दुचाकीला धडकून विहिरीत पडली व्हॅन, सहा जणांचा मृत्यू

  76

मंदसौर : भरधाव वेगाने जात असताना अनियंत्रित झालेली इको व्हॅन दुचाकीला धडकून विहिरीत पडली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. मृतांमध्ये विहिरीत पडलेल्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या एका नागरिकाचाही समावेश आहे. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशमधील मंदसौर जिल्ह्यातील नारायणगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुढा - टकरावत फाट्याजवळ घडली. अपघात आज म्हणजे रविवार २७ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता झाला.



इको व्हॅनच्या चालकाने वेळ वाचवण्यासाठी वेग पटकन वाढवला. पण वेग वाढवल्यामुळे व्हॅन अनियंत्रित झाली. अनियंत्रित व्हॅनने दुचाकीला धडक दिली. यानंतर व्हॅन जवळच असलेल्या विहिरीत जाऊन पडली. व्हॅनची धडक बसल्यामुळे दुचाकीस्वार गोबर सिंह आणि एका ग्रामस्थाचा मृत्यू झाला. व्हॅनमध्ये असलेल्यांपैकी तीन जणांचा मृत्यू झाला. व्हॅनसह विहिरीत पडलेल्यांना वाचवण्यासाठी एकाने प्रयत्न केला. पण दुर्दैवाने त्यावेळी विहिरीत कारमुळे मोठ्या प्रमाणात गॅसची निर्मिती झाली. या गॅसमुळे विहिरीत उतरलेल्या मनोहर सिंह याचा मृत्यू झाला. अपघातात चार जण जखमी झाले.

व्हॅनमध्ये चालक आणि दोन मुलांसह एकूण १३ जण होते. हे सर्वजण उज्जैन जिल्ह्यातील उन्हेल येथून नीमच जिल्ह्यातील मानसा भागात असलेल्या अंतरी माता मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जात होते. वेळ वाचवण्यासाठी चालकाने व्हॅनचा वेग वाढवला आणि अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या तीन वर्षांच्या मुलीसह चार जणांना वाचवण्यात आले. जखमींना मंदसौर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री जगदीश देवदा, जिल्हाधिकारी अदिती गर्ग, एसपी अभिषेक आनंद, अतिरिक्त एसपी गौतम सोलंकी आणि एसडीओपी नरेंद्र सोलंकी घटनास्थळी पोहोचले. बचावकार्य वेगाने सुरू आहे. अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी जिल्हा रुग्णालयातून ऑक्सिजन सिलिंडरही घटनास्थळी पाठविण्यात आले आहेत.
Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे