Health: उन्हाळ्यात डोळ्यांचे विकार होण्याचा वाढतो धोका, डोळ्यांची घ्या अशी काळजी

  58

ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. तापमान ४० अंशांवर पोहोचलेले असताना, डोळ्यांचा त्रास वाढतो आहे. ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयातील नेत्र विभागात डोळ्यांच्या तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांबरोबर उन्हाच्या तीव्रतेमुळे डोळे कोरडे पडणे, खाज येणे, जळजळ, सूज येणे किंवा सतत पाणी असे रुग्ण उपचारासाठी येत आहेत.


ठाण्यामध्ये उन्हाळ्यात एरवी कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस असत. मात्र गेल्या काही वर्षात तापमानात वाढ झाली आहे. दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे नकोसे वाटत. अशातच उन्हात जास्त फिरल्पामुळे चक्कर येणे, पोटात मळमळ डी हायड्रेशन सारख्या बाबींबरोबर डोळ्यांचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डोळ्यांची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे.


"उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. दिवसातून किमान दोन वेळा थंड पाण्याने डोळे धुतले पाहिजे. डोळ्याचा त्रास अधिक जाणवत असेल तर कोणताही घरगुती उपाय न करता रुग्णालयात नेत्र चिकित्सकाना डोळे दाखवावेत. - डॉ. शुभांगी अंबाडेकर (नेत्र तज्ज्ञ सिव्हिल रुग्णालय) सिव्हिल रुग्णालयाच्या नेत्र विभागात उन्हामुळे डोळे सुजणे, लाल होणे, डोळ्यांतून पाणी येणे, सूज आलेल्या रुग्णांवर उपचार केले जात असल्याची माहिती नेत्र तब्ज डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी दिली.



उन्हाळ्यात होणारे सामान्य डोळ्यांचे त्रास


जळजळ व लालसरपणा, उष्णतेमुळे डोळे कोरडे व अस्वस्थ होतात. कंजंक्टिव्हायटिसः संसर्गजन्य आजार वाढत असून, डोळ्यांत सूज व पाणी येणे यासारखी लक्षण दिसत आहेत. प्रकाश संवेदनशीलता (फोटोफोबिया): उन्हामुळे प्रकाश सहन न होणे, डोळ्यातून पाणी येणे ही लक्षणं दिसतात. उन्हात फिरताना डोळ्यांच्या सुरक्षेसाठी चांगल्या सनग्लासेस वापरा डोळ्याना चोळू नकाः अस्वस्थता वाटल्यास स्वच्छ कपडनाने सौम्यपणे पुसा, टोपी किया छत्री वापरा, डिजिटल स्क्रीनपासून २० फूट लावून बघा, सतत मोबाईल बघू नका, पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर

आयोडीन युक्त मिठाचा वापर करा, आरोग्य विभागाचे आवाहन

मुंबई: जागतिक थायरॉईड दिवस दरवर्षी २५ मे रोजी साजरा केला जातो, ज्याचा उद्देश थायरॉईड रोगांबद्दल जागरूकता वाढवणे