Diabetes Care : उन्हाळ्यात मधुमेहींनी आहाराची अशी काळजी घ्या....

  58

उन्हाळा आला की आपल्याला आहारात बदल करावा लागतो. त्यात मधुमेहींना आणखी बंधनं असतात. कारण, रक्तातली पाण्याची पातळी आणि साखरेची पातळी यांचं संतुलन ठेवणं गरजेचं असतं. त्यामुळे मधुमेहींनी आहारात कोणते बदल करावेत या लेखातून जाणून घेऊया.


?si=c7rHjFHzE0wBqdAr

उन्हाळ्यात शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे मधुमेहींनी योग्य प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. शरीरात साखरेचं प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी संत्री, खरबूज, कलिंगड अशा फळांचं सेवन करता येईल. पण, आंबा, द्राक्षं, केळी ही फळं शक्यतो टाळा. जेवणात चपातीऐवजी भाकरी खायला प्राधान्य द्या. या मोसमात मिळणाऱ्या पालेभाज्या, फळभाज्या यांचा आहारात समावेश करा. शरीरात उष्णता जाणवत असेल तर भिजवलेल्या सब्जाच्या बिया पाण्यासोबत घ्या. नेहमीच्या पाण्याच्या बाटलीत पुदिना, लिंबू, गवती चहा असे पदार्थ टाकून ते पाणी प्या. त्यामुळे शरीर डीटॉक्स होतं.



शरीरात तंतुमय घटकांचं प्रमाणही पुरेसं असु द्या. ज्यांना ड्रायफ्रुट्स आवडतात, त्यांनी ती भिजवून खायला हरकत नाही, मात्र, त्याचं प्रमाण निश्चित करा. आहारात दही, ताक यांचा समावेश करा. दर तीन ते सहा महिन्यांनी रक्तातल्या साखरेची पातळी अवश्य तपासा.

Comments
Add Comment

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर