Akshaya Tritiya : १०० वर्षांनंतर अक्षय्य तृतीयेला तयार होणार दुर्मिळ राजयोग! 'या' राशींचे सुरू होतील चांगले दिवस

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा अक्षय्य तृतीया हिंदू धर्मात शुभ काळांपैकी एक मानला जातो. यंदा ३० एप्रिल २०२५ रोजी 'अक्षय्य तृतीया' (Akshaya Tritiya) साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी अनेकजण शुभकार्य करतात. तसेच या दिवशी सोनं-चांदी किंवा इतर गोष्टी खरेदी करतात. अशातच यंदाचा अक्षय्य तृतीयेचा दिवस ग्रहांच्या स्थितीनुसार लाभदायक ठरणार आहे. तब्बल १०० वर्षानंतर यंदा अक्षय्य तृतीयेला 'गजकेशरी' दुर्मिळ राजयोग (Akshaya Tritiya Gajkeshari Rajyog) तयार होणार आहे. यामुळे काही राशीतील लोकांना चांगलाच फायदा होणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी.



धनु रास


या राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस खूप खास असणार आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकते. यासोबतच, देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने, प्रत्येक क्षेत्रात अपार यश तसेच आर्थिक लाभ मिळू शकतो. शत्रूच्या बाजूने शांती असेल. याद्वारे तुम्ही तुमच्या स्पर्धकांवर नियंत्रण मिळवू शकता. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ असू शकतो. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला खूप फायदे मिळू शकतात. कुटुंबातही आनंद आणि शांती राहील.



सिंह राशी


या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू शकते. व्यवसायातही तुम्हाला नफा मिळू शकतो. तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. तुम्हाला मोठी ऑर्डर किंवा प्रकल्प मिळू शकेल. तुम्हाला भौतिक सुखे मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना खूप फायदे मिळू शकतात. तुमचा कल अध्यात्माकडे असेल. पदोन्नती मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. या काळात घर, वाहन इत्यादी खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.



वृषभ राशी


या राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस खूप चांगला असू शकतो. आदर आणि सन्मानात झपाट्याने वाढ होऊ शकते. यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामाचे कौतुक मिळेल. यासोबतच पगारवाढीसोबत पदोन्नती देखील मिळू शकते. अध्यात्माकडे कल असू शकतो, ज्यामुळे तुम्ही अनेक धार्मिक स्थळांना भेट देऊ शकता.



अक्षय्य तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त (Akshaya Tritiya Muhurt)


बुधवार, ३० एप्रिल रोजी पहाटे ५ वाजून ३१ मिनिटांपासून अक्षय्य तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त सुरू होईल आणि तो दुपारी १२ वाजून १८ मिनिटांपर्यंत असेल.



अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त


३० एप्रिल रोजी सकाळी ५ वाजून ४१ मिनिटांपासून ते दुपारी २ वाजून १२ मिनिटांपर्यंत असेल. तसेच तुम्ही जर सोने-चांदीची खरेदी करू शकत नसाल, तर अक्षय्य तृतीयेला तुम्ही माती, पितळेची भांडी किंवा पिवळी मोहरीदेखील खरेदी करू शकता.

Comments
Add Comment

Bigg Boss Marathi Season 6: पहिल्याच 'भाऊच्या धक्क्या"वर रितेश देशमुख घेणार तन्वी आणि रुचितासोबत इतर सदस्यांची शाळा!

"तन्वी तुम्ही आहात या घराच्या तंटा क्वीन!" - रितेश देशमुख "रुचिता जामदार महाराष्ट्राने पहिल्यांदाच स्वतःला पंजा

विप्रो कंपनीचा तिमाही निकाल कमकुवत? ७% नफ्यात घसरण तरीही 'इतका' लाभांश जाहीर

मोहित सोमण: प्रसिद्ध आयटी कंपनी विप्रो (Wipro Limited) कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीला तिसऱ्या तिमाहीत

जालना महापालिकेत भाजपचाच बोलबाला

जालना : जालना महानगरपालिकेवर स्वतःची सत्ता स्थापन करण्याचे भाजपचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. ६५ पैकी ४१ जागा जिंकून

राज्यातील २२ मनपात राज ठाकरेंच्या मनसेला भोपळा

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल लागले. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार,

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई (प्रतिनिधी) : ज्या काँग्रेसपायी उबाठा गटाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत

भाजपच्या विजयानंतर ‘रसमलाई’चा ट्रेंड

मुंबई : महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुक निकालात भाजपने सर्वाधिक जागा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.