महाराष्ट्रात ५०२३ पाकिस्तानी नागरिकांची नोंद

नागपुरात सर्वाधिक, तर मुंबईत केवळ १४


मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर केंद्र सरकारने कडक भूमिका घेतली असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. देशात कोणताही पाकिस्तानी नागरिक अवैधरीत्या राहणार नाही, याची खात्री करण्यास सांगण्यात आले आहे.



केंद्र सरकारने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, मुदत संपल्यानंतर कोणताही पाकिस्तानी नागरिक देशात राहू नये. त्यांच्या शोधासाठी विशेष मोहीम राबवण्यास सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राज्यात सध्या ५०२३ पाकिस्तानी नागरिक राहत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी फक्त ५१ जणांकडे वैध कागदपत्रे आढळली आहेत. विशेष म्हणजे १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असून, पोलीस किंवा इतर यंत्रणांना त्यांचा पत्ता लागलेला नाही. नागपूर शहरात सर्वाधिक २४५८ पाकिस्तानी नागरिक आढळले आहेत, तर ठाणे शहरात ११०६ आणि नवी मुंबईत २३९ पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची माहिती मिळाली आहे.


मुंबईत १४ पाकिस्तानी नागरिक असून, पिंपरी-चिंचवडमध्ये २९० जणांची नोंद आहे. सध्या राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणा या नागरिकांचा तपास घेत आहेत. जे बेपत्ता झाले आहेत, त्यांचा लवकरात लवकर शोध घेणे आणि अवैधरीत्या राहणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल निर्णायक ठरणार आहे, अशी चर्चा सध्या सर्वत्र रंगत आहे.

Comments
Add Comment

खोदलेले चर बुजवण्यात कंत्राटदारांची हातचलाखी

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक रस्ते आणि पदपथाखालून विविध सेवा सुविधांचे जाळे जात असून यामध्ये तांत्रिक

वांद्रे पश्चिममधील एस. व्ही. रोडवरील त्या तुंबणाऱ्या पावसाच्या पाण्यापासून मिळणार मुक्ती

मुंबई (सचिन धानजी) : वांद्रे पश्चिम येथील एस व्ही रोड आणि के.सी मार्गावर पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या वारंवारच्या

ब्रिटिशकालीन १२ वर्षांच्या पुलाचा शेवट; रेल्वे ट्रॅकवरील काम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई: मुंबईतील ११२ वर्षांचा जुना आणि महत्त्वाचा ब्रिटिशकालीन रस्ता पूल, एलफिन्स्टन पूल पाडण्याच्या कामाचा

मविआच्या दुटप्पी भूमिकेची पोलखोल करण्यासाठी भाजपचे आंदोलन

निवडणुकांच्या तोंडावर फेक नरेटिव्हचा 'मविआ' चा कट उधळून लावा – भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण मुंबई: आगामी

वेध निवडणुकीचा : कलिना आणि वांद्रे पूर्व भाजपसाठी अनुकूल; २० ते २२ नगरसेवक निवडून येतील

उत्तर मध्य भाजप जिल्हाध्यक्ष विरेंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केला विश्वास सचिन धानजी मुंबई : मुंबई उत्तर मध्य

मुंबईत राजकीय रणकंदन पेटले! विरोधकांच्या ‘सत्याचा मोर्चा’ला भाजपचे 'मूक आंदोलन' करत जशास तसे प्रत्युत्तर

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि मतदार यादीतील मोठ्या गोंधळावर आक्षेप घेत, आज (दि. १) मुंबईत महाविकास