"कटातील सर्वांना कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल" पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा इशारा

दहशतवाद्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली: पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्यामुळे देशात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याविरुद्ध सरकार आक्रमक झाले असून, हा रक्तरंजित कट रचणाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी, तपास यंत्रणानी युद्धपातळीवर काम करायला सुरुवात केली आहे. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पहलगाम हल्ल्याबद्दल मोठे भाष्य केले आहे.

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याविरुद्ध सरकारने कारवाईला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याचीही माहिती आहे. पहलगामच्या हल्ल्यात हिंदू पर्यटकांना टार्गेट बनवण्यात आले. या हल्ल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड असा संताप हा बघायला मिळतोय. या हल्ल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय वक्तव्य करतात यावर संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. त्यामुळे मोदी यांनी पहलगामवरील हल्ल्याची माहिती मिळताच विदेश दौरा अर्धवट सोडत, भारत गाठले आणि त्यांनी विमानतळावरच अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. ज्यात अनेक महत्वाच्या गोष्टींवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर आज बिहार येथील भाषणात पंतप्रधान मोदी यांनी थेट इशाराच दिलाय.


पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा इशारा


पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये बोलताना म्हणाले की, २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी ज्या क्रूरतेने निष्पाप लोकांना मारले त्यामुळे संपूर्ण देश दुःखी आहे. संपूर्ण राष्ट्र सर्व पीडित कुटुंबांच्या दुःखात त्यांच्यासोबत आहे. या हल्ल्यात कोणीतरी आपला मुलगा, भाऊ किंवा पती गमावला आहे. देशाच्या शत्रूंनी भारताच्या आत्म्यावर हल्ला करण्याचे धाडस केले आहे.

या भाषणात मोदी पुढे म्हणाले, "दहशतवाद भारताच्या आत्म्याला तोडू शकत नाही. दहशतवाद्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे. १४० कोटी भारतीयांची इच्छाशक्ती दहशतवाद्यांचे कंबरडे मोडेल." पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या कटातील सर्वांना कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल असा इशारा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भाषणाद्वारे दिला आहे.
Comments
Add Comment

भारताने अमेरिकेनंतर नामिबियालाही हरवले, आता प्रतिक्षा रविवारच्या लढतीची

नवी दिल्ली : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये भारताने अमेरिकेविरुद्धच्या सामना २९ धावांनी जिंकला. पाठोपाठ

PMO Office Shift: तब्बल ७८ वर्षांनंतर पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी दुपारी पंतप्रधान कार्यालयचा (पीएमओ)

Uttar Pradesh: तीन बहिणींच्या आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिसांनी केला वडिलांचा फोन जप्त

उत्तर प्रदेशा: गाझियाबादमधील एका घराच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या तीन बहिणींच्या

Bharat Bandh: केंद्रीय कामगार आणि शेतकरी संघटनांचा आज देशव्यापी बंद

मुंबई : विविध कामगार संघटनांनी आज, गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची हाक दिल्याने दैनंदिन व्यवहारांवर

Crime: प्रिन्सिपल सुनेसोबत सासऱ्याचे नको ते प्रकार, नात्याला काळिमा फासणारी घटना समोर

मुंबई: नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समाजात आदराचे स्थान असलेल्या एका प्रतिष्ठित

Vande Mataram : शाळांपासून संसदेपर्यंत आता संपूर्ण 'वंदे मातरम्' घुमणार! केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय, सर्व ६ कडवी आता अनिवार्य

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीची ठिणगी टाकणाऱ्या 'वंदे मातरम्' या गीताचा सन्मान वाढवण्यासाठी