महाराष्ट्रात ५०२३ पाकिस्तानी नागरिकांची नोंद

  49

नागपुरात सर्वाधिक, तर मुंबईत केवळ १४


मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर केंद्र सरकारने कडक भूमिका घेतली असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. देशात कोणताही पाकिस्तानी नागरिक अवैधरीत्या राहणार नाही, याची खात्री करण्यास सांगण्यात आले आहे.



केंद्र सरकारने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, मुदत संपल्यानंतर कोणताही पाकिस्तानी नागरिक देशात राहू नये. त्यांच्या शोधासाठी विशेष मोहीम राबवण्यास सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राज्यात सध्या ५०२३ पाकिस्तानी नागरिक राहत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी फक्त ५१ जणांकडे वैध कागदपत्रे आढळली आहेत. विशेष म्हणजे १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असून, पोलीस किंवा इतर यंत्रणांना त्यांचा पत्ता लागलेला नाही. नागपूर शहरात सर्वाधिक २४५८ पाकिस्तानी नागरिक आढळले आहेत, तर ठाणे शहरात ११०६ आणि नवी मुंबईत २३९ पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची माहिती मिळाली आहे.


मुंबईत १४ पाकिस्तानी नागरिक असून, पिंपरी-चिंचवडमध्ये २९० जणांची नोंद आहे. सध्या राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणा या नागरिकांचा तपास घेत आहेत. जे बेपत्ता झाले आहेत, त्यांचा लवकरात लवकर शोध घेणे आणि अवैधरीत्या राहणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल निर्णायक ठरणार आहे, अशी चर्चा सध्या सर्वत्र रंगत आहे.

Comments
Add Comment

उद्धव ठाकरे आणि आव्हाडांच्या भूमिकेवर भाजपचा सवाल

हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईत ५१ कबुतरखाने बंद... पक्ष्यांना खायला घालण्यास पूर्णपणे बंदी! आतापर्यंत १०० जणांहून अधिक लोकांना ठोठावला दंड

मुंबई: कबुतरांना खायला देण्यावरील बंदी लागू झाल्यापासून, बीएमसीने दादर कबुतरखान्यात १०० हून अधिक लोकांना दंड