उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर उधमपूरमध्ये सुरक्षा पथक आणि अतिरेकी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत दुडू बसंतगड परिसरात सहाव्या पॅरा एसएफचे हवालदार झंटू अली शेख गंभीर जखमी झाले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भारतीय सैन्याने त्यांच्या सर्वोच्च बलिदानाला सलामी दिली आहे. जीओसी आणि व्हाईट नाईट कॉर्प्सच्या सर्व रँकनी त्यांचे धाडस आणि शौर्य याचे सन्मानाने स्मरण केले आणि त्यांच्या स्मृतींन उजाळा दिला.
पहलगाम हल्ला प्रकरणातील एका अतिरेक्याचे घर स्फोटकांनी उडवले आणि दुसऱ्याचे घर बुलडोझरने पाडले
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी मंगळवार २२ एप्रिल २०२५ रोजी २६ पर्यटकांची हत्या केली. नाव आणि धर्म विचारुन हिंदू असलेल्या ...
पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर सुरक्षा पथकांनी अतिरेक्यांना शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे. संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांना शोधून ठार केले जात आहे. मागील दोन महिन्यात अतिरेक्यांविरुद्ध झालेल्या अकरा चकमकींमध्ये एकूण सहा जवान हुतात्मा झाले आहेत. सुरक्षा पथकांची अतिरेक्यांविरुद्धची मोहीम सुरू आहे आणि सुरू राहणार आहे.