Health: उन्हाळ्यात डोळ्यांचे विकार होण्याचा वाढतो धोका, डोळ्यांची घ्या अशी काळजी

  79

ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. तापमान ४० अंशांवर पोहोचलेले असताना, डोळ्यांचा त्रास वाढतो आहे. ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयातील नेत्र विभागात डोळ्यांच्या तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांबरोबर उन्हाच्या तीव्रतेमुळे डोळे कोरडे पडणे, खाज येणे, जळजळ, सूज येणे किंवा सतत पाणी असे रुग्ण उपचारासाठी येत आहेत.


ठाण्यामध्ये उन्हाळ्यात एरवी कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस असत. मात्र गेल्या काही वर्षात तापमानात वाढ झाली आहे. दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे नकोसे वाटत. अशातच उन्हात जास्त फिरल्पामुळे चक्कर येणे, पोटात मळमळ डी हायड्रेशन सारख्या बाबींबरोबर डोळ्यांचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डोळ्यांची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे.


"उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. दिवसातून किमान दोन वेळा थंड पाण्याने डोळे धुतले पाहिजे. डोळ्याचा त्रास अधिक जाणवत असेल तर कोणताही घरगुती उपाय न करता रुग्णालयात नेत्र चिकित्सकाना डोळे दाखवावेत. - डॉ. शुभांगी अंबाडेकर (नेत्र तज्ज्ञ सिव्हिल रुग्णालय) सिव्हिल रुग्णालयाच्या नेत्र विभागात उन्हामुळे डोळे सुजणे, लाल होणे, डोळ्यांतून पाणी येणे, सूज आलेल्या रुग्णांवर उपचार केले जात असल्याची माहिती नेत्र तब्ज डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी दिली.



उन्हाळ्यात होणारे सामान्य डोळ्यांचे त्रास


जळजळ व लालसरपणा, उष्णतेमुळे डोळे कोरडे व अस्वस्थ होतात. कंजंक्टिव्हायटिसः संसर्गजन्य आजार वाढत असून, डोळ्यांत सूज व पाणी येणे यासारखी लक्षण दिसत आहेत. प्रकाश संवेदनशीलता (फोटोफोबिया): उन्हामुळे प्रकाश सहन न होणे, डोळ्यातून पाणी येणे ही लक्षणं दिसतात. उन्हात फिरताना डोळ्यांच्या सुरक्षेसाठी चांगल्या सनग्लासेस वापरा डोळ्याना चोळू नकाः अस्वस्थता वाटल्यास स्वच्छ कपडनाने सौम्यपणे पुसा, टोपी किया छत्री वापरा, डिजिटल स्क्रीनपासून २० फूट लावून बघा, सतत मोबाईल बघू नका, पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे

Uric Acid: शरीराकडून मिळतात 'हे' धोकादायक संकेत, वेळीच लक्ष द्या अन्यथा वाढू शकतात गंभीर समस्या!

मुंबई : आजकाल उच्च युरिक अ‍ॅसिड (High Uric Acid) ही एक सामान्य समस्या बनली आहे, जी गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते.

Weight Loss: व्यायाम आणि डाएट न करताही वजन करा कमी, लक्षात ठेवा या ३ गोष्टी

मुंबई: आजच्या काळात वाढलेले वजन ही अनेकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या

धोक्याची घंटा! भारतात ५ वर्षांत हृदयरोगाचे प्रमाण ५० टक्क्यांनी का वाढले?

मागील ५ वर्षांत हृदयरोगाच्या औषधांची मागणी ५० टक्क्यांनी वाढली; तरुणही धोक्यात! मुंबई : गेल्या पाच वर्षांत