Sachin Tendulkar: "हल्ल्याच्या बातमीने धक्काच बसला..." पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सचिन तेंडुलकरची भावनिक पोस्ट

मुंबई: मंगळवारी दि २२ एप्रिल रोजी जम्मू - काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील पर्यटकांच्या एका गटावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेचा सर्वच स्तरांमधून निषेध व्यक्त केला जात असून, संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) ही या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे.


पहलगाम येथील पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांनीही सोशल मीडियाद्वारे आपला संताप व्यक्त केला आहे. महान माजी खेळाडू सचिन तेंडुलकरने या घटनेसंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट शेअर केली आहे.





त्याने लिहिले, 'पहलगाममध्ये निष्पाप लोकांवर झालेल्या हल्ल्याच्या बातमीने धक्काच बसला आणि खूप वाईट वाटले. या हल्ल्यातील पीडित लोकं आणि त्यांचे कुटुंब कल्पना पलीकडच्या वेदनांमधून जात असतील. त्यांच्या या दुःखात आपला देश आणि संपूर्ण जग त्यांच्यासोबत उभे आहे. या हल्ल्यात झालेल्या जीवितहानी आणि मालमत्तेच्या नुकसानाबद्दल मी शोक व्यक्त करतो, आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी प्रार्थना करतो."


जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीनेदेखील तीव्र शोक व्यक्त केला आहे.


 

पीव्ही सिंधू आणि नीरज चोप्राने व्यक्त केला शोक


ऑलिंपिक खेळाडू पीव्ही सिंधू आणि नीरज चोप्रा यांनीही हल्ल्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि पीडितांना भावनिक दुःख आणि पाठिंबा व्यक्त केला. "जम्मू आणि काश्मीरमधील दुःखद हल्ल्याने मन दुखावले आहे. पीडितांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना", असे नीरज चोप्रा यांनी एक्स वर लिहिले. तर पीव्ही सिंधूने पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, "पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांसाठी मी दुःख व्यक्त करते. कोणी कधीही अशा क्रूरतेचे समर्थन करू शकत नाही. मृत व्यक्तींच्या कुटुंबांचे दुःख कल्पनेच्या पलीकडे आहे, परंतु या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही एकटे नाही आहात. आम्ही तुमच्यासोबत आहोत."
Comments
Add Comment

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात

'Nanda Devi' Ship : तब्बल ४६,५०० मेट्रिक टनहुन अधिक एलपीजी घेऊन ‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल

‘शिवालिक’नंतर आणखी एक एलपीजी टँकर भारतात दाखल झाला आहे. ‘नंदा देवी’ हे जहाज आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी

एनआयएची मोठी कारवाई, युक्रेनच्या सहा आणि अमेरिकेच्या एका नागरिकाला अटक

नवी दिल्ली : कोलकाता विमानतळ येथे अमेरिकन नागरिकाला तर लखनऊ विमानतळ आणि दिल्ली विमानतळ येथे प्रत्येकी तीन