गौतम गंभीरला ISIS Kashmir ने दिली ठार मारण्याची धमकी

नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस काश्मीर या अतिरेकी संघटनेने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. गंभीरला ISIS Kashmir या नावाच्या ई मेल अॅड्रेसवरुन एक धमकीचा मेल आला आहे. या प्रकरणी गौतम गंभीरने दिल्लीतील राजेंद्रनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.







माजी खासदार आणि आता भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक असलेल्या गौतम गंभीरला याआधीही जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. पण यावेळी पहिल्यांदाच त्याला अतिरेकी संघटनेकडून धमकी मिळाली आहे. यामुळे गौतम गंभीर गंभीर दखल घेऊन तातडीने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी धमकीचा मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.



गौतम गंभीरसाठी काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला २२ एप्रिल रोजी दोन ई मेल आले. दोन्ही ई मेलमधून गौतम गंभीरला धमकी देण्यात आली होती. हे दोन्ही मेल ISIS Kashmir या अकाउंटवरुन आले होते. यानंतर गौतम गंभीरने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. जम्मू काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी अतिरेकी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. लष्कर - ए - तोयबा या अतिरेकी संघटनेची संबंधित असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. दुसरीकडे गौतम गंभीरला धमकी आली. या दोन घटनांचा काही संबंध आहे की वातावरणाचा गैरफायदा घेऊन गंभीरला धमकावण्यात आले आहे ? या दोन्ही शक्यतांचा पोलीस तपास करत आहेत.

 
Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला