Pahalgam Terror Attack : चौघांची ओळख पटली; दोन पाकिस्तानी, दोन स्थानिक

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण देश हादरला. या भीषण घटनेत २६ निरपराध पर्यटकांचा मृत्यू झाला असून, काहीजण गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे, या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावं आणि धर्म विचारून निवडक हत्या केल्याचे उघड झाल्याने संतापाचा अजूनच उद्रेक झाला आहे.


या हल्ल्यानंतर तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशीत चार दहशतवाद्यांची ओळख पटली असून, त्यापैकी दोन पाकिस्तानी आणि दोन स्थानिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. हल्लेखोरांचा एक फोटो देखील समोर आला आहे. बैसरन परिसरात हा हल्ला करण्यात आला होता. विशेष म्हणजे, चार जणांनी थेट हल्ला केला, तर आणखी तीन जण दूरवरून कारवाईवर लक्ष ठेवून होते, अशी माहितीही समोर आली आहे.



हल्लेखोरांनी पश्तून भाषेत संवाद साधत, जवळपास १५ ते २० मिनिटे एके-४७ रायफलमधून गोळीबार केला. त्यांनी पर्यटकांना लक्ष्य करत ठरवून ठार मारल्याचे तपास यंत्रणांना आढळून आले आहे.


स्थानिक दहशतवाद्यांपैकी आदिल गुरी आणि आसिफ शेख यांची नावे निष्पन्न झाली आहेत. तर उर्वरित दोन दहशतवादी पाकिस्तानातून आलेले असल्याचे तपासात स्पष्ट झाले. या अमानवी हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित 'द रेसिस्टन्स फ्रंट' या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.



देशभरातून या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त होत असून, संबंधित दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने