१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू...हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल हे कोचीमध्ये तैनात होते. त्यांचे १६ एप्रिलला लग्न झाले होते. ते हनीमूनसाठी काश्मीरमध्ये आले होते. मात्र दुर्देवाने त्यांना या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले.


लेफ्टनंट विनय नरवाल हरियाणातील मूळ निवासी आहेत. त्यांची पत्नी सुरक्षित आहे. हे दाम्पत्य सोमवारी श्रीनगर येथे पोहोचले होते. आधी पहलगाम फिरण्यासाठी गेले होते. घटनेनंतर पत्नीचा आपल्या पतीसोबतच्या मृतदेहासोबतचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



हरयाणाचे मूळ निवासी


विनय नरवाल हे कर्नालच्या सेक्टर ७ येथे राहणारे होते. दोन वर्षांपूर्वीच ते नौदलात दाखल झाले होते. विनय सोमवारी श्रीनगर येथे फिरण्यासाठी गेले होते. त्यांचे कुटुंबीय कर्नालच्या सेक्टर ७मध्ये राहतात. घटनेची सूचना मिळताच कुटुंबातील काही सदस्य श्रीनगरसाठी रवाना झाले.



आम्ही फक्त भेलपुरी खात होतो आणि...


या घटनेनंतर पत्नीने थरथरत्या आवाजात सांगितले, आम्ही फक्त भेलपुरी खात होतो आणि त्यांनी माझ्या पतीवर गोळी झाडली. महिलेने सांगितले, की बंदुकधाऱ्यांनी सांगितले की माझे पती मुसलमान नाहीत आणि त्यांना गोळी मारली.

Comments
Add Comment

भारतासाठी आनंदाची बातमी ! चीन, पाकिस्तानची झोपच उडणार ; भारत आणि रशियामध्ये मोठा करार

Big deal between India and Russia : भारत आणि रशिया या दोन देशांतील मैत्रीपूर्ण संबंध संपूर्ण जगाला माहित आहे. जगाचा विरोध धुडकावत कधी

Heat Wave: पुढील तीन दिवस जरा जपूनच ! राज्यातील 'हे' शहर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत; नाशिकची स्थिती काय ?

Maharashtra Weather Update : राज्यभरात तपमानानं कहर केल्याचे चित्र आहे. अशातच प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या

West Bengal Election 2026 : विक्रमी मतदानामुळे ममता बॅनर्जींचे सरकार संपुष्टात येईल - अमित शाह

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्ह्यातील राणाघाट येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Karnataka : पादचारी पूल कोसळला, आठ जखमी

मंगळुरू : कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री तालुक्यात एक अरुंद पादचारी पूल कोसळला. या

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये ठिकठिकाणी ईडीच्या धाडी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वीच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राजधानी कोलकात्यात

Indian History : सापडले दोन हजार वर्षे जुने तीन किलो वजनाचे प्राचीन ताम्रपत्र

बिलासपूर : छत्तीसगडच्या बिलासपूर येथील मल्हार परिसरातील रहिवासी संजीव पांडेय यांच्या ताब्यातून सुमारे २०००