दुचाकीला धडकून विहिरीत पडली व्हॅन, सहा जणांचा मृत्यू

मंदसौर : भरधाव वेगाने जात असताना अनियंत्रित झालेली इको व्हॅन दुचाकीला धडकून विहिरीत पडली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. मृतांमध्ये विहिरीत पडलेल्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या एका नागरिकाचाही समावेश आहे. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशमधील मंदसौर जिल्ह्यातील नारायणगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुढा - टकरावत फाट्याजवळ घडली. अपघात आज म्हणजे रविवार २७ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता झाला.



इको व्हॅनच्या चालकाने वेळ वाचवण्यासाठी वेग पटकन वाढवला. पण वेग वाढवल्यामुळे व्हॅन अनियंत्रित झाली. अनियंत्रित व्हॅनने दुचाकीला धडक दिली. यानंतर व्हॅन जवळच असलेल्या विहिरीत जाऊन पडली. व्हॅनची धडक बसल्यामुळे दुचाकीस्वार गोबर सिंह आणि एका ग्रामस्थाचा मृत्यू झाला. व्हॅनमध्ये असलेल्यांपैकी तीन जणांचा मृत्यू झाला. व्हॅनसह विहिरीत पडलेल्यांना वाचवण्यासाठी एकाने प्रयत्न केला. पण दुर्दैवाने त्यावेळी विहिरीत कारमुळे मोठ्या प्रमाणात गॅसची निर्मिती झाली. या गॅसमुळे विहिरीत उतरलेल्या मनोहर सिंह याचा मृत्यू झाला. अपघातात चार जण जखमी झाले.

व्हॅनमध्ये चालक आणि दोन मुलांसह एकूण १३ जण होते. हे सर्वजण उज्जैन जिल्ह्यातील उन्हेल येथून नीमच जिल्ह्यातील मानसा भागात असलेल्या अंतरी माता मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जात होते. वेळ वाचवण्यासाठी चालकाने व्हॅनचा वेग वाढवला आणि अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या तीन वर्षांच्या मुलीसह चार जणांना वाचवण्यात आले. जखमींना मंदसौर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री जगदीश देवदा, जिल्हाधिकारी अदिती गर्ग, एसपी अभिषेक आनंद, अतिरिक्त एसपी गौतम सोलंकी आणि एसडीओपी नरेंद्र सोलंकी घटनास्थळी पोहोचले. बचावकार्य वेगाने सुरू आहे. अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी जिल्हा रुग्णालयातून ऑक्सिजन सिलिंडरही घटनास्थळी पाठविण्यात आले आहेत.
Comments
Add Comment

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे

पीएनजी असलेल्या भागात एलपीजी पुरवठा होणार बंद

नवी दिल्ली : देशातील ऊर्जा साखळीत मोठी सुधारणा करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले

आकाशवाणीवरुन २६ मार्चपासून "वंदे मातरम्" राष्ट्रीय गीताची पूर्ण आवृत्तीचे प्रसारण

नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर आकाशवाणी केंद्रांच्या सकाळच्या प्रसारणाची सुरुवात वैशिष्ट्यपूर्ण 'सिग्नेचर

सोनिया गांधी रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर

नवी दिल्ली : पोटात संसर्ग झाल्याची तक्रार केल्यानंतर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना मंगळवारी