“कटातील सर्वांना कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा इशारा

Share

दहशतवाद्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्यामुळे देशात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याविरुद्ध सरकार आक्रमक झाले असून, हा रक्तरंजित कट रचणाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी, तपास यंत्रणानी युद्धपातळीवर काम करायला सुरुवात केली आहे. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पहलगाम हल्ल्याबद्दल मोठे भाष्य केले आहे.

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याविरुद्ध सरकारने कारवाईला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याचीही माहिती आहे. पहलगामच्या हल्ल्यात हिंदू पर्यटकांना टार्गेट बनवण्यात आले. या हल्ल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड असा संताप हा बघायला मिळतोय. या हल्ल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय वक्तव्य करतात यावर संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. त्यामुळे मोदी यांनी पहलगामवरील हल्ल्याची माहिती मिळताच विदेश दौरा अर्धवट सोडत, भारत गाठले आणि त्यांनी विमानतळावरच अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. ज्यात अनेक महत्वाच्या गोष्टींवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर आज बिहार येथील भाषणात पंतप्रधान मोदी यांनी थेट इशाराच दिलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये बोलताना म्हणाले की, २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी ज्या क्रूरतेने निष्पाप लोकांना मारले त्यामुळे संपूर्ण देश दुःखी आहे. संपूर्ण राष्ट्र सर्व पीडित कुटुंबांच्या दुःखात त्यांच्यासोबत आहे. या हल्ल्यात कोणीतरी आपला मुलगा, भाऊ किंवा पती गमावला आहे. देशाच्या शत्रूंनी भारताच्या आत्म्यावर हल्ला करण्याचे धाडस केले आहे.

या भाषणात मोदी पुढे म्हणाले, “दहशतवाद भारताच्या आत्म्याला तोडू शकत नाही. दहशतवाद्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे. १४० कोटी भारतीयांची इच्छाशक्ती दहशतवाद्यांचे कंबरडे मोडेल.” पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या कटातील सर्वांना कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल असा इशारा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भाषणाद्वारे दिला आहे.

Recent Posts

Fawad Khan : पहलगाम हल्ल्यानंतर सरकारचा अ‍ॅक्शन मोड! फवाद खानच्या ‘अबीर गुलाल’ चित्रपटावर घातली बंदी

मुंबई : पहलगाम हल्ल्यामुळे (Pahalgam Terror Attack) संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली असून संतापाची लाट…

24 minutes ago

Pahalgam Terror Attack: खारट फ्राईड राईसने वाचवला ११ जणांचा जीव

जम्मू काश्मीरला फिरायला गेलेल्या एका कुटुंबासाठी खारट फ्राइड राईस जीवदान ठरले मुंबई: पहलगामच्या बैसारण येथे…

53 minutes ago

Indus Waters Treaty : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने स्थगिती दिलेला सिंधू पाणी करार काय आहे?

सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन समजले जाते. अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सिंधू नदी पाकिस्तानातील अनेक राज्यांमधून…

1 hour ago

Summer Tree : उन्हाळ्यात घरातील बाग किंवा कुंड्यांना असं ठेवा ताजंतवानं!

उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी आपल्या घरातली बाग किंवा कुंड्यांमधली झाडं मदत करतात. पण या उन्हाच्या झळा…

1 hour ago

भारताचा डिप्लोमॅटिक स्ट्राईक, पाकिस्तानच्या चिंतेत वाढ

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी गोळीबार करुन २६ पर्यटकांना ठार…

2 hours ago

हीच योग्य वेळ, आता भारताने पाकिस्तानच्या नरडीचा घोट घेतला पाहिजे; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याचे ठाम मत

नवी दिल्ली/वॉशिंग्टन : पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही संताप उसळला आहे.…

2 hours ago