Neeraj Chopra : पाकिस्तानी खेळाडूला दिलेल्या आमंत्रणावरून नीरज चोप्रा वादाच्या भोवऱ्यात

ट्विट करत दाखवलं भारतावरचं प्रेम


बंगळुरू  : भारतात बंगळुरू येथे २४ मे रोजी होणार असलेल्या एनसी क्लासिक (NC Classic) भालाफेक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दोन वेळच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या नीरज चोप्राने सोमवारी पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शद नदीम याला आमंत्रण दिले होते. पण मंगळवार २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे पर्यटकांवर अतिरेकी हल्ला झाला. नाव आणि धर्म विचारुन हिंदू असलेल्यांना ठार करण्यात आले. तब्बल २६ पर्यटकांची हत्या करण्यात आली. या घटनेने देशाला धक्का बसला. भारत सरकारने पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई सुरू केली. ही कारवाई सुरू झाली आणि नीरज चोप्राचे सोमवारी दिलेले आमंत्रण वादाच्या भोवऱ्यात सापडले.

पाकिस्तानच्या भालाफेकपटूला भारतातील स्पर्धेसाठी विशेष आमंत्रण दिल्याबद्दल भालाफेकपटू नीरज चोप्रावर टीका सुरू झाली. अखेर नीरजने ट्वीट करुन टीकाकारांची तोंड बंद केली.

मी मितभाषी आहे. पण चुकीचं बोलणाऱ्यांच्या विरुद्ध बोलतो. माझ्या देशप्रेम आणि निष्ठेविषयी कोणी शंका उपस्थित करत असेल अथवा प्रश्न विचारत असेल तर मला बोलावंच लागेल. नाहक माझ्याविषयी अथवा माझ्या कुटुंबातील सदस्यांविषयी बदनामी करणारी वक्तव्य होत असतील तर ती खोडून काढावीच लागतील.

ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानचा अर्शद नदीम आणि भारताकडून मी सहभागी झालो. आमच्या कामगिरीनंतर दोघांच्या आयांची एकमेकींशी भेट झाली, त्यावेळी अनेकांनी या क्षणांचे विशेष कौतुक केले. आज अर्शदला एका स्पर्धेसाठी भारतात आमंत्रित केले तर थेट माझ्या आणि माझ्या आईच्या देशप्रेमावरच शंका उपस्थित केली जात आहे. हे खूप जास्त होत आहे.

अर्शदला आमंत्रण दिले ते एक खेळाडू म्हणून. एका खेळाडूकडून दुसऱ्या खेळाडूला अशा स्वरुपाचे हे आमंत्रण होते. हे आमंत्रण सोमवारी २१ एप्रिल रोजी दिले होते. जेव्हा आमंत्रण दिले तेव्हा पहलगामची घटना घडली नव्हती. पण मंगळवारी पहलगाममध्ये जे घडले त्यानंतर अर्शद उपस्थित राहण्याचा प्रश्नच उरलेला नाही. देश, देशप्रेम, देशाविषयीची निष्ठा हे कधीही सर्वोच्चच असेल, असे भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा म्हणाला.



मला विश्वास आहे की आपल्या देशाचा प्रतिसाद एक राष्ट्र म्हणून आपली ताकद दाखवेल आणि न्याय मिळेल..." ज्या लोकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलंय त्यांच्या दुःखात सहभागी आहे. भारत चोख प्रत्युत्तर देईल आणि न्याय मिळेल, असे नीरजने ट्वीटमध्ये नमूद केले आहे.

त्याने पुढे लिहिलं, 'मी अभिमानाने भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. जेंव्हा माझ्या देशप्रेमावर शंका उपस्थित होते, तेव्हा ती वेदना एकदम खोलवर पोहोचते. कोणत्याही योग्य कारणाशिवाय काही लोक माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर टीका करत आहेत. आम्ही साधे आणि शांत लोक आहोत. माझ्याविषयी काही माध्यमांनी बनवलेल्या खोट्या बातम्या मी खोडून काढत नाही, याचा अर्थ त्या सत्य आहेत, असं नाही.
Comments
Add Comment

Melody Trend and Parle Shares : 'Melodi' ट्रेंडची कमाल; क्षणार्धात वाढले पार्लेचे शेअर्स; पण फायदा मात्र दुसऱ्याच कंपनीचा झाला; जाणून घ्या नेमकं काय घडलं

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इटलीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर नरेंद्र मोदी यांनी

DRDO : आता यूएवीमधून डागता येणार निर्देशित क्षेपणास्त्र; डीआरडीओच्या चाचण्या पूर्ण

- आंध्र प्रदेशातील कुरनूलजवळील डीआरडीओ चाचणी क्षेत्रात ही कामगिरी साध्य नवी दिल्ली : भारत आता मानवरहित हवाई

Shocking : खेळता-खेळता गाडीत अडकली, दोन तास ऑक्सिजनसाठी धडपडली अन् गुदमरून ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

मध्य प्रदेश : आपले घर आणि घराचे अंगण हे मुलांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण असते, असा प्रत्येक पालकाचा ठाम विश्वास

Iran America War : मोबाईलमधील इंटरनेट आणि UPI सेवा ठप्प होणार ? इराणच्या खळबळजनक वक्तव्याने उडाली तारांबळ!

आजच्या काळात श्वास घेण्याइतकेच इंटरनेट (Internet) गरजेचे झाले आहे. सकाळच्या अलार्मपासून ते रात्रीच्या सोशल मीडिया (Social

Stray Dogs : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय : शाळा आणि रुग्णालयांंजवळून भटके कुत्रे हटवण्याचे आदेश कायम

नवी दिल्ली : देशात भटक्या कुत्र्यांचा वाढता प्रादुर्भाव (Stray Dogs) आणि त्यांच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटना लक्षात

Uttarakhand Train Accident : ऋषिकेशमध्ये मोठा रेल्वे अपघात टळला! उज्जयनी एक्सप्रेसचे ३ डब्बे रुळावरून घसरले

ऋषिकेश : उत्तराखंडमधील ऋषिकेश (Uttarakhand Train Accident) येथे उज्जयनी एक्सप्रेसशी संबंधित धक्कादायक घटना समोर आली आहे. स्टेशन