केला तर रक्ताचे पाट वाहतील, असे पाकिस्तानचे मंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला सांगितले. सिंधू आमची आहे आणि आमचीच राहील - एकतर आमचे पाणी त्यातून वाहेल किंवा त्यांचे रक्त अशी भाषा पाकिस्तानच्या मंत्र्यांने केली.

पहलगाम अतिरेकी हल्ला

पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे हिंदू पर्यटकांची नाव आणि धर्म विचारून हत्या केली. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढण्यास सुरवात झाली आहे. भारताने सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित केला तर पाकिस्तान सिमला करार स्थगित करेल, अशी भाषा पाकिस्तानने केली. आता त्यापुढे जात पाकिस्तानने अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी भारताला दिली आहे. पाकिस्तानने भारतासोबतचा व्यापार थांबवला आहे. भारतात येणाऱ्या - जाणाऱ्या विमानांना पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद केले आहे. पाकिस्तानने त्यांच्या देशातील भारतीय नागरिकांना देश सोडण्याचे निर्देश दिले आहेत. हे कमी म्हणून पाकिस्तानने इस्लामाबाद येथील भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांमध्ये कपात करण्याचे निर्देश दिले आहे. भारतीय दूतावासातील सैन्याच्या दूतांनाही देश सोडण्यास सांगितले आहे.

भारताने पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या नागरिकांना देश सोडण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच भारतीय दूतावासातील कर्मचारी स्वतःच कमी केले आहेत. पाकिस्तानच्या दिल्लीतील दुतावासाचे कर्मचारीही कमी करण्याचे निर्देश भारताने दिले आहेत. पाकिस्तानच्या दूतावासातील सैन्याच्या दूतांनाही देश सोडण्यास सांगण्यात आले आहे.
Comments
Add Comment

'ऑपरेशन सिंदूर'ने अझर मसूदच्या कुटुंबालाच संपवले; तुकडे तुकडे केले!

नवी दिल्ली: भारताच्या धडक कारवाईने दहशतवाद्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. आपल्या देशाच्या सुरक्षेला

अमेरिका-व्हेनेझुएला यांच्यातील तणाव वाढला, अमेरिकेचा ड्रग्ज जहाजावर मोठा हल्ला

वॉशिंग्टन: अमेरिकेने व्हेनेझुएलाहून अमेरिकेकडे येत असलेल्या एका संशयित ड्रग्ज जहाजावर पुन्हा एकदा लष्करी

नेपाळमध्ये सुशीला सरकारचा मोठा निर्णय, आंदोलनादरम्यान प्राण गमावलेल्या Gen-Z ला मिळणार शहीदांचा दर्जा

काठमांडू: नेपाळमध्ये सुशीला कार्की सरकार स्थापन झाल्यानंतर देश हळूहळू आता स्थिरस्थावर होत आहे. सोमवारी सुशीला

नेपाळ, फ्रान्सनंतर आता इंग्लंडमध्ये निदर्शन रॅली, लाखो लोकं रस्त्यावर

लंडन: नेपाळ आणि फ्रान्सनंतर आता आंदोलनाचे वारे ब्रिटनच्या रस्त्यावर देखील दिसून आले आहे. सर्वात महत्वाचे

अमेरिका रशियावर कठोर निर्बंध लादणार

नाटोला चीनवर ५० ते १०० टक्के टॅरिफ लादण्याची मागणी वॉशिंग्टन डीसी (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

सुशीला कार्की नेपाळच्या नव्या हंगामी पंतप्रधान

नेपाळची संसद बरखास्त, हंगामी सरकारचे नेतृत्व करणार नवी दिल्ली : नेपाळमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या