Health: उन्हाळ्यात डोळ्यांचे विकार होण्याचा वाढतो धोका, डोळ्यांची घ्या अशी काळजी

ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. तापमान ४० अंशांवर पोहोचलेले असताना, डोळ्यांचा त्रास वाढतो आहे. ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयातील नेत्र विभागात डोळ्यांच्या तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांबरोबर उन्हाच्या तीव्रतेमुळे डोळे कोरडे पडणे, खाज येणे, जळजळ, सूज येणे किंवा सतत पाणी असे रुग्ण उपचारासाठी येत आहेत.


ठाण्यामध्ये उन्हाळ्यात एरवी कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस असत. मात्र गेल्या काही वर्षात तापमानात वाढ झाली आहे. दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे नकोसे वाटत. अशातच उन्हात जास्त फिरल्पामुळे चक्कर येणे, पोटात मळमळ डी हायड्रेशन सारख्या बाबींबरोबर डोळ्यांचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डोळ्यांची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे.


"उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. दिवसातून किमान दोन वेळा थंड पाण्याने डोळे धुतले पाहिजे. डोळ्याचा त्रास अधिक जाणवत असेल तर कोणताही घरगुती उपाय न करता रुग्णालयात नेत्र चिकित्सकाना डोळे दाखवावेत. - डॉ. शुभांगी अंबाडेकर (नेत्र तज्ज्ञ सिव्हिल रुग्णालय) सिव्हिल रुग्णालयाच्या नेत्र विभागात उन्हामुळे डोळे सुजणे, लाल होणे, डोळ्यांतून पाणी येणे, सूज आलेल्या रुग्णांवर उपचार केले जात असल्याची माहिती नेत्र तब्ज डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी दिली.



उन्हाळ्यात होणारे सामान्य डोळ्यांचे त्रास


जळजळ व लालसरपणा, उष्णतेमुळे डोळे कोरडे व अस्वस्थ होतात. कंजंक्टिव्हायटिसः संसर्गजन्य आजार वाढत असून, डोळ्यांत सूज व पाणी येणे यासारखी लक्षण दिसत आहेत. प्रकाश संवेदनशीलता (फोटोफोबिया): उन्हामुळे प्रकाश सहन न होणे, डोळ्यातून पाणी येणे ही लक्षणं दिसतात. उन्हात फिरताना डोळ्यांच्या सुरक्षेसाठी चांगल्या सनग्लासेस वापरा डोळ्याना चोळू नकाः अस्वस्थता वाटल्यास स्वच्छ कपडनाने सौम्यपणे पुसा, टोपी किया छत्री वापरा, डिजिटल स्क्रीनपासून २० फूट लावून बघा, सतत मोबाईल बघू नका, पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे

तोंड येण्याची समस्या का होते? कारणे आणि घरगुती उपाय

मुंबई : तोंड येणे म्हणजे तोंडात किंवा जिभेवर येणारे छोटेसे पण वेदनादायक फोड. ही एक सामान्य समस्या असली, तरी

रोज फिश ऑइल सप्लिमेंट्स घेताय? आधी हे वाचा !

मुंबई : सध्या निरोगी जीवनशैलीकडे झुकणाऱ्या अनेक लोकांचा कल हेल्दी डाएट, योगा, व्यायाम, आणि विविध सप्लिमेंट्सकडे

हे ६ पदार्थ देतात दुधापेक्षा जास्त कॅल्शियम!

मुंबई : आपण बहुतांशवेळा कॅल्शियम म्हटले की दुधाचा विचार करतो. खरं तर, बऱ्याच लोकांना वाटतं की कॅल्शियम

वय वाढलं तरी त्वचा तरुण! 'या' ८ पदार्थांचे गुपित तुम्हाला माहितीयेत का?

मुंबई : त्वचेचं सौंदर्य फक्त बाहेरून लावल्या जाणाऱ्या क्रीम्स, फेस मास्क किंवा लोशन्सवर अवलंबून नसतं. यामागे खरा