दुचाकीला धडकून विहिरीत पडली व्हॅन, सहा जणांचा मृत्यू

मंदसौर : भरधाव वेगाने जात असताना अनियंत्रित झालेली इको व्हॅन दुचाकीला धडकून विहिरीत पडली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. मृतांमध्ये विहिरीत पडलेल्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या एका नागरिकाचाही समावेश आहे. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशमधील मंदसौर जिल्ह्यातील नारायणगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुढा - टकरावत फाट्याजवळ घडली. अपघात आज म्हणजे रविवार २७ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता झाला.



इको व्हॅनच्या चालकाने वेळ वाचवण्यासाठी वेग पटकन वाढवला. पण वेग वाढवल्यामुळे व्हॅन अनियंत्रित झाली. अनियंत्रित व्हॅनने दुचाकीला धडक दिली. यानंतर व्हॅन जवळच असलेल्या विहिरीत जाऊन पडली. व्हॅनची धडक बसल्यामुळे दुचाकीस्वार गोबर सिंह आणि एका ग्रामस्थाचा मृत्यू झाला. व्हॅनमध्ये असलेल्यांपैकी तीन जणांचा मृत्यू झाला. व्हॅनसह विहिरीत पडलेल्यांना वाचवण्यासाठी एकाने प्रयत्न केला. पण दुर्दैवाने त्यावेळी विहिरीत कारमुळे मोठ्या प्रमाणात गॅसची निर्मिती झाली. या गॅसमुळे विहिरीत उतरलेल्या मनोहर सिंह याचा मृत्यू झाला. अपघातात चार जण जखमी झाले.

व्हॅनमध्ये चालक आणि दोन मुलांसह एकूण १३ जण होते. हे सर्वजण उज्जैन जिल्ह्यातील उन्हेल येथून नीमच जिल्ह्यातील मानसा भागात असलेल्या अंतरी माता मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जात होते. वेळ वाचवण्यासाठी चालकाने व्हॅनचा वेग वाढवला आणि अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या तीन वर्षांच्या मुलीसह चार जणांना वाचवण्यात आले. जखमींना मंदसौर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री जगदीश देवदा, जिल्हाधिकारी अदिती गर्ग, एसपी अभिषेक आनंद, अतिरिक्त एसपी गौतम सोलंकी आणि एसडीओपी नरेंद्र सोलंकी घटनास्थळी पोहोचले. बचावकार्य वेगाने सुरू आहे. अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी जिल्हा रुग्णालयातून ऑक्सिजन सिलिंडरही घटनास्थळी पाठविण्यात आले आहेत.
Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव