Health Tips: उन्हाळ्यात कशी घ्यावी त्वचेची काळजी ? जाणून घ्या

  58

मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. उन्हाळ्यात केवळ आरोग्याचीच नाही तर त्वचेचीही काळजी घेणे गरजेचे असते. धूळ आणि सूर्यप्रकाशामुळे चेहऱ्यावर कोरडेपणा आणि पुरळ येऊ शकतात. त्वचेची काळजी घेण्यामध्ये अनेक टप्पे असतात, जसे की त्वचा स्वच्छ करणे, टोनर लावणे आणि मॉइश्चराइझ करणे. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार उत्पादने खरेदी करणे महत्वाचे आहे

कोरडी त्वचा : उन्हाळ्यात कोरडी त्वचा असलेल्या लोकांनी हलकी, मॉइश्चरायझिंग आणि हायड्रेटिंग उत्पादने निवडावीत. सनस्क्रीनसाठी, ५० पेक्षा जास्त एसपीएफ असलेले सनस्क्रीन निवडा. कोरडी त्वचा असलेल्या लोकांनी असे क्लींझर निवडावे जे त्वचेच्या ओलाव्याला हानी पोहोचवणार नाही.



 

संवेदनशील त्वचा : उन्हाळ्यात संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांनी हलके, सुगंध नसलेले आणि कमी संरक्षक असलेले उत्पादने निवडावीत. शक्य होईल तेवढे नैसर्गिक घटक असलेले उत्पादने निवडा. नैसर्गिक टोनर वापरा, ज्यासाठी तुम्ही गुलाब पाणी वापरू शकता.

सामान्य त्वचा : जर तुमची त्वचा सामान्य असेल तर तुम्ही तेलमुक्त आणि पाण्यावर आधारित उत्पादने निवडावीत. तुम्ही स्पेक्ट्रम सनस्किन हा ब्रँड निवडावा. जे UVA आणि UVB दोन्ही किरणांपासून संरक्षण करू शकते. हलके, पाणी-आधारित आणि तेल-मुक्त मॉइश्चरायझर्स वापरा. ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि त्वचा चिकट होत नाही.
Comments
Add Comment

Health: दररोज प्या 'या' ड्रायफ्रुट्सचे पाणी, आरोग्य राहील निरोगी आणि त्वचा होईल चमकदार

मुंबई : सुका मेवा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. त्यातीलच एक महत्त्वाचा सुका मेवा म्हणजे काळ्या मनुका.

बारीक लोकांनी बॉडीबिल्डिंग करताना चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ, नाहीतर...

मुंबई : आजकाल अनेक तरुणांना सुडौल आणि मजबूत शरीर (muscle building) बनवण्याची आवड आहे. यासाठी ते जिममध्ये

कच्चे, उकडलेले की ऑम्लेट? अंडे कसे खाणे ठरते फायदेशीर...घ्या जाणून

मुंबई: अंडी हा प्रोटीनचा एक उत्तम स्रोत आहे. अनेक लोक त्यांच्या आहारात नियमितपणे अंड्यांचा समावेश करतात. परंतु,

पोट साफ होत नसेल तर सकाळी करा हा उपाय...

मुंबई: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या बनली आहे. चुकीचा आहार, अपुरी झोप आणि बैठी

उपाशी पोटी खा ही ५ फळे, मिळतील अनेक फायदे

मुंबई : सकाळी उपाशी पोटी फळे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, पचनक्रिया सुधारते

महिलांच्या आरोग्यासाठी 'हे' ५ आयुर्वेदिक सुपरफूड्स आहेत गुणकारी, रोजच्या आहारात करा समावेश

मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना अनेक कामांची तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे त्यांच्या आरोग्याकडे