Diabetes Care : उन्हाळ्यात मधुमेहींनी आहाराची अशी काळजी घ्या....

उन्हाळा आला की आपल्याला आहारात बदल करावा लागतो. त्यात मधुमेहींना आणखी बंधनं असतात. कारण, रक्तातली पाण्याची पातळी आणि साखरेची पातळी यांचं संतुलन ठेवणं गरजेचं असतं. त्यामुळे मधुमेहींनी आहारात कोणते बदल करावेत या लेखातून जाणून घेऊया.


?si=c7rHjFHzE0wBqdAr

उन्हाळ्यात शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे मधुमेहींनी योग्य प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. शरीरात साखरेचं प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी संत्री, खरबूज, कलिंगड अशा फळांचं सेवन करता येईल. पण, आंबा, द्राक्षं, केळी ही फळं शक्यतो टाळा. जेवणात चपातीऐवजी भाकरी खायला प्राधान्य द्या. या मोसमात मिळणाऱ्या पालेभाज्या, फळभाज्या यांचा आहारात समावेश करा. शरीरात उष्णता जाणवत असेल तर भिजवलेल्या सब्जाच्या बिया पाण्यासोबत घ्या. नेहमीच्या पाण्याच्या बाटलीत पुदिना, लिंबू, गवती चहा असे पदार्थ टाकून ते पाणी प्या. त्यामुळे शरीर डीटॉक्स होतं.



शरीरात तंतुमय घटकांचं प्रमाणही पुरेसं असु द्या. ज्यांना ड्रायफ्रुट्स आवडतात, त्यांनी ती भिजवून खायला हरकत नाही, मात्र, त्याचं प्रमाण निश्चित करा. आहारात दही, ताक यांचा समावेश करा. दर तीन ते सहा महिन्यांनी रक्तातल्या साखरेची पातळी अवश्य तपासा.

Comments
Add Comment

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात