IPL 2025 on Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ MI विरुद्ध SRH सामन्यात मोठे बदल, मृतांना दिली जाणार श्रद्धांजली

  70

चीयरलीडर्स आणि फटाक्याच्या आतषबाजीविना रंगणार सामना, काळी फित बांधून उतरणार खेळाडू 


हैदराबाद: पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्याचा देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आयपीएलमध्ये आजच्या MI विरुद्ध SRH सामन्यात मृतांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. ज्यासाठी बीसीसीआयद्वारे काही मोठे बदल करण्यात आले आहे.


आज, बुधवारी (२३ एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग ( IPL 2025 ) चा ४१ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाईल.


जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्ध, या सामन्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) चार मोठे बदल केले आहेत. ज्यामध्ये सर्वप्रथम, हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहण्यासाठी सामन्यादरम्यान पंच आणि खेळाडू दंडाला काळ्या फिती बांधून मैदानात उतरतील. त्याचप्रमाणे आजचा सामना चिअरलीडर्स आणि फटाक्यांच्या आतषबाजी शिवाय खेळवला जाणार आहे.



MI vs SRH सामन्यात मोठे बदल


आज हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये सामना पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी बीसीसीआयने पहलगाम, काश्मीर येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात मृतांना श्रद्धांजली देण्याकरिता खेळात काही बदल केले आहेत.
यामधील पहिला सर्वात मोठा बदल म्हणजे सामन्यात दोन्ही संघाचे खेळाडू आणि पंच हातावर काळी फित बांधणार आहेत.


तर दुसरा मोठा बदल असा असेल कि, सामना सुरु होण्यापूर्वी एक मिनिटाचे मौन पाळत मृतांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.


त्यांनतर तिसरा बदल म्हणजे आयपीएलचा उत्साह वाढवण्यासाठी चिअरलीडर असतात पण आजच्या सामन्यात त्यांचाही समावेश नसणार आहे आणि चौथा बदल या सामन्यात कोणत्याही प्रकारे फटाक्यांची आतिषबाजी होणार नसल्याचा निर्णय बीसीसीआयने जाहीर केला.

Comments
Add Comment

Hartalika 2025: अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी केले जाते हरतालिकेचे व्रत

मुंबई : हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला हरतालिका व्रताचा सण यंदा २६ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा होत

Mumbai Police: मुंबई पोलिसांची कौतुकास्पद मोहीम, चोरीला गेलेले ८,००० मोबाईल परत मिळवून दिले

मुंबई: मुंबई पोलिसांनी चोरीला गेलेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली

Ganeshotsav 2025: वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साकारले ५२ फूटी काशी विश्वनाथ मंदिर

मुंबई: दरवर्षी प्रसिध्द मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे

पंतप्रधान मोदींची पदवी सार्वजनिक करण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने केले रद्द

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवीची माहिती सार्वजनिक करण्याचे केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी)

२५० कोटींचा अलिशान बंगला तयार, रणबीर-आलिया लवकरच करणार गृहप्रवेश

मुंबई : बॉलिवूडचे लोकप्रिय कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे स्वप्नातील घर अखेर तयार झाले आहे. गेल्या अनेक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मराठी चित्रपट ‘अरण्य’ च्या पोस्टरचे अनावरण करण्यात