पाकिस्तानने भारताला दिली अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी

इस्लामाबाद : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढण्यास सुरवात झाली आहे. पाकिस्तानचे मंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी दिली आहे.



व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये पाकिस्तानचे मंत्री हनीफ अब्बासी भारताला सिंधू नदीचे पाणी थांबवल्यास युद्धासाठी तयार राहण्याचा इशारा देताना दिसत आहेत. पाकिस्तानचे पाणी थांबवले तर भारताने युद्धासाठी तयार व्हावे. घौरी, शाहीन, गझनवी ही क्षेपणास्त्र फक्त प्रदर्शनासाठी नाहीत. भारताला उत्तर देण्यासाठीच ठेवली आहेत. आम्ही १३० अण्वस्त्रे प्रदर्शनात मांडण्यासाठी ठेवलेली नाहीत. ती पाकिस्तानात कुठे आहेत हे तुम्ही पाहू शकत नाही. पण हवी तेव्ही आम्ही ती वापरू; या शब्दात पाकिस्तानचे मंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी दिली आहे.



भारताने सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित केला तर रक्ताचे पाट वाहतील, असे पाकिस्तानचे मंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला सांगितले. सिंधू आमची आहे आणि आमचीच राहील - एकतर आमचे पाणी त्यातून वाहेल किंवा त्यांचे रक्त अशी भाषा पाकिस्तानच्या मंत्र्यांने केली.

पहलगाम अतिरेकी हल्ला

पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे हिंदू पर्यटकांची नाव आणि धर्म विचारून हत्या केली. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढण्यास सुरवात झाली आहे. भारताने सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित केला तर पाकिस्तान सिमला करार स्थगित करेल, अशी भाषा पाकिस्तानने केली. आता त्यापुढे जात पाकिस्तानने अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी भारताला दिली आहे. पाकिस्तानने भारतासोबतचा व्यापार थांबवला आहे. भारतात येणाऱ्या - जाणाऱ्या विमानांना पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद केले आहे. पाकिस्तानने त्यांच्या देशातील भारतीय नागरिकांना देश सोडण्याचे निर्देश दिले आहेत. हे कमी म्हणून पाकिस्तानने इस्लामाबाद येथील भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांमध्ये कपात करण्याचे निर्देश दिले आहे. भारतीय दूतावासातील सैन्याच्या दूतांनाही देश सोडण्यास सांगितले आहे.

भारताने पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या नागरिकांना देश सोडण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच भारतीय दूतावासातील कर्मचारी स्वतःच कमी केले आहेत. पाकिस्तानच्या दिल्लीतील दुतावासाचे कर्मचारीही कमी करण्याचे निर्देश भारताने दिले आहेत. पाकिस्तानच्या दूतावासातील सैन्याच्या दूतांनाही देश सोडण्यास सांगण्यात आले आहे.
Comments
Add Comment

लिबियावर ४२ वर्षे राज्य करणाऱ्या हुकूमशहाच्या मुलाची हत्या

झिंतान : लिबियावर ४२ वर्षे राज्य करणाऱ्या हुकूमशहा मुअम्मर गद्दाफीचा मुलगा सैफ अल-इस्लाम गद्दाफीची गोळ्या झाडून

कुटुंबियांना वाचवण्यासाठी १३ वर्षीय मुलाची समुद्राशी झुंज; उसळत्या लाटा आणि त्यात....

पर्थ : अवघ्या तेरा वर्षांच्या मुलाने समुद्र आणि सोसाट्याच्या वाऱ्याशी झुंजत सलग चार तास पोहून आई, भाऊ आणि बहीण या

India EU Trade Deal: 'मदर ऑफ ऑल डील्स'ची पाकिस्तानाला भीती; पाकिस्तानातील नोकऱ्या संकटात येणार ?

पाकिस्तानचे माजी वाणिज्य मंत्री गोहर एजाज (Gohar Ejaz) यांनी सोशल मीडियावर पाकिस्तानमधील नोकऱ्या धोक्यात असल्याचे

भीक मागण्याची लाज वाटते, शरमेने मान खाली जाते

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली इस्लामाबाद : कर्जबाजारी पाकिस्तान गेल्या अनेक वर्षांपासून

व्हेनेझुएलाच्या तेल खरेदीसाठी भारताला ऑफर

वॉशिग्टन : गेल्या वर्षी अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या तेल खरेदीसाठी भारतावर शुल्क लादले होते. आता, अमेरिका पुन्हा

बलुचिस्तानमध्ये एकाच वेळी १२ ठिकाणी हल्ले

१२ सुरक्षा कर्मचारी, तर ३७ दहशतवादी ठार बलुचिस्तान : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात शनिवारी बलुच लिबरेशन