"कटातील सर्वांना कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल" पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा इशारा

दहशतवाद्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली: पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्यामुळे देशात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याविरुद्ध सरकार आक्रमक झाले असून, हा रक्तरंजित कट रचणाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी, तपास यंत्रणानी युद्धपातळीवर काम करायला सुरुवात केली आहे. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पहलगाम हल्ल्याबद्दल मोठे भाष्य केले आहे.

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याविरुद्ध सरकारने कारवाईला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याचीही माहिती आहे. पहलगामच्या हल्ल्यात हिंदू पर्यटकांना टार्गेट बनवण्यात आले. या हल्ल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड असा संताप हा बघायला मिळतोय. या हल्ल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय वक्तव्य करतात यावर संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. त्यामुळे मोदी यांनी पहलगामवरील हल्ल्याची माहिती मिळताच विदेश दौरा अर्धवट सोडत, भारत गाठले आणि त्यांनी विमानतळावरच अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. ज्यात अनेक महत्वाच्या गोष्टींवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर आज बिहार येथील भाषणात पंतप्रधान मोदी यांनी थेट इशाराच दिलाय.


पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा इशारा


पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये बोलताना म्हणाले की, २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी ज्या क्रूरतेने निष्पाप लोकांना मारले त्यामुळे संपूर्ण देश दुःखी आहे. संपूर्ण राष्ट्र सर्व पीडित कुटुंबांच्या दुःखात त्यांच्यासोबत आहे. या हल्ल्यात कोणीतरी आपला मुलगा, भाऊ किंवा पती गमावला आहे. देशाच्या शत्रूंनी भारताच्या आत्म्यावर हल्ला करण्याचे धाडस केले आहे.

या भाषणात मोदी पुढे म्हणाले, "दहशतवाद भारताच्या आत्म्याला तोडू शकत नाही. दहशतवाद्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे. १४० कोटी भारतीयांची इच्छाशक्ती दहशतवाद्यांचे कंबरडे मोडेल." पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या कटातील सर्वांना कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल असा इशारा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भाषणाद्वारे दिला आहे.
Comments
Add Comment

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी

PM Narendra Modi : जगात मोदींचीच हवा! पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत.

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे