Pahalgam Terror Attack : चौघांची ओळख पटली; दोन पाकिस्तानी, दोन स्थानिक

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण देश हादरला. या भीषण घटनेत २६ निरपराध पर्यटकांचा मृत्यू झाला असून, काहीजण गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे, या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावं आणि धर्म विचारून निवडक हत्या केल्याचे उघड झाल्याने संतापाचा अजूनच उद्रेक झाला आहे.


या हल्ल्यानंतर तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशीत चार दहशतवाद्यांची ओळख पटली असून, त्यापैकी दोन पाकिस्तानी आणि दोन स्थानिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. हल्लेखोरांचा एक फोटो देखील समोर आला आहे. बैसरन परिसरात हा हल्ला करण्यात आला होता. विशेष म्हणजे, चार जणांनी थेट हल्ला केला, तर आणखी तीन जण दूरवरून कारवाईवर लक्ष ठेवून होते, अशी माहितीही समोर आली आहे.



हल्लेखोरांनी पश्तून भाषेत संवाद साधत, जवळपास १५ ते २० मिनिटे एके-४७ रायफलमधून गोळीबार केला. त्यांनी पर्यटकांना लक्ष्य करत ठरवून ठार मारल्याचे तपास यंत्रणांना आढळून आले आहे.


स्थानिक दहशतवाद्यांपैकी आदिल गुरी आणि आसिफ शेख यांची नावे निष्पन्न झाली आहेत. तर उर्वरित दोन दहशतवादी पाकिस्तानातून आलेले असल्याचे तपासात स्पष्ट झाले. या अमानवी हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित 'द रेसिस्टन्स फ्रंट' या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.



देशभरातून या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त होत असून, संबंधित दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत.

Comments
Add Comment

नोबेल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प यांची वर्णी लागणार का ? आज होणार घोषणा

नॉर्वे : नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे आज नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे. यावर्षी नोबेल शांतता

भारतातील कोणत्या राज्यात आणि जिल्ह्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके कुठे आहेत? जाणून घ्या इंटरेस्टिंग माहिती.

भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? आणि कोणत्या जिल्ह्यात ४०

ब्रिटनची ९ मोठी विद्यापीठे भारतात कॅम्पस सुरू करणार; पंतप्रधान मोदी आणि कीर स्टार्मर यांची मोठी घोषणा

मुंबई: भारत-ब्रिटन संबंधांमध्ये शिक्षण आणि युवाशक्तीला बळ देणारा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. ब्रिटनचे

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार

दहशतवाद्यांनी बर्फवृष्टीचा फायदा घेऊन घुसखोरी करू नये , सुरक्षा दलांनी सज्ज रहावे - अमित शाह

नवी दिल्ली : “केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधातील “शून्य सहनशीलता” धोरण पुढेही कायम राहणार आहे”, असे केंद्रीय

मोठा अपघात टळला; फर्रुखाबादमध्ये खाजगी विमानाचा अपघात

फर्रुखाबा : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथील विमान तळावर आज सकाळी एका खासगी विमानाचा