Maharashtra Weather : सूर्य आग ओकणार! 'या' जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात तापमानात मोठी वाढ होईल असा इशारा आधीच देण्यात आला होता. हा अंदाज खरा ठरला असून या महिन्यात उष्णता प्रचंड वाढली आहे. राज्यात अनेक (Maharashtra Weather) ठिकाणी पारा ४५ अंशांपर्यंत पोहोचला आहे. काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून (IMD) उष्णतेचा यलो अलर्ट (Heat Alert) जारी करण्यात आला आहे.



विदर्भात सध्या उष्णता प्रचंड वाढली आहे. चंद्रपूर सर्वात उष्ण शहर ठरलं आहे. चंद्रपूरमध्ये तापमान ४५.८ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. अकोला, अमरावती, नागपूर आणि ब्रह्मपुरी या शहरांतही तापमानाने ४५ अंशांपर्यंत मजल गाठली आहे. या दिवसांत नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. पश्चिम विदर्भासह पूर्व भागातील शहरांत तापमानात वाढ होणार आहे. मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत पारा वाढणार आहे. या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोलापूरसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरीतील नागरिकांना सुद्धा उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.


हवामान विभागाच्या माहितीनुसार, २९ एप्रिलपर्यंत देशात अनेक भागांत उष्णता वाढणार आहे. पश्चिम मध्य प्रदेशात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती दिसून येईल. २६ एप्रिलपर्यंत उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच आज आणि उद्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णता वाढण्याची शक्यता आहे.



वाढत्या उष्णतेचा शेतीवर फटका


उष्णतेच्या वाढत्या प्रमाणामुळे शेतीच्या उत्पादनावरही परिणाम होत आहे. यंदा थंडी कमी पडल्याने गव्हाची वाढ नीट झाली नाही. त्यामुळे हलक्या प्रतीचा गहू मोठ्या प्रमाणात बाजारात येत आहे. यामुळे गव्हाला कीड लागू शकण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये गव्हाची आवक १५ मार्चपासूनच सुरू झाली असून, सध्या गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून गहू येत आहे.

Comments
Add Comment

Ishwarpur Name : मोठी बातमी, 'इस्लामपूर नव्हे, ईश्वरपूर! अखेर केंद्र सरकारचा नामकरणाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब, पत्र जारी

सांगली : सांगली जिल्ह्यातील (Sangli District) इस्लामपूर (Islampur) शहराच्या नामकरणाच्या प्रस्तावाला अखेर केंद्र सरकारची (Central Government)

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आता दहा पदरी! 'एमएसआरडीसी' लवकरच राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाचे आठऐवजी दहा पदरीकरण

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रदूषणात सरासरी ११.१ टक्के वाढ

ठाणे : नागरिकांनी याही वर्षी दिवाळी सण उत्साहाने साजरा केला असून याकाळात फटाके वाजण्याच्या प्रमाणातही वाढ

‘संरक्षण व एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची आता नवी ओळख’

नागपूर : सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस ही भारतातील अग्रगण्य उत्पादक कंपनी नागपूर येथे विस्तार करीत आहे. या

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! लाडक्या बहिणींची नाराजी दूर, ७० लाख महिलांच्या अपात्रतेची भीती टळली; e-KYCच्या ‘त्या’ निर्णयाला राज्य सरकारची स्थगिती

मुंबई : राज्यातील महिलांमध्ये लोकप्रिय ठरलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) पुन्हा एकदा

लाडक्या बहिणींच्या ‘ई-केवायसी’ला ब्रेक; ऑक्टोबरचा लाभ पुढील आठवड्यात

सोलापूर : विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीची राज्यात सत्ता आली. त्या लाडक्या बहिणींची नाराजी आता