Sachin Tendulkar: "हल्ल्याच्या बातमीने धक्काच बसला..." पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सचिन तेंडुलकरची भावनिक पोस्ट

मुंबई: मंगळवारी दि २२ एप्रिल रोजी जम्मू - काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील पर्यटकांच्या एका गटावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेचा सर्वच स्तरांमधून निषेध व्यक्त केला जात असून, संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) ही या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे.


पहलगाम येथील पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांनीही सोशल मीडियाद्वारे आपला संताप व्यक्त केला आहे. महान माजी खेळाडू सचिन तेंडुलकरने या घटनेसंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट शेअर केली आहे.





त्याने लिहिले, 'पहलगाममध्ये निष्पाप लोकांवर झालेल्या हल्ल्याच्या बातमीने धक्काच बसला आणि खूप वाईट वाटले. या हल्ल्यातील पीडित लोकं आणि त्यांचे कुटुंब कल्पना पलीकडच्या वेदनांमधून जात असतील. त्यांच्या या दुःखात आपला देश आणि संपूर्ण जग त्यांच्यासोबत उभे आहे. या हल्ल्यात झालेल्या जीवितहानी आणि मालमत्तेच्या नुकसानाबद्दल मी शोक व्यक्त करतो, आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी प्रार्थना करतो."


जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीनेदेखील तीव्र शोक व्यक्त केला आहे.


 

पीव्ही सिंधू आणि नीरज चोप्राने व्यक्त केला शोक


ऑलिंपिक खेळाडू पीव्ही सिंधू आणि नीरज चोप्रा यांनीही हल्ल्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि पीडितांना भावनिक दुःख आणि पाठिंबा व्यक्त केला. "जम्मू आणि काश्मीरमधील दुःखद हल्ल्याने मन दुखावले आहे. पीडितांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना", असे नीरज चोप्रा यांनी एक्स वर लिहिले. तर पीव्ही सिंधूने पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, "पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांसाठी मी दुःख व्यक्त करते. कोणी कधीही अशा क्रूरतेचे समर्थन करू शकत नाही. मृत व्यक्तींच्या कुटुंबांचे दुःख कल्पनेच्या पलीकडे आहे, परंतु या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही एकटे नाही आहात. आम्ही तुमच्यासोबत आहोत."
Comments
Add Comment

बिहारमध्य राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या