कोकण रेल्वेच्या विनातिकीट प्रवाशांकडून २३ कोटीचा दंड वसूल

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध कोकण रेल्वे प्रशासनाने मोठी मोहीम चालवली आहे. या मोहिमेअंतर्गत गेल्या या आर्थिक वर्षात ९ हजार ७३१ प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून २३ कोटी १० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.


विशेष म्हणजे, मागील वर्षाच्या तुलनेत ही दंडाची रक्कम १.७ कोटी रुपयांनी अधिक आहे. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकाला जोडणारा कोकण रेल्वे मार्ग हा एक महत्त्वाचा प्रवासी मार्ग आहे. या मार्गावरून दरवर्षी लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र, काही प्रवाशांकडून तिकीट न काढता फुकट प्रवास करण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत.

या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने कठोर भूमिका घेत विनातिकीट प्रवाशांविरुद्ध दंडात्मक कारवाई तीव्र केली आहे. रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई करूनही विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आता तिकीट न काढता प्रवास करणाऱ्यांना कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.


कोकण रेल्वे प्रशासन प्रवाशांना चांगली सेवा आणि सुरक्षित प्रवास देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. प्रवाशांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. असे असतानाही काही प्रवाशांकडून फुकट प्रवास करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर नियमितपणे तिकीट तपासणी मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहे, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Comments
Add Comment

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक