उन्हाळा आला की आपल्याला आहारात बदल करावा लागतो. त्यात मधुमेहींना आणखी बंधनं असतात. कारण, रक्तातली पाण्याची पातळी आणि साखरेची पातळी यांचं संतुलन ठेवणं गरजेचं असतं. त्यामुळे मधुमेहींनी आहारात कोणते बदल करावेत या लेखातून जाणून घेऊया.
उन्हाळ्यात शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे मधुमेहींनी योग्य प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. शरीरात साखरेचं प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी संत्री, खरबूज, कलिंगड अशा फळांचं सेवन करता येईल. पण, आंबा, द्राक्षं, केळी ही फळं शक्यतो टाळा. जेवणात चपातीऐवजी भाकरी खायला प्राधान्य द्या. या मोसमात मिळणाऱ्या पालेभाज्या, फळभाज्या यांचा आहारात समावेश करा. शरीरात उष्णता जाणवत असेल तर भिजवलेल्या सब्जाच्या बिया पाण्यासोबत घ्या. नेहमीच्या पाण्याच्या बाटलीत पुदिना, लिंबू, गवती चहा असे पदार्थ टाकून ते पाणी प्या. त्यामुळे शरीर डीटॉक्स होतं.
शरीरात तंतुमय घटकांचं प्रमाणही पुरेसं असु द्या. ज्यांना ड्रायफ्रुट्स आवडतात, त्यांनी ती भिजवून खायला हरकत नाही, मात्र, त्याचं प्रमाण निश्चित करा. आहारात दही, ताक यांचा समावेश करा. दर तीन ते सहा महिन्यांनी रक्तातल्या साखरेची पातळी अवश्य तपासा.
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना राजस्थान रॉयल्सशी होत आहे.…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, मोदी सरकारने पाकिस्तान संबंधित राजकीय, आर्थिक आणि राजनैतिक आघाड्यांवर काही…
१८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली २३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष…
पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतात सुरू असलेल्या राजकीय…