पाकिस्तानने भारताला दिली अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी

Share

इस्लामाबाद : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढण्यास सुरवात झाली आहे. पाकिस्तानचे मंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी दिली आहे.

व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये पाकिस्तानचे मंत्री हनीफ अब्बासी भारताला सिंधू नदीचे पाणी थांबवल्यास युद्धासाठी तयार राहण्याचा इशारा देताना दिसत आहेत. पाकिस्तानचे पाणी थांबवले तर भारताने युद्धासाठी तयार व्हावे. घौरी, शाहीन, गझनवी ही क्षेपणास्त्र फक्त प्रदर्शनासाठी नाहीत. भारताला उत्तर देण्यासाठीच ठेवली आहेत. आम्ही १३० अण्वस्त्रे प्रदर्शनात मांडण्यासाठी ठेवलेली नाहीत. ती पाकिस्तानात कुठे आहेत हे तुम्ही पाहू शकत नाही. पण हवी तेव्ही आम्ही ती वापरू; या शब्दात पाकिस्तानचे मंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी दिली आहे.

भारताने सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित केला तर रक्ताचे पाट वाहतील, असे पाकिस्तानचे मंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला सांगितले. सिंधू आमची आहे आणि आमचीच राहील – एकतर आमचे पाणी त्यातून वाहेल किंवा त्यांचे रक्त अशी भाषा पाकिस्तानच्या मंत्र्यांने केली.

पहलगाम अतिरेकी हल्ला

पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे हिंदू पर्यटकांची नाव आणि धर्म विचारून हत्या केली. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढण्यास सुरवात झाली आहे. भारताने सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित केला तर पाकिस्तान सिमला करार स्थगित करेल, अशी भाषा पाकिस्तानने केली. आता त्यापुढे जात पाकिस्तानने अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी भारताला दिली आहे. पाकिस्तानने भारतासोबतचा व्यापार थांबवला आहे. भारतात येणाऱ्या – जाणाऱ्या विमानांना पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद केले आहे. पाकिस्तानने त्यांच्या देशातील भारतीय नागरिकांना देश सोडण्याचे निर्देश दिले आहेत. हे कमी म्हणून पाकिस्तानने इस्लामाबाद येथील भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांमध्ये कपात करण्याचे निर्देश दिले आहे. भारतीय दूतावासातील सैन्याच्या दूतांनाही देश सोडण्यास सांगितले आहे.

भारताने पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या नागरिकांना देश सोडण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच भारतीय दूतावासातील कर्मचारी स्वतःच कमी केले आहेत. पाकिस्तानच्या दिल्लीतील दुतावासाचे कर्मचारीही कमी करण्याचे निर्देश भारताने दिले आहेत. पाकिस्तानच्या दूतावासातील सैन्याच्या दूतांनाही देश सोडण्यास सांगण्यात आले आहे.

Recent Posts

‘हवा प्रदूषणात’ भारताची स्थिती चिंताजनक

प्रा. नंदकुमार काकिर्डे स्वित्झर्लंडस्थित आय क्यू एअर संस्थेने जागतिक पातळीवरील हवा प्रदूषणाचा व्यापक अहवाल प्रसिद्ध…

2 hours ago

मजबूत औद्योगिक धोरण हवे

उमेश कुलकर्णी अमेरिकेला पुन्हा एकदा महान बनवण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जी पावले उचलत आहेत त्यांनी…

2 hours ago

सोने आकाशात, डाळी जमिनीवर…

महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये सोन्याच्या दरांचा वेलू अक्षरश: गगनावर गेला. वर्षभरातील किमतींची तुलना करता सोन्याने…

2 hours ago

शेअर मार्केटमधील शेअर खरेदी-विक्री अर्थात ट्रेडिंगचे प्रकार

डॉ. सर्वेश सुहास सोमण आपण आपले डीमॅट खाते उघडून त्यात काही पैस टाकले की आपण…

2 hours ago

जल पर्यटनाची नवी दिशा…

- सुनील जावडेकर महाराष्ट्रात विशेषत: मुंबई आणि कोकणातील पाच जिल्हे हे ७२० किलोमीटरच्या विस्तीर्ण अशा…

2 hours ago

आमची बेस्ट सक्षम व्हावी…

- अल्पेश म्हात्रे मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचे संबंध असणारा बेस्ट उपक्रम सध्या बिकट आर्थिक परिस्थितीतून जात आहे.…

2 hours ago